शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 09:45 IST

दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या वार्षिक कायदेविषयक संमेलनात राहुल गांधी बोलत होते.

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग मृतावस्थेत आणि निवडणूक प्रक्रिया उद्ध्वस्त झाल्याचा गंभीर आरोप करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा दावा शनिवारी पुन्हा एकदा केला. आगामी काळात हे घोटाळे आपण सिद्ध करू, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या वार्षिक कायदेविषयक संमेलनात राहुल गांधी बोलत होते. भारताचे पंतप्रधान अत्यंत अल्प बहुमत असलेले पंतप्रधान असून, १५ जागांवर घोटाळे झाले नसते तर ते भारताचे पंतप्रधान होऊ शकले नसते, असा दावाही त्यांनी केला.

होय, आमच्याकडे १००% पुरावेया संमेलनानंतरही राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावर भर देत मतांची चोरी होत असल्याचा दावा केला. आपल्याकडे याचे ठोस पुरावे असल्याचे सांगून, आपण करीत असलेले आरोप निराधार नाहीत. याचे १०० टक्के पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले. 

तेव्हा अरुण जेटली यांनी मला धमकावले होते !तत्कालीन मंत्री व भाजप नेते अरुण जेटली यांचा उल्लेख करत विरोधी पक्षनेत राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘मला आठवते, मी कृषी कायद्याविरुद्ध लढत असताना अरुण जेटली यांना मला धमकी देण्यासाठी पाठवण्यात आले होते. कृषी कायद्यासह सरकारविरुद्ध तुमची अशीच भूमिका राहिली तर तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल, असे जेटली यांनी तेव्हा आपल्याला धमकावले होते, असे ते म्हणाले.

जेटलींच्या उल्लेखावर भाजपचा पलटवारराहुल गांधी २०२० मध्ये लागू केलेल्या कृषी कायद्याविषयी बोलत आहेत. परंतु, वास्तव हे आहे की, अरुण जेटली यांचे निधन २४ ऑगस्ट २०१९ रोजी झाले होते. 

कृषी कायद्याचा पहिला मसुदा ३ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला गेला आणि हा कायदा सप्टेंबर २०२० रोजी लागू झाला, असे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

पित्याच्या आत्म्याला शांत राहू द्या : रोहन जेटलीदिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी राहुल गांधी यांच्या टिप्पणीवर आक्रमक होत सोशल मीडियावर म्हटले की, ‘माझे वडील अरुण जेटली हे सत्यवादी व लोकशाहीवादी व्यक्ती होते. सुसंवाद आणि सहमतीवर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या आत्म्याला तरी शांततेत राहू द्या.’ 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग