शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 09:45 IST

दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या वार्षिक कायदेविषयक संमेलनात राहुल गांधी बोलत होते.

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग मृतावस्थेत आणि निवडणूक प्रक्रिया उद्ध्वस्त झाल्याचा गंभीर आरोप करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा दावा शनिवारी पुन्हा एकदा केला. आगामी काळात हे घोटाळे आपण सिद्ध करू, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या वार्षिक कायदेविषयक संमेलनात राहुल गांधी बोलत होते. भारताचे पंतप्रधान अत्यंत अल्प बहुमत असलेले पंतप्रधान असून, १५ जागांवर घोटाळे झाले नसते तर ते भारताचे पंतप्रधान होऊ शकले नसते, असा दावाही त्यांनी केला.

होय, आमच्याकडे १००% पुरावेया संमेलनानंतरही राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावर भर देत मतांची चोरी होत असल्याचा दावा केला. आपल्याकडे याचे ठोस पुरावे असल्याचे सांगून, आपण करीत असलेले आरोप निराधार नाहीत. याचे १०० टक्के पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले. 

तेव्हा अरुण जेटली यांनी मला धमकावले होते !तत्कालीन मंत्री व भाजप नेते अरुण जेटली यांचा उल्लेख करत विरोधी पक्षनेत राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘मला आठवते, मी कृषी कायद्याविरुद्ध लढत असताना अरुण जेटली यांना मला धमकी देण्यासाठी पाठवण्यात आले होते. कृषी कायद्यासह सरकारविरुद्ध तुमची अशीच भूमिका राहिली तर तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल, असे जेटली यांनी तेव्हा आपल्याला धमकावले होते, असे ते म्हणाले.

जेटलींच्या उल्लेखावर भाजपचा पलटवारराहुल गांधी २०२० मध्ये लागू केलेल्या कृषी कायद्याविषयी बोलत आहेत. परंतु, वास्तव हे आहे की, अरुण जेटली यांचे निधन २४ ऑगस्ट २०१९ रोजी झाले होते. 

कृषी कायद्याचा पहिला मसुदा ३ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला गेला आणि हा कायदा सप्टेंबर २०२० रोजी लागू झाला, असे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

पित्याच्या आत्म्याला शांत राहू द्या : रोहन जेटलीदिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी राहुल गांधी यांच्या टिप्पणीवर आक्रमक होत सोशल मीडियावर म्हटले की, ‘माझे वडील अरुण जेटली हे सत्यवादी व लोकशाहीवादी व्यक्ती होते. सुसंवाद आणि सहमतीवर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या आत्म्याला तरी शांततेत राहू द्या.’ 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग