शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 06:26 IST

आर्थिक, संरक्षण, परराष्ट्र धोरणाचा केंद्राकडून विचका झाल्याचा केला आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत आहे, हे पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन वगळता सर्वांनाच माहिती आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले.  भाजप सरकारने देशाचे आर्थिक, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचा विचका केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांना सांगितले की, भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होणार असून ट्रम्प त्यासाठी त्यांच्या अटी घालतील व केंद्र सरकार ट्रम्प सांगतील ते मान्य करेल. ट्रम्प यांनी भारत, रशियाची अर्थव्यवस्था मृत आहे, अशीही टीका केली. ट्रम्प यांनी केलेली टीका योग्य आहे. नोटाबंदीचा निर्णय, अनेक त्रुटी असलेली जीएसटी प्रणाली, असेम्बल इन इंडियाची फसलेली मोहीम, लघु-मध्यम उद्योगांची खराब स्थिती, शेतकऱ्यांवर झालेला मोठा अन्याय, तरुणांसाठी देशात नोकऱ्याच नाहीत, ही केंद्र सरकारची कामगिरी आहे. 

ते म्हणाले की, आपले परराष्ट्र धोरण अतिशय उत्तम आहे, असे परराष्ट्रमंत्री सांगत असतात. मात्र एका बाजूला अमेरिका भारताची निंदा करत आहे. तर दुसऱ्या बाजूस चीन आपल्यावर दबाव टाकत आहे.

ट्रम्प यांना केंद्र सरकार उत्तर का देत नाही?

राहुल गांधी यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यामागे असलेल्या पाकच्या लष्करप्रमुखांना ट्रम्प मेजवानी देतात. असे असूनही पाकविरोधात आम्हाला खूप मोठे यश मिळाले, असा केंद्र सरकार दावा करते. भारत-पाकमध्ये मी शस्त्रसंधी घडवून आणली, दोन देशांच्या संघर्षात भारताची पाच विमाने पाडण्यात आली, भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करणार अशी वक्तव्ये डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. केंद्र सरकार त्या वक्तव्यांना उत्तर का देत नाही? त्याचे नेमके कारण काय आहे, असे सवालही गांधी यांनी विचारले.

...तर आपल्याला माघार घ्यावी लागेल : थरूर

भारत व अमेरिकेची सध्या व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे. भारतावर दबाव टाकण्यासाठी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले.  जर चांगला करार शक्य झाला नाही, तर आपल्याला माघार घ्यावी लागू शकते, असेही थरूर म्हणाले. अमेरिका पाकमध्ये ‘तेलाचे साठे’ विकसित करण्यासाठी काम करणार आहेत. त्यांना शुभेच्छा आहेत.  भारताला बॉम्बे हायमध्ये काही तेल सापडले, पण आम्ही ८६ टक्के इंधन आयात करतो.  जर कोणताही व्यापार करार झाला नाही तर त्याचा भारताच्या निर्यातीवर निश्चितच परिणाम होईल. अमेरिका आमच्यासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे, असे ते पुढे म्हणाले.

राहुल गांधी यांनी १४० कोटी जनतेचा अपमान केला

भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा राहुल गांधी यांनी सातत्याने अपमान केला आहे. १४० कोटी जनता आपल्या मेहनतीतून देशाचे भविष्य घडवत असताना तिचा राहुल गांधी यांनी अपमान केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था मृत नसून राहुल गांधी यांची राजकीय विश्वासार्हता मृतावस्थेत आहे. - अमित मालवीय, भाजप आयटी सेल.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी टॅरिफबद्दल काय म्हटले ते सर्वांनी पाहिले आहे. पंतप्रधान सर्वत्र जातात, मित्र बनवतात आणि मग आपल्याला शेवटी काय मिळत आहे ते आपण पाहत आहोत. - प्रियांका गांधी, काँग्रेस खासदार.

भारत सरकारने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी असलेल्या त्यांच्या बहुचर्चित वैयक्तिक मैत्रीवर जो विश्वास ठेवला होता, तो पूर्णपणे पोकळ ठरला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वाणिज्य मंत्र्यांनी  फक्त स्वतःची प्रशंसा केली. - जयराम रमेश, काँग्रेस सरचिटणीस.

सरकार शेती आणि एमएसएमई क्षेत्राच्या हितासाठी काम करेल. याबाबत दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडगा काढण्यास सक्षम आहेत.- संजय कुमार झा, खासदार, जदयू.

भारतावर लादलेल्या टॅरिफबाबत काँग्रेस सरकारच्या कायम पाठीशी आहे. - मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसदcongressकाँग्रेस