शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 06:26 IST

आर्थिक, संरक्षण, परराष्ट्र धोरणाचा केंद्राकडून विचका झाल्याचा केला आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत आहे, हे पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन वगळता सर्वांनाच माहिती आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले.  भाजप सरकारने देशाचे आर्थिक, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचा विचका केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांना सांगितले की, भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होणार असून ट्रम्प त्यासाठी त्यांच्या अटी घालतील व केंद्र सरकार ट्रम्प सांगतील ते मान्य करेल. ट्रम्प यांनी भारत, रशियाची अर्थव्यवस्था मृत आहे, अशीही टीका केली. ट्रम्प यांनी केलेली टीका योग्य आहे. नोटाबंदीचा निर्णय, अनेक त्रुटी असलेली जीएसटी प्रणाली, असेम्बल इन इंडियाची फसलेली मोहीम, लघु-मध्यम उद्योगांची खराब स्थिती, शेतकऱ्यांवर झालेला मोठा अन्याय, तरुणांसाठी देशात नोकऱ्याच नाहीत, ही केंद्र सरकारची कामगिरी आहे. 

ते म्हणाले की, आपले परराष्ट्र धोरण अतिशय उत्तम आहे, असे परराष्ट्रमंत्री सांगत असतात. मात्र एका बाजूला अमेरिका भारताची निंदा करत आहे. तर दुसऱ्या बाजूस चीन आपल्यावर दबाव टाकत आहे.

ट्रम्प यांना केंद्र सरकार उत्तर का देत नाही?

राहुल गांधी यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यामागे असलेल्या पाकच्या लष्करप्रमुखांना ट्रम्प मेजवानी देतात. असे असूनही पाकविरोधात आम्हाला खूप मोठे यश मिळाले, असा केंद्र सरकार दावा करते. भारत-पाकमध्ये मी शस्त्रसंधी घडवून आणली, दोन देशांच्या संघर्षात भारताची पाच विमाने पाडण्यात आली, भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करणार अशी वक्तव्ये डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. केंद्र सरकार त्या वक्तव्यांना उत्तर का देत नाही? त्याचे नेमके कारण काय आहे, असे सवालही गांधी यांनी विचारले.

...तर आपल्याला माघार घ्यावी लागेल : थरूर

भारत व अमेरिकेची सध्या व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे. भारतावर दबाव टाकण्यासाठी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले.  जर चांगला करार शक्य झाला नाही, तर आपल्याला माघार घ्यावी लागू शकते, असेही थरूर म्हणाले. अमेरिका पाकमध्ये ‘तेलाचे साठे’ विकसित करण्यासाठी काम करणार आहेत. त्यांना शुभेच्छा आहेत.  भारताला बॉम्बे हायमध्ये काही तेल सापडले, पण आम्ही ८६ टक्के इंधन आयात करतो.  जर कोणताही व्यापार करार झाला नाही तर त्याचा भारताच्या निर्यातीवर निश्चितच परिणाम होईल. अमेरिका आमच्यासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे, असे ते पुढे म्हणाले.

राहुल गांधी यांनी १४० कोटी जनतेचा अपमान केला

भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा राहुल गांधी यांनी सातत्याने अपमान केला आहे. १४० कोटी जनता आपल्या मेहनतीतून देशाचे भविष्य घडवत असताना तिचा राहुल गांधी यांनी अपमान केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था मृत नसून राहुल गांधी यांची राजकीय विश्वासार्हता मृतावस्थेत आहे. - अमित मालवीय, भाजप आयटी सेल.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी टॅरिफबद्दल काय म्हटले ते सर्वांनी पाहिले आहे. पंतप्रधान सर्वत्र जातात, मित्र बनवतात आणि मग आपल्याला शेवटी काय मिळत आहे ते आपण पाहत आहोत. - प्रियांका गांधी, काँग्रेस खासदार.

भारत सरकारने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी असलेल्या त्यांच्या बहुचर्चित वैयक्तिक मैत्रीवर जो विश्वास ठेवला होता, तो पूर्णपणे पोकळ ठरला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वाणिज्य मंत्र्यांनी  फक्त स्वतःची प्रशंसा केली. - जयराम रमेश, काँग्रेस सरचिटणीस.

सरकार शेती आणि एमएसएमई क्षेत्राच्या हितासाठी काम करेल. याबाबत दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडगा काढण्यास सक्षम आहेत.- संजय कुमार झा, खासदार, जदयू.

भारतावर लादलेल्या टॅरिफबाबत काँग्रेस सरकारच्या कायम पाठीशी आहे. - मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसदcongressकाँग्रेस