शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दुय्यम दर्जाच्या दारुगोळ्यामुळे अपघात वाढले, लष्कराने संरक्षण मंत्रालयाकडे व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 09:31 IST

दुय्यम दर्जाचा दारुगोळा आणि युद्ध सामुग्रीमुळे वाढत असलेल्या अपघातांबाबत लष्कराने चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - दुय्यम दर्जाचा दारुगोळा आणि युद्ध सामुग्रीमुळे वाढत असलेल्या अपघातांबाबत लष्कराने चिंता व्यक्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा दारुगोळा सरकारी मालकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डकडून लष्कराकडील रणगाडे, तोफा एअर डिफेन्स गन आणि अन्य युद्धसामुग्रीसाठी पुरवण्यात येतो. दरम्यान, दुय्यम दर्जाच्या दारुगोळ्यामुळे होत असलेल्या अपघातांमुळे चिंतीत असलेल्या लष्कराने याबाबत संरक्षण मंत्रालयाशी संवाद साधला आहे. अशा दारुगोळ्यामुळे अपघात होऊन जवानांना प्राणास मुकत आहेत किंवा जायबंदी होत आहेत. तसेच युद्धसामुग्रीचेही नुकसान होत आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले.  यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे. या वृत्तात असलेल्या उल्लेखानुसार सरकारी अधिपत्याखालील दारुगोळा कारखान्यांकडून पुरवण्यात येत असलेल्या दारुगोळ्यामुळे वाढत असलेल्या दुर्घटनांमुळे लष्कराचा या सामुग्रीवर असलेला विश्वास कमी झाला आहे. दारुगोळा कारखान्यांकडून दारुगोळ्याच्या दर्जाबाबत अपेक्षित काळजी घेतली जात नसल्याने लष्कराने संरक्षण उत्पादन सचिव अजय कुमार यांच्याकडे गंभीर चिंता व्यक्त केली आहे.  वर्षाकाठी 19 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाकडे दारुगोळा बनवणारे एकूण 41 कारखाने आहेत. हे कारखाने 12 लाख जवान सेवेत असलेल्या भारतीय लष्कराला दारुगोळ्याचा पुरवठा करणारे मुख्य स्रोत आहेत. या ऑर्डनन्स फॅक्टरीमधून उप्तादित दारुगोळ्याच्या दर्जात होत असलेल्या घसरणीचा देशाच्या युद्धक्षमतेवर परिणाम होतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान लष्कराकडून याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर संरक्षण उत्पादन सचिव कुमार यांनी लष्कराला त्यांच्या विविध समस्या आपल्यासमोर मांडण्यास सांगितले आहे. 

 संरक्षण उत्पादन सचिवांना सादर केलेल्या 15 पानांच्या कागदपत्रांमध्ये लष्कराने अत्यंत गंभीर असे प्रश्न मांडले आहेत. 105 एमएमची इंडियन फिल्ड गन, 105 एमएम लाइट फिल्ड गन, 130 एमएम लाइट फिल्ड गन, 130 एमएम 1 मीडियम गन, 40 एमएम एल-70 एअर डिफेन्स गन,  टी-72, टी-90 आणि अर्जुन टँकच्या तोफांबाबत नियमित अपघात घडत आहेत. याशिवाय 155 एमएमच्या बोफोर्स तोफांबाबतही खराब दारुगोळ्याचे प्रकार घडले आहेत, असे लष्कराने संरक्षण उत्पादन सचिवांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाने ही समस्या सोडवण्यासाठी म्हणावे तेवढे गांभीर्य दाखवलेले नाही. त्यामुळे लष्कराने लांबपल्ल्याच्या दारुगोळ्याची फायरिंग थांबवली आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभागIndiaभारत