शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:22 IST

मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या २७ शालेय विद्यार्थ्यांना सैन्याने सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे.

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या २७ शालेय विद्यार्थ्यांना सैन्याने सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. पावसाने थैमान घातले आहे. 'रायझिंग सोल्स स्कूल'मधून घरी परतत असताना ही सर्व मुलं बसमध्ये अडकली होती.

सिंध नदीच्या वाढत्या पाण्याची पातळी आणि तीव्र प्रवाहामुळे हे विद्यार्थी पचावली गावाजवळ बसमध्ये अडकले होते. पीटीआयच्या वृत्तानुसार, परिस्थितीचे गांभीर्य पाहून प्रशासनाने सैन्याची मदत घेतली आणि सुमारे ३० तासांच्या प्रतीक्षेनंतर मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.

मुलांची स्कूल बस सुकुंडयाई, बिजरौनी आणि जवळच्या गावांमध्ये परतत होती. पचावली गावाजवळ सिंध नदीत अचानक पाणी वाढल्याने पूल ओलांडणं अशक्य झालं. कोलारसचे एसडीओपी संजय मिश्रा म्हणाले की, पूल ओलांडण्यात धोका असल्याचं पाहून बस तिथेच थांबवण्यात आली.

प्रशासनाने घेतली सैन्याची मदत 

परिस्थिती बिकट होत चालली आहे हे पाहून प्रशासनाने सैन्याची मदत घेतली. लष्कराचे एक पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बोटीतून एकामागून एक मुलांना वाचवलं. सुमारे ३० तासांपासून अडकलेल्या मुलांनी सुखरूप बाहेर पडल्यानंतर 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा दिल्या.

कुटुंब झालं भावुक

मुलांना वाचवल्यानंतर त्यांचं कुटुंब भावुक झालं आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. घटनास्थळी पोहोचलेले कोलारसचे आमदार महेंद्र यादव यांनी सैन्य आणि प्रशासनाचे आभार मानले. हवामानाची परिस्थिती पाहूनच वाहतुकीचा निर्णय घेण्याचा इशारा प्रशासनाने शाळांनाही दिला.

१०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

भारतीय सैन्यानेही पुरात अडकलेल्या अनेक गावकऱ्यांना वाचवले. लष्कराने ट्विटरवर माहिती दिली की, 'शिवपुरी, गुना आणि अशोकनगर जिल्ह्यात सैन्य, एसडीआरएफ आणि प्रशासन सातत्याने मदत आणि बचावकार्य करत आहे. आतापर्यंत १०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. तीन पूर मदत पथकं आणि तीन वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली आहेत, जी चोवीस तास बाधितांना मदत करत आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशfloodपूरRainपाऊसStudentविद्यार्थीIndian Armyभारतीय जवान