शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल; १२ हायस्पीड बोट खरेदी करणार

By देवेश फडके | Published: January 02, 2021 11:33 AM

भारत आणि चीन सीमेवरील पूर्व लडाख भागात असलेल्या पँगोंग झीलमध्ये १२ हायस्पीड बोटी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 

ठळक मुद्देचीनवर नजर ठेवण्यासाठी १२ हायस्पीड बोटींच्या खरेदीला मंजुरी भारतीय लष्कर आणि गोवा शिपयार्डमध्ये करारमे २०२१ पासून बोटी भारतीय सेनेत दाखल होणार

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारतीय लष्कराकडून उच्च क्षमतेच्या १२ हायस्पीड बोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि चीन सीमेवरील पूर्व लडाख भागात असलेल्या पँगोंग झीलमध्ये या बोटी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 

भारतीय लष्कराकडून १२ हायस्पीड बोटींच्या खरेदी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या १२ बोटी उच्च क्षमता आणि आधुनिक यंत्रंणांनी सुसज्ज असतील, अशी माहिती मिळाली आहे. भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. चीनला प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम असून, या नवीन बोटींमुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढेल, असे म्हटले जात आहे. 

गोवा शिपयार्डशी करार

पँगोंग झीलसह मोठ्या जलाशयातील देखरेख वाढवण्यासाठी उच्च क्षमतेच्या १२ हायस्पीड बोटींच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली असून, गोवा शिपयार्ड लिमिटेडशी यासंदर्भातील करार करण्यात आला आहे. भारतीय सेना आणि गोवा शिपयार्ड कंपनीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, मे २०२१ पासून या बोटी लष्करी सेवेत दाखल होणार असल्याची माहिती भारतीय लष्कराने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

विशेष उपकरणांनी सुसज्ज हायस्पीड बोट

गोवा शिपयार्डकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक गस्त नौका खरेदी करार पूर्ण झाला आहे. सुरक्षादलांच्या आवश्यकतांनुसार या बोटीत अत्याधुनिक उपकरणे लावली जाणार आहेत. उच्च क्षमतेच्या आणि अत्याधुनिक बोटींची निर्मिती गोव्यात करण्यात येणार आहे. या बोटी विशेष ऑपरेशनसाठी तयार करण्यात येणाऱ्या विशेष बोटींनुसार बनवल्या जाणार आहेत. 

आताच्या घडीला उत्तर भारतात थंडीचा कहर कायम आहे. लडाखमधील पँगोंग झील गोठले आहे. आगामी तीन ते चार महिने हीच स्थिती कायम राहणार आहे. यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात पँगोंग झील परिसर पूर्ववत होईल, तेव्हा या अत्याधुनिक बोटी भारत-चीन सीमेवर देखरेखीसाठी तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून भारत-चीन सीमेवरून वादंग सुरू आहे. पूर्व लडाख भागात सुमारे ५० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. सध्या लडाखमधील पारा उणे २० अंशांवर गेले आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही जवानांचा कडक पाहारा सुरू आहे. भारत आणि चीनमधील सैन्यस्तरावरील चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही.

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानladakhलडाखborder disputeसीमा वाद