शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल; १२ हायस्पीड बोट खरेदी करणार

By देवेश फडके | Updated: January 2, 2021 11:36 IST

भारत आणि चीन सीमेवरील पूर्व लडाख भागात असलेल्या पँगोंग झीलमध्ये १२ हायस्पीड बोटी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 

ठळक मुद्देचीनवर नजर ठेवण्यासाठी १२ हायस्पीड बोटींच्या खरेदीला मंजुरी भारतीय लष्कर आणि गोवा शिपयार्डमध्ये करारमे २०२१ पासून बोटी भारतीय सेनेत दाखल होणार

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारतीय लष्कराकडून उच्च क्षमतेच्या १२ हायस्पीड बोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि चीन सीमेवरील पूर्व लडाख भागात असलेल्या पँगोंग झीलमध्ये या बोटी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 

भारतीय लष्कराकडून १२ हायस्पीड बोटींच्या खरेदी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या १२ बोटी उच्च क्षमता आणि आधुनिक यंत्रंणांनी सुसज्ज असतील, अशी माहिती मिळाली आहे. भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. चीनला प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम असून, या नवीन बोटींमुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढेल, असे म्हटले जात आहे. 

गोवा शिपयार्डशी करार

पँगोंग झीलसह मोठ्या जलाशयातील देखरेख वाढवण्यासाठी उच्च क्षमतेच्या १२ हायस्पीड बोटींच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली असून, गोवा शिपयार्ड लिमिटेडशी यासंदर्भातील करार करण्यात आला आहे. भारतीय सेना आणि गोवा शिपयार्ड कंपनीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, मे २०२१ पासून या बोटी लष्करी सेवेत दाखल होणार असल्याची माहिती भारतीय लष्कराने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

विशेष उपकरणांनी सुसज्ज हायस्पीड बोट

गोवा शिपयार्डकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक गस्त नौका खरेदी करार पूर्ण झाला आहे. सुरक्षादलांच्या आवश्यकतांनुसार या बोटीत अत्याधुनिक उपकरणे लावली जाणार आहेत. उच्च क्षमतेच्या आणि अत्याधुनिक बोटींची निर्मिती गोव्यात करण्यात येणार आहे. या बोटी विशेष ऑपरेशनसाठी तयार करण्यात येणाऱ्या विशेष बोटींनुसार बनवल्या जाणार आहेत. 

आताच्या घडीला उत्तर भारतात थंडीचा कहर कायम आहे. लडाखमधील पँगोंग झील गोठले आहे. आगामी तीन ते चार महिने हीच स्थिती कायम राहणार आहे. यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात पँगोंग झील परिसर पूर्ववत होईल, तेव्हा या अत्याधुनिक बोटी भारत-चीन सीमेवर देखरेखीसाठी तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून भारत-चीन सीमेवरून वादंग सुरू आहे. पूर्व लडाख भागात सुमारे ५० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. सध्या लडाखमधील पारा उणे २० अंशांवर गेले आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही जवानांचा कडक पाहारा सुरू आहे. भारत आणि चीनमधील सैन्यस्तरावरील चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही.

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानladakhलडाखborder disputeसीमा वाद