शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल; १२ हायस्पीड बोट खरेदी करणार

By देवेश फडके | Updated: January 2, 2021 11:36 IST

भारत आणि चीन सीमेवरील पूर्व लडाख भागात असलेल्या पँगोंग झीलमध्ये १२ हायस्पीड बोटी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 

ठळक मुद्देचीनवर नजर ठेवण्यासाठी १२ हायस्पीड बोटींच्या खरेदीला मंजुरी भारतीय लष्कर आणि गोवा शिपयार्डमध्ये करारमे २०२१ पासून बोटी भारतीय सेनेत दाखल होणार

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारतीय लष्कराकडून उच्च क्षमतेच्या १२ हायस्पीड बोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि चीन सीमेवरील पूर्व लडाख भागात असलेल्या पँगोंग झीलमध्ये या बोटी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 

भारतीय लष्कराकडून १२ हायस्पीड बोटींच्या खरेदी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या १२ बोटी उच्च क्षमता आणि आधुनिक यंत्रंणांनी सुसज्ज असतील, अशी माहिती मिळाली आहे. भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. चीनला प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम असून, या नवीन बोटींमुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढेल, असे म्हटले जात आहे. 

गोवा शिपयार्डशी करार

पँगोंग झीलसह मोठ्या जलाशयातील देखरेख वाढवण्यासाठी उच्च क्षमतेच्या १२ हायस्पीड बोटींच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली असून, गोवा शिपयार्ड लिमिटेडशी यासंदर्भातील करार करण्यात आला आहे. भारतीय सेना आणि गोवा शिपयार्ड कंपनीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, मे २०२१ पासून या बोटी लष्करी सेवेत दाखल होणार असल्याची माहिती भारतीय लष्कराने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

विशेष उपकरणांनी सुसज्ज हायस्पीड बोट

गोवा शिपयार्डकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक गस्त नौका खरेदी करार पूर्ण झाला आहे. सुरक्षादलांच्या आवश्यकतांनुसार या बोटीत अत्याधुनिक उपकरणे लावली जाणार आहेत. उच्च क्षमतेच्या आणि अत्याधुनिक बोटींची निर्मिती गोव्यात करण्यात येणार आहे. या बोटी विशेष ऑपरेशनसाठी तयार करण्यात येणाऱ्या विशेष बोटींनुसार बनवल्या जाणार आहेत. 

आताच्या घडीला उत्तर भारतात थंडीचा कहर कायम आहे. लडाखमधील पँगोंग झील गोठले आहे. आगामी तीन ते चार महिने हीच स्थिती कायम राहणार आहे. यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात पँगोंग झील परिसर पूर्ववत होईल, तेव्हा या अत्याधुनिक बोटी भारत-चीन सीमेवर देखरेखीसाठी तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून भारत-चीन सीमेवरून वादंग सुरू आहे. पूर्व लडाख भागात सुमारे ५० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. सध्या लडाखमधील पारा उणे २० अंशांवर गेले आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही जवानांचा कडक पाहारा सुरू आहे. भारत आणि चीनमधील सैन्यस्तरावरील चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही.

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानladakhलडाखborder disputeसीमा वाद