शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Air Strike: ''मोदी ने मारा' म्हणत पाकिस्तानच रडू लागला; तरी काहींना शंका वाटतेय!' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 19:09 IST

हे लोक भारताचं मीठ खाऊन पाकिस्तानला मदत करताहेत.

नोएडाः 'सर्जिकल स्ट्राईक केला, तेव्हा आम्ही जनतेला त्याची माहिती दिली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आम्हाला जे करायचं होतं, ते आम्ही केलं. त्यानंतर आम्ही गप्पच होतो. पण पहाटे पाच वाजता पाकिस्ताननंच रडायला सुरुवात केली. 'मोदी ने मारा, मोदी ने मारा' म्हणत ते रडू लागले. तरीही, आपल्याकडच्या काही लोकांना पुरावे हवेत. एअर स्ट्राईक खरंच झाला का, याबद्दल त्यांना शंका वाटतेय. हे लोक भारताचं मीठ खाऊन पाकिस्तानला मदत करताहेत, अशी चपराक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावली. 

भारताच्या खणखणीत उत्तरामुळे दहशतवाद्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पण, आता आपण देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहायला हवं, असा चिमटाही मोदींनी विरोधकांना काढला.

पाकिस्तानमधील बालाकोट इथल्या दहशतवाद्यांच्या तळांवर 'एअर स्ट्राईक' करून भारतीय वायुसेनेनं 'पुलवामा'चा बदला घेतला. कूटनीतीच्या जोरावर भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावरही कोंडी केली. सुरुवातीला सगळ्यांनीच या चोख प्रत्युत्तराचं स्वागत केलं होतं. परंतु, गेल्या काही दिवसांपासून, या विषयाला राजकीय वळण लागलंय. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी पुरावे मागणाऱ्या नेत्यांना, एअर स्ट्राईकचेही पुरावे हवे आहेत. कारण, लोकसभा निवडणूक जवळ आल्यानं केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या एअर स्ट्राईकचा राजकारण करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या विरोधकांना मोदींनी आज पुन्हा धारेवर धरलं.  

पाकिस्तानला वाटत होतं मोदी सरकार पुन्हा 'सर्जिकल स्ट्राईक' करेल. पण आपण हवेतून हल्ला केला. जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्याबद्दल आम्ही काहीच भाष्य केलं नव्हतं. पण, पाकिस्ताननेच ट्विटरवरून रडारड सुरू केली. म्हणजेच, त्यांनी एअर स्ट्राईक झाल्याचं मान्य केलंय. भारतीय वायुसेनेनंही लक्ष्य अचूक भेदल्याचं सांगितलंय. तरीही, आपल्याकडच्याच काही लोकांना या कामगिरीबद्दल संशय आहे. हे दुर्दैवी आहे, असं नरेंद्र मोदींनी सुनावलं.  

ज्यांच्या धमन्यांमधून भारतीय रक्त वाहतं, त्यांना एअर स्ट्राईकबद्दल संशय वाटतोय का? जे 'भारत माता की जय' असा जयघोष करतात, त्यांना शंका आहे का? मग जे संशय घेताहेत, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का, असा प्रश्न मोदींनी उपस्थितांना विचारला. एकवेळ या मोदीवर विश्वास ठेवू नका, पण भारतीय जवानांवर संशय घेऊन त्यांचं मनोधैर्य खच्ची करू नका, असा 'स्ट्राईक' मोदींनी आधीही विरोधकांवर केला होता.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndian Armyभारतीय जवान