शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Air Strike: ''मोदी ने मारा' म्हणत पाकिस्तानच रडू लागला; तरी काहींना शंका वाटतेय!' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 19:09 IST

हे लोक भारताचं मीठ खाऊन पाकिस्तानला मदत करताहेत.

नोएडाः 'सर्जिकल स्ट्राईक केला, तेव्हा आम्ही जनतेला त्याची माहिती दिली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आम्हाला जे करायचं होतं, ते आम्ही केलं. त्यानंतर आम्ही गप्पच होतो. पण पहाटे पाच वाजता पाकिस्ताननंच रडायला सुरुवात केली. 'मोदी ने मारा, मोदी ने मारा' म्हणत ते रडू लागले. तरीही, आपल्याकडच्या काही लोकांना पुरावे हवेत. एअर स्ट्राईक खरंच झाला का, याबद्दल त्यांना शंका वाटतेय. हे लोक भारताचं मीठ खाऊन पाकिस्तानला मदत करताहेत, अशी चपराक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावली. 

भारताच्या खणखणीत उत्तरामुळे दहशतवाद्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पण, आता आपण देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहायला हवं, असा चिमटाही मोदींनी विरोधकांना काढला.

पाकिस्तानमधील बालाकोट इथल्या दहशतवाद्यांच्या तळांवर 'एअर स्ट्राईक' करून भारतीय वायुसेनेनं 'पुलवामा'चा बदला घेतला. कूटनीतीच्या जोरावर भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावरही कोंडी केली. सुरुवातीला सगळ्यांनीच या चोख प्रत्युत्तराचं स्वागत केलं होतं. परंतु, गेल्या काही दिवसांपासून, या विषयाला राजकीय वळण लागलंय. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी पुरावे मागणाऱ्या नेत्यांना, एअर स्ट्राईकचेही पुरावे हवे आहेत. कारण, लोकसभा निवडणूक जवळ आल्यानं केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या एअर स्ट्राईकचा राजकारण करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या विरोधकांना मोदींनी आज पुन्हा धारेवर धरलं.  

पाकिस्तानला वाटत होतं मोदी सरकार पुन्हा 'सर्जिकल स्ट्राईक' करेल. पण आपण हवेतून हल्ला केला. जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्याबद्दल आम्ही काहीच भाष्य केलं नव्हतं. पण, पाकिस्ताननेच ट्विटरवरून रडारड सुरू केली. म्हणजेच, त्यांनी एअर स्ट्राईक झाल्याचं मान्य केलंय. भारतीय वायुसेनेनंही लक्ष्य अचूक भेदल्याचं सांगितलंय. तरीही, आपल्याकडच्याच काही लोकांना या कामगिरीबद्दल संशय आहे. हे दुर्दैवी आहे, असं नरेंद्र मोदींनी सुनावलं.  

ज्यांच्या धमन्यांमधून भारतीय रक्त वाहतं, त्यांना एअर स्ट्राईकबद्दल संशय वाटतोय का? जे 'भारत माता की जय' असा जयघोष करतात, त्यांना शंका आहे का? मग जे संशय घेताहेत, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का, असा प्रश्न मोदींनी उपस्थितांना विचारला. एकवेळ या मोदीवर विश्वास ठेवू नका, पण भारतीय जवानांवर संशय घेऊन त्यांचं मनोधैर्य खच्ची करू नका, असा 'स्ट्राईक' मोदींनी आधीही विरोधकांवर केला होता.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndian Armyभारतीय जवान