शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Indian Air Strike on Pakistan: ...अन् पाकिस्तानी नागरिकांनीच केला त्यांच्या सैन्याचा पोपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:26 IST

पाकिस्तानी सैन्याचा दावा नागरिकांनीच खोटा ठरवला

इस्लामाबाद: भारतीय हवाई दलानंपाकिस्तानच्या हद्दीत घुसून 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. रात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान भारतीय हवाई दलानंजैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला चढवला. हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठी भागात हवाई दलानं 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. भारताच्या या कारवाईनं नाक कापलं गेलं. मात्र पाकिस्तान याला हल्ला मानायला तयार नाही.भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानी हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचा दावा पाकिस्तानी सैन्यानं केला. मात्र पाकिस्तानच्या या दाव्याची त्यांच्याच नागरिकांनी पोलखोल केली. मध्यरात्री तीन वाजता मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर पाच स्फोटकांचा आवाज झाला, अशी माहिती मोहम्मद आदिल नावाच्या व्यक्तीनं बीबीसीला दिली. काही वेळातच आवाज थांबले, असंदेखील तो म्हणाला.पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सकाळी ट्विट केलं. भारतानं घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. 'भारतीय हवाई दलानं मुझफ्फराबाद सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. याला पाकिस्तानी सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्ताननं त्वरित कारवाई केल्यानं भारतीय विमानांनी लगेच माघार घेतली,' असं गफूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं. पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष तहरिक ए इन्साफनंदेखील हल्ल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. पाकिस्तानी लष्कर आणि सरकारनं भारतीय विमानं हद्दीत आलीच नाहीत, असा दावा केला. मात्र पाकिस्तानी नागरिकांनी केलेल्या ट्विट्समुळे हा दावा फोल ठरला. 'पहाटे 4 वाजता वाजता लढाऊ विमानं आकाशात घिरट्या घालत आहेत. बालाकोटजवळ स्फोटकांचा आवाज येत आहे. पाकिस्तान झिंदाबाद,' अशी ट्विट्स काहींनी केली. पाकिस्तानच्या विमानांनी रात्री उड्डाणच केलं नव्हतं. याशिवाय पाकिस्ताननं कोणताही स्फोट घडवला नव्हता. त्यामुळे मध्यरात्री पाकिस्तानच्या आकाशात उडणारी विमानं भारताचीच होती, हे स्पष्ट झालं.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदPakistanपाकिस्तान