शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Indian Air Strike on Pakistan: ...अन् पाकिस्तानी नागरिकांनीच केला त्यांच्या सैन्याचा पोपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:26 IST

पाकिस्तानी सैन्याचा दावा नागरिकांनीच खोटा ठरवला

इस्लामाबाद: भारतीय हवाई दलानंपाकिस्तानच्या हद्दीत घुसून 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. रात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान भारतीय हवाई दलानंजैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला चढवला. हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठी भागात हवाई दलानं 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. भारताच्या या कारवाईनं नाक कापलं गेलं. मात्र पाकिस्तान याला हल्ला मानायला तयार नाही.भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानी हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचा दावा पाकिस्तानी सैन्यानं केला. मात्र पाकिस्तानच्या या दाव्याची त्यांच्याच नागरिकांनी पोलखोल केली. मध्यरात्री तीन वाजता मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर पाच स्फोटकांचा आवाज झाला, अशी माहिती मोहम्मद आदिल नावाच्या व्यक्तीनं बीबीसीला दिली. काही वेळातच आवाज थांबले, असंदेखील तो म्हणाला.पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सकाळी ट्विट केलं. भारतानं घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. 'भारतीय हवाई दलानं मुझफ्फराबाद सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. याला पाकिस्तानी सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्ताननं त्वरित कारवाई केल्यानं भारतीय विमानांनी लगेच माघार घेतली,' असं गफूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं. पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष तहरिक ए इन्साफनंदेखील हल्ल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. पाकिस्तानी लष्कर आणि सरकारनं भारतीय विमानं हद्दीत आलीच नाहीत, असा दावा केला. मात्र पाकिस्तानी नागरिकांनी केलेल्या ट्विट्समुळे हा दावा फोल ठरला. 'पहाटे 4 वाजता वाजता लढाऊ विमानं आकाशात घिरट्या घालत आहेत. बालाकोटजवळ स्फोटकांचा आवाज येत आहे. पाकिस्तान झिंदाबाद,' अशी ट्विट्स काहींनी केली. पाकिस्तानच्या विमानांनी रात्री उड्डाणच केलं नव्हतं. याशिवाय पाकिस्ताननं कोणताही स्फोट घडवला नव्हता. त्यामुळे मध्यरात्री पाकिस्तानच्या आकाशात उडणारी विमानं भारताचीच होती, हे स्पष्ट झालं.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदPakistanपाकिस्तान