शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Indian Air Strike on Pakistan: 'हवाई हल्ल्यांचा मोदी सरकारला निवडणुकीत फायदा नाहीच!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:49 IST

हवाई दलाच्या धडाकेबाज कामगिरीचं देशभरातून कौतुक झाल्यानंतर, आता त्यावरून राजकारण सुरू झालंय.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले, ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. या धडाकेबाज कामगिरीचं देशभरातून कौतुक झाल्यानंतर, आता त्यावरून राजकारण सुरू झालंय. पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचा निवडणुकीत फायदा होणार नाही, असं मत मांडत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

पाकव्याप्त काश्मीरवर केलेल्या एअर स्ट्राइकचा राजकीय फायदा होईल, असं ज्यांना वाटतंय त्यांना मी इतकंच सांगू इच्छितो की, १९९९ च्या निवडणुकीआधी अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुचाचणी केली होती. परंतु, त्यांना आघाडीचं सरकारच स्थापन करावं लागलं होतं, असं सूचक ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे. 

दरम्यान, पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइक-२ चा फायदा नरेंद्र मोदी सरकारला होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तसे मेसेज आणि मीम्सही व्हायरल झाली आहेत, होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील जाहीर सभेत केलेलं भाषणही काहीसं त्याच थाटातलं होतं. देश सुरक्षित हातांमध्ये आहे, असं म्हणत त्यांनी मतदारांनाच साद घातलीय. त्यामुळे भाजपामध्ये वेगळाच जोश, उत्साह संचारला आहे. निवडणूक प्रचारात सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक हे चर्चेचे विषय असतील, हे नक्की. त्यामुळेच मोदीविरोधकांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याचं ओमर अब्दुल्ला यांच्या प्रतिक्रियेतून दिसतंय. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलNarendra Modiनरेंद्र मोदी