शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुदलाचा सूज्ञपणा; पाकिस्तानी नागरिकांच्या केसालाही धक्का नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 20:39 IST

भारतीय हवाई दलानं आपलं युद्ध दहशतवाद्यांविरुद्ध आहे, याची पूर्ण जाणीव ठेवून हल्ला केला

भारतातील निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या क्रूरकर्मा दहशतवाद्यांना पोसण्याचं काम पाकिस्तान करत असला, तरी आपलं युद्ध हे दहशतवाद्यांविरुद्ध आहे, याची पूर्ण जाणीव ठेवून पाकिस्तानी नागरिकांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेत भारतीय लष्कराने आजची एअर स्ट्राइक मोहीम फत्ते केली. त्यांनी दाखवलेल्या या सुजाणपणामुळेच अख्खं जग सर्जिकल स्ट्राइक-२ नंतरही भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे आणि पाकिस्तानचं वस्त्रहरणही झालंय. 

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. अख्खा देश हळहळला. जैश-ए-मोहम्मदचा आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती. लष्कराच्या मनातही असंतोष खदखदत होताच. पण, घाईघाईत कुठलंही चुकीचं पाऊल न उचलता, अत्यंत थंड डोक्याने दिवस-रात्र एक करून तिन्ही दलांनी एकत्रितपणे आखणी केली आणि आज भारताला मोठं यश मिळालं. मिराज 2000 या विमानांमधून १००० किलोचे बॉम्ब जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर टाकण्यात आले आणि मसूद अझरचा भाऊ, मेव्हण्यासह ३०० दहशतवादी मातीत गाडले गेले. पाकिस्तानने वारंवार आश्वासन देऊनही जैशचा बंदोबस्त न केल्यानं आणि त्यांच्याकडून आणखी दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्यानंच हा हल्ला केल्याचं परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केलं. त्यावेळी, नागरी वसाहतीपासून दूर अंतरावर हे बॉम्ब टाकल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं. लष्कराच्या या मानवता धर्माला पैकीच्या पैकी मार्क द्यावे लागतील. 

पाकिस्तान सरकारचा भारताबद्दलचा, भारतीयांबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. परंतु, पाकिस्तानी नागरिकांशी आमचं कुठलंही वैर नाही, हे भारतीय लष्करानं आज कृतीतून दाखवून दिला. त्याला सलाम केला पाहिजे. कारण, एवढी मोठी कारवाई करताना प्रत्येक जवान हा स्वतःचा जीव धोक्यात घालत असतो. अशावेळी, पाकिस्तानी नागरिकांच्या रक्षणाचा विचार प्राधान्याने करणं, हे निश्चितच स्तुत्य आहे. त्यांच्या या विचारामुळेच आज आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा भारताला मिळतोय. कारण आपलं युद्ध हे दहशतवादाविरुद्ध आहे, हे जगाला दिसतंय, पटतंय, जाणवतंय. याउलट, पाकिस्तान काय करतोय, त्यांचे इरादे किती नापाक आहेत, हेही सगळे पाहताहेत. या हवाई हल्ल्यांच्या निमित्ताने पाकिस्तान पुन्हा उघडा पडला आहे आणि त्याचं श्रेय लष्कराला जातं. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद