शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुदलाचा सूज्ञपणा; पाकिस्तानी नागरिकांच्या केसालाही धक्का नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 20:39 IST

भारतीय हवाई दलानं आपलं युद्ध दहशतवाद्यांविरुद्ध आहे, याची पूर्ण जाणीव ठेवून हल्ला केला

भारतातील निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या क्रूरकर्मा दहशतवाद्यांना पोसण्याचं काम पाकिस्तान करत असला, तरी आपलं युद्ध हे दहशतवाद्यांविरुद्ध आहे, याची पूर्ण जाणीव ठेवून पाकिस्तानी नागरिकांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेत भारतीय लष्कराने आजची एअर स्ट्राइक मोहीम फत्ते केली. त्यांनी दाखवलेल्या या सुजाणपणामुळेच अख्खं जग सर्जिकल स्ट्राइक-२ नंतरही भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे आणि पाकिस्तानचं वस्त्रहरणही झालंय. 

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. अख्खा देश हळहळला. जैश-ए-मोहम्मदचा आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती. लष्कराच्या मनातही असंतोष खदखदत होताच. पण, घाईघाईत कुठलंही चुकीचं पाऊल न उचलता, अत्यंत थंड डोक्याने दिवस-रात्र एक करून तिन्ही दलांनी एकत्रितपणे आखणी केली आणि आज भारताला मोठं यश मिळालं. मिराज 2000 या विमानांमधून १००० किलोचे बॉम्ब जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर टाकण्यात आले आणि मसूद अझरचा भाऊ, मेव्हण्यासह ३०० दहशतवादी मातीत गाडले गेले. पाकिस्तानने वारंवार आश्वासन देऊनही जैशचा बंदोबस्त न केल्यानं आणि त्यांच्याकडून आणखी दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्यानंच हा हल्ला केल्याचं परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केलं. त्यावेळी, नागरी वसाहतीपासून दूर अंतरावर हे बॉम्ब टाकल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं. लष्कराच्या या मानवता धर्माला पैकीच्या पैकी मार्क द्यावे लागतील. 

पाकिस्तान सरकारचा भारताबद्दलचा, भारतीयांबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. परंतु, पाकिस्तानी नागरिकांशी आमचं कुठलंही वैर नाही, हे भारतीय लष्करानं आज कृतीतून दाखवून दिला. त्याला सलाम केला पाहिजे. कारण, एवढी मोठी कारवाई करताना प्रत्येक जवान हा स्वतःचा जीव धोक्यात घालत असतो. अशावेळी, पाकिस्तानी नागरिकांच्या रक्षणाचा विचार प्राधान्याने करणं, हे निश्चितच स्तुत्य आहे. त्यांच्या या विचारामुळेच आज आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा भारताला मिळतोय. कारण आपलं युद्ध हे दहशतवादाविरुद्ध आहे, हे जगाला दिसतंय, पटतंय, जाणवतंय. याउलट, पाकिस्तान काय करतोय, त्यांचे इरादे किती नापाक आहेत, हेही सगळे पाहताहेत. या हवाई हल्ल्यांच्या निमित्ताने पाकिस्तान पुन्हा उघडा पडला आहे आणि त्याचं श्रेय लष्कराला जातं. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद