शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Indian Air Strike on Pakistan: इंदिरा गांधींनंतर नरेंद्र मोदींनीच पाकिस्तानमध्ये घुसून दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 09:41 IST

Indian Air Strike on Pakistan: हवाई दलाच्या १२ विमानांनी ४८ वर्षांनंतर एलओसी ओलांडली

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना जन्माला घालणारे कारखाने नष्ट करण्यासाठी हवाई दलाला नियंत्रण रेषा ओलांडण्याची परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या भारताचे आगमन झाल्याचा संदेश दिला. इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पूर्ण युद्धाची घोषणा झाल्यावर पाकिस्तानच्या आत हवाई दलाला पाठवले होते. मोदी यांनी ती इच्छाशक्ती ४८ वर्षांनी दाखवत विमानांना एलओसीच्या आत जाण्यास मुभा दिली.

दहशतवादाविरुद्ध यापूर्वी विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी एवढेच काय डॉ. मनमोहनसिंग यांनीही असा उपाय केला नव्हता. १९८९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी रुबियाच्या बदल्यात आठ दहशतवाद्यांना सोडण्यात आले. पंतप्रधान चंद्रशेखर यांनी १९९० मध्ये सैफुद्दीन सोझ यांच्या मुलीच्या बदल्यात जेकेएलएफच्या अतिरेक्यांना सोडले. १९९३ मध्ये नरसिंह राव यांनी हजरतबाल मशिदीत ओलिस प्रकरणात अतिरेक्यांना जाऊ दिले होते. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानातील प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर व तिघांना कंदाहारमध्ये नेऊन सोडले. त्याच मसूद अझहरने २00१ मध्ये संसदेवर हल्ला घडवून आणला. डॉ. मनमोहनसिंग यांना मुंबई हल्ल्यानंतर स्ट्राइक करायचा होता. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नाही.जोखीम पत्करून कारवाई

उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी यांच्या विरोधकांनी सप्टेंबर २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही या केलेल्या टीकेला ताज्या कारवाईमुळे पूर्णविराम दिला गेला आहे. मंगळवारचा हल्ला झाला हे पाकिस्ताननेही मान्य केले आहे.१९८९ पासूनच्या पंतप्रधानांनी जे धाडस केले नाही ते मोदी यांनी करून दाखवले आणि परिणाम काहीही होवो नियंत्रण रेषेच्या आत शिरून हल्ला करण्यास मागेपुढे बघितले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पाकिस्तानला त्यांनी दिला आहे. आपण परिणामांची चिंता न करता मोठी जोखीम घेणारे आहोत हे मोदी यांनी दाखवून दिले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNarendra Modiनरेंद्र मोदीIndira Gandhiइंदिरा गांधी