शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Indian Air Strike on Pakistan: इंदिरा गांधींनंतर नरेंद्र मोदींनीच पाकिस्तानमध्ये घुसून दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 09:41 IST

Indian Air Strike on Pakistan: हवाई दलाच्या १२ विमानांनी ४८ वर्षांनंतर एलओसी ओलांडली

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना जन्माला घालणारे कारखाने नष्ट करण्यासाठी हवाई दलाला नियंत्रण रेषा ओलांडण्याची परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या भारताचे आगमन झाल्याचा संदेश दिला. इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पूर्ण युद्धाची घोषणा झाल्यावर पाकिस्तानच्या आत हवाई दलाला पाठवले होते. मोदी यांनी ती इच्छाशक्ती ४८ वर्षांनी दाखवत विमानांना एलओसीच्या आत जाण्यास मुभा दिली.

दहशतवादाविरुद्ध यापूर्वी विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी एवढेच काय डॉ. मनमोहनसिंग यांनीही असा उपाय केला नव्हता. १९८९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी रुबियाच्या बदल्यात आठ दहशतवाद्यांना सोडण्यात आले. पंतप्रधान चंद्रशेखर यांनी १९९० मध्ये सैफुद्दीन सोझ यांच्या मुलीच्या बदल्यात जेकेएलएफच्या अतिरेक्यांना सोडले. १९९३ मध्ये नरसिंह राव यांनी हजरतबाल मशिदीत ओलिस प्रकरणात अतिरेक्यांना जाऊ दिले होते. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानातील प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर व तिघांना कंदाहारमध्ये नेऊन सोडले. त्याच मसूद अझहरने २00१ मध्ये संसदेवर हल्ला घडवून आणला. डॉ. मनमोहनसिंग यांना मुंबई हल्ल्यानंतर स्ट्राइक करायचा होता. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नाही.जोखीम पत्करून कारवाई

उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी यांच्या विरोधकांनी सप्टेंबर २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही या केलेल्या टीकेला ताज्या कारवाईमुळे पूर्णविराम दिला गेला आहे. मंगळवारचा हल्ला झाला हे पाकिस्ताननेही मान्य केले आहे.१९८९ पासूनच्या पंतप्रधानांनी जे धाडस केले नाही ते मोदी यांनी करून दाखवले आणि परिणाम काहीही होवो नियंत्रण रेषेच्या आत शिरून हल्ला करण्यास मागेपुढे बघितले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पाकिस्तानला त्यांनी दिला आहे. आपण परिणामांची चिंता न करता मोठी जोखीम घेणारे आहोत हे मोदी यांनी दाखवून दिले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNarendra Modiनरेंद्र मोदीIndira Gandhiइंदिरा गांधी