शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज, एअरस्ट्राइकवरून जेटलींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 15:41 IST

 भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राइक करून पुलमावा येथील आत्मघाती हल्ल्याचा बदला घेतला होता.

ठळक मुद्दे भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राइक करून पुलमावा येथील आत्मघाती हल्ल्याचा बदला घेतला हवाई दलाच्या एअरस्ट्राइकवरून भारतात राजकारणही जोरात तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज असल्याचा टोला केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी लगावला

नवी दिल्ली -  भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राइक करून पुलमावा येथील आत्मघाती हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र हवाई दलाच्या एअरस्ट्राइकवरून भारतात राजकारणही जोरात आहे. तर  पाकिस्तान सरकार आणि तेथील लष्कर  बालाकोटमध्ये काहीच हानी झाली नसल्याचा दावा करत आहे. मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज असल्याचा टोला केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी लगावला आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ''आम्ही जेव्हा एअर स्ट्राइक केला तेव्हा आम्ही कुणालाच काही सांगितले नाही. पण याची माहिती सर्वप्रथम पाकिस्तानी सैन्यानेच जगजाहीर केली. पाकिस्तान सरकार ऐवजी तेथील सैन्याने एअर स्ट्राइकबाबत माहिती देण्याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे पाकिस्तानमधील सरकार हे तेथील लष्करच चालवते. तसेच आपल्या हातात देश सुरक्षित आहे असा भ्रम पाकिस्तानी सैन्याने निर्माण करून ठेवलेला आहे. त्यामुळे जर बालाकोटचे सत्य समोर आले तर पाकिस्तानी सैंन्याची नाचक्की होईल. त्यामुळेच बालाकोटचे वास्तव लपवण्यात येत आहे.''पाकिस्तानकडून बालाकोटचे वास्तव का नाकारण्यात येत आहे, याबाबत विचारले असता जेटली यांनी सांगितले की, ''जर पाकिस्तानने बालाकोटमध्ये असलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले आहेत, हे मान्य केले असते तर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्यांना हजार प्रश्न विचारले गेले असते. बालाकोटमध्ये काय चालले होते? कोण मारले गेले आहेत? अशी विचारणा झाल्यावर आमच्याकडे जैश ए मोहम्मदचा तळ होता आणि भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये तो उद्ध्वस्त झाला, असे उत्तर पाकिस्तानने दिले असते का?  त्याशिवाय संयुक्त राष्ट्रांसमोरही त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले असते ते वेगळेच. जर आपल्या देशात दहशतवाद्यांचे तळ आहेत हे मान्य केले अजते तर पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये जावे लागले असते. त्यामुळेच त्यांनी एवढा दणका बसल्यानंतरही गप्प राहणे पसंत केले.'' दरम्यान, भारतीय हवाई दलाने खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये चढाई केली. तसेच अचूक हल्ला करून दहशतवाद्यांचे तळही उद्ध्वस्त केले. त्याबरोबरच भारत नियंत्रण रेषेची मर्यादा पाळेल, हा भ्रमही मोडीत काढला गेला. आमच्या या धडक कारवाईनंतर जगभरातील कुठल्याही देशाने आमच्या कृतीचा निषेध केलेला नाही. कारण आम्ही निर्दोष लोकांना आणि पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य न करता दहशतवाद्यांना लक्ष्य केले होते.''असेही अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद