शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

जगबुडीच्या आधी ‘भारतबुडी’चा असेल धोका; आयपीसीसीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 06:28 IST

गेल्या महिन्यात कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्राला बसलेला अतिवृष्टी व महापुराचा तडाखा, दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटना, दोन वर्षांपूर्वी केरळमधील हाहाकार, हिमालयातील आस्मानी संकटे हे निसर्गचक्र बिघडल्याचे लक्षणे आहेत.

- श्रीमंत माने / निशांत वानखेडेनागपूर : भारतीय उपखंडाला मोसमी पावसाचे वरदान देणारा, जवळपास दोन अब्ज लोकसंख्येचे पोषण करणारा हिंदी महासागर ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्टचक्रात अडकला आहे. जगाच्या अन्य भागांत तापमानवाढीचे संकट किती भयावह असेल ही दूरची गोष्ट पण जगबुडीच्या आधी भारतालाच हवामानबदलाचा अधिक धोका असल्याचे इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)च्या अहवालाने स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यात कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्राला बसलेला अतिवृष्टी व महापुराचा तडाखा, दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटना, दोन वर्षांपूर्वी केरळमधील हाहाकार, हिमालयातील आस्मानी संकटे हे निसर्गचक्र बिघडल्याचे लक्षणे आहेत. प्रशांत, अटलांटिक किंवा अन्य महासागरांच्या तुलनेत हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान अधिक वेगाने असल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी ३.७ मिलीमीटरने वाढत आहे. सध्याच्या वेगाने एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत तीन फुटाने वाढेल व त्यामुळे समुद्रकिनारे पाण्याखाली येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आयपीसीसीसोबत एक टूल तयार केले आहे. त्यात २०२० ते २१५० पर्यंत दर दशकात पृथ्वीवरील समुद्राची पातळी कशी कशी वाढत जाईल व कोणता भाग पाण्याखाली येईल हे कळेल. भारतातील कांडला, ओखा, भावनगर, मुंबई, मुरगाव, मंगलोर, कोची, तुतीकोरीन, चेन्नई, विशाखापट्टणम, पारादीप, किद्रोपार ही शहरे पाण्याखाली येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. शंभर वर्षांचे बदल एका वर्षांतहिंदी महासागर हा पृथ्वीवरील तिसऱ्या क्रमांकाचा, २०% पाणी सामावणारा महासागर.तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत दरवर्षी ३.७ मिमी इतकी वाढ.औद्योगिक क्रांतीच्या आधी जे बदल शंभर वर्षांमध्ये घडत होते ते आता एकाच वर्षात.संपूर्ण एकविसाव्या शतकात समुद्राची पातळी वाढतच जाईल, असा इशारा.कार्बन व द्रवरूप धुलिकण उत्सर्जनामुळे मोसमी पावसाचे वेळापत्रक विस्कळीत.उत्सर्जन रोखण्यात यश मिळविले तर पावसाचे प्रमाण वाढण्याची भीती.