शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातील जहाज तोडणी उद्योग भारताकडे वळवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 03:01 IST

केंद्राचा प्रयत्न; केला नवीन कायदा

नवी दिल्ली : जहाज तोडणी व त्याच्या भंगाराच्या पुनर्प्रक्रियेसंदर्भात यंदाच्या वर्षी नवीन कायदा केल्यानंतर जगभरातील ६० टक्के जहाज तोडणी उद्योग भारताकडे वळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. युद्धनौका व अन्य प्रकारच्या जहाजांच्या तोडणीचा त्यात समावेश आहे. ही माहिती केंद्रीय जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री मनसुखलाल मांडविया यांनी दिली. ते म्हणाले की, देशामध्ये जहाज तोडणी व भंगार पुनर्प्रक्रिया उद्योगाचा पसारा आणखी मोठा झाल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न २.२ अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या या उद्योगातून १.३ अब्ज डॉलर इतके उत्पन्न मिळते. गुजरातमधील अलंग हे देशातील सर्वात मोठे जहाजतोडणी केंद्र आहे. त्याशिवाय मुंबई, कोलकाता बंदर, केरळमधील अझिक्कल येथेही हे काम केले जाते. जगभरामध्ये दरवर्षी १ हजार जुन्या जहाजांची तोडणी होऊन त्यांच्या भंगारावर पुनर्प्रक्रिया होते. त्यापैकी एकट्या भारतात ३०० जहाजांवर ही प्रक्रिया केली जाते.

जहाजतोडणीसंदर्भातील जागतिक निकष भारताने पूर्ण न केल्यामुळे तिथे अमेरिका, जपान, युरोपीय देश आजवर आपली जुनी जहाजे तोडणीसाठी पाठवत नसे. पण आता जहाज तोडणीचे काम करणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हाँगकाँग परिषदेत ज्या उपाययोजना ठरविल्या गेल्या, त्या भारताने नव्या कायद्याद्वारे मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता विविध देशांतील जहाजांच्या तोडणीचे काम भारतात मोठ्या प्रमाणावर येण्यास कोणतीच अडचण उरलेली नाही.भारताचा वाटा ३० टक्केमनसुखलाल मांडवीया यांनी सांगितले की, जगातील जहाज तोडणी उद्योगातील ९० टक्के काम हे भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश या चार देशांत चालते. त्यामध्ये भारताचा वाटा ३० टक्के असून दरवर्षी ७० लाख टन इतक्या जहाज भंगारावर देशात पुनर्प्रक्रिया केली जाते. अलंग बंदरात हाँगकाँग परिषदेने आखून दिलेल्या निकषांनुसार जहाज तोडणी कामगारांसाठी सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. त्यामुळे अमेरिका, जपान, युरोपीय देश व अन्य देशांकडूनही जुनी जहाजे तोडण्याचे काम भारताला मिळू शकेल. जगभरात ५३ हजार मोठ्या आकाराची व्यापारी जहाजे असून दरवर्षी त्यातील १ हजार जुन्या जहाजांची तोडणी होते.

टॅग्स :ministerमंत्रीIndiaभारत