शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

जगभरातील जहाज तोडणी उद्योग भारताकडे वळवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 03:01 IST

केंद्राचा प्रयत्न; केला नवीन कायदा

नवी दिल्ली : जहाज तोडणी व त्याच्या भंगाराच्या पुनर्प्रक्रियेसंदर्भात यंदाच्या वर्षी नवीन कायदा केल्यानंतर जगभरातील ६० टक्के जहाज तोडणी उद्योग भारताकडे वळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. युद्धनौका व अन्य प्रकारच्या जहाजांच्या तोडणीचा त्यात समावेश आहे. ही माहिती केंद्रीय जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री मनसुखलाल मांडविया यांनी दिली. ते म्हणाले की, देशामध्ये जहाज तोडणी व भंगार पुनर्प्रक्रिया उद्योगाचा पसारा आणखी मोठा झाल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न २.२ अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या या उद्योगातून १.३ अब्ज डॉलर इतके उत्पन्न मिळते. गुजरातमधील अलंग हे देशातील सर्वात मोठे जहाजतोडणी केंद्र आहे. त्याशिवाय मुंबई, कोलकाता बंदर, केरळमधील अझिक्कल येथेही हे काम केले जाते. जगभरामध्ये दरवर्षी १ हजार जुन्या जहाजांची तोडणी होऊन त्यांच्या भंगारावर पुनर्प्रक्रिया होते. त्यापैकी एकट्या भारतात ३०० जहाजांवर ही प्रक्रिया केली जाते.

जहाजतोडणीसंदर्भातील जागतिक निकष भारताने पूर्ण न केल्यामुळे तिथे अमेरिका, जपान, युरोपीय देश आजवर आपली जुनी जहाजे तोडणीसाठी पाठवत नसे. पण आता जहाज तोडणीचे काम करणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हाँगकाँग परिषदेत ज्या उपाययोजना ठरविल्या गेल्या, त्या भारताने नव्या कायद्याद्वारे मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता विविध देशांतील जहाजांच्या तोडणीचे काम भारतात मोठ्या प्रमाणावर येण्यास कोणतीच अडचण उरलेली नाही.भारताचा वाटा ३० टक्केमनसुखलाल मांडवीया यांनी सांगितले की, जगातील जहाज तोडणी उद्योगातील ९० टक्के काम हे भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश या चार देशांत चालते. त्यामध्ये भारताचा वाटा ३० टक्के असून दरवर्षी ७० लाख टन इतक्या जहाज भंगारावर देशात पुनर्प्रक्रिया केली जाते. अलंग बंदरात हाँगकाँग परिषदेने आखून दिलेल्या निकषांनुसार जहाज तोडणी कामगारांसाठी सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. त्यामुळे अमेरिका, जपान, युरोपीय देश व अन्य देशांकडूनही जुनी जहाजे तोडण्याचे काम भारताला मिळू शकेल. जगभरात ५३ हजार मोठ्या आकाराची व्यापारी जहाजे असून दरवर्षी त्यातील १ हजार जुन्या जहाजांची तोडणी होते.

टॅग्स :ministerमंत्रीIndiaभारत