शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही', काँग्रेस नेत्याचे थेट मोदी-शहांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 15:13 IST

'मुस्लिमांना पाठिंबा देणारा काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष'

तेलंगणा: आगामी वर्षात निवडणुका होणार आहेत. दरवेळी प्रमाणे यंदाही जाती-धर्माचे राजकारण केले जात आहे. एकीकडे भाजपकडून हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्य केले जात आहे, तर दुसरीकडे एका काँग्रेस नेत्याने भारताला हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही, असे थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहांना आव्हान दिले आहे. 

तेलंगणातील काँग्रेसचे नेते राशीद खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांवर हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवरुन निशाणा साधलाय.तसेच, भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचे तुमचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असे आव्हानही दिले आहे.

'मी जिवंत असेपर्यंत भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, आणि बजरंग दल हे त्यांचे हिंदू राष्ट्र घडवण्याचे स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाहीत. मी भारताला कधीही हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही', असे राशीद खान म्हणाले. तसेच, मुस्लिमांना पाठिंबा देणारा काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

यापूर्वी केले वादग्रस्त वक्तव्यराशीद खान यांनी यापूर्वी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आणि हिंदू धर्म स्वीकारलेल्या वसीम रिझवी म्हणजेच आताचे जितेंद्र नारायण त्यागींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. वसीम रिझवींनी 6 डिसेंबर रोजी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. यासोबतच त्यांनी आपले नाव बदलून जितेंद्र नारायण सिंह त्यागी केले होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसHinduहिंदूNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहTelanganaतेलंगणा