शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

भारत शाेधणार समुद्रातील खजिना! चंद्रयान, सूर्ययानानंतर आता सागरयान, ‘मत्स ६०००’ पाणबुडी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 07:04 IST

चेन्नईच्या राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्था ‘एनआयओटी’ने मत्स्य-६००० पाणबुडी विकसित केली आहे.

नवी दिल्ली : चंद्रावर भारताचा झेंडा फडकाविल्यानंतर आता देशातील शास्त्रज्ञ समुद्राच्या तळाशी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारताने ‘समुद्रयान’ माेहिम आखली असून स्वदेश बनावटीची ‘मत्स्य ६०००’ ही खास पाणबुडी समुद्रात खाेलवर पाठविण्यात येणार आहे. या यानाची पहिली चाचणी वर्ष २०२४च्या सुरूवातीला बंगालच्या उपसागरात चेन्नईजवळ हाेणार आहे. त्यानंतर दाेन वर्षांनी २०२६मध्ये माेहिम प्रत्यक्ष लाॅंच हाेणार आहे.चेन्नईच्या राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्था ‘एनआयओटी’ने मत्स्य-६००० पाणबुडी विकसित केली आहे. ही एक खाेल समुद्रातील माेहिम असून ‘ब्ल्यू इकाॅनाॅमी’ विकसित करण्याच्या दृष्टीकाेनातून विकसित हाेत आहे. 

समुद्राच्या पाेटात काय काय?खाेल समुद्रात वायू, पाॅलिमेटलिक मॅंगनीज नाेड्यूल, हायड्राे थर्मल सल्फाईड, निकेल व काेबाल्ट यासारखे बहुमूल्य खनिजांचा शाेध घेण्यासाठी यान पाठविण्यात येणार आहे. याशिवाय कमी तापमान असलेल्या मिथेनचाही शाेध घेण्यात येईल.

भारतासह १४ देशांनाच परवानगीसंयुक्त राष्ट्राने खाेल समुद्रात संशाेधनासाठी भारतासह केवळ १४ देशांना परवानगी दिली आहे. त्यात अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन या देशांनीच मानवसहित चाचण्यास सक्षम असलेली पाणबुडी विकसित केली आहे.

‘मत्स्य’चे वैशिष्ट्य काय?- २.१ मीटर व्यास असलेली गाेलाकार पाणबुडी.- ८० मिलीमीटर जाड टायटेनियम मिश्र धातूचा वापर.- ही पाणबुडी समुद्रात ६,००० मीटर खाेलवर जाण्यास सक्षम आहे.- समुद्रपातळीपेक्षा ६०० पट दाब सहन करू शकते.- १२-६ तास विनाथांबा काम करू शकते.- ९६ तास पुरेल एवढा प्राणवायू असेल.- ३ शास्त्रज्ञांना समुद्रात नेणार.

टॅग्स :Indiaभारत