शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारत शाेधणार समुद्रातील खजिना! चंद्रयान, सूर्ययानानंतर आता सागरयान, ‘मत्स ६०००’ पाणबुडी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 07:04 IST

चेन्नईच्या राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्था ‘एनआयओटी’ने मत्स्य-६००० पाणबुडी विकसित केली आहे.

नवी दिल्ली : चंद्रावर भारताचा झेंडा फडकाविल्यानंतर आता देशातील शास्त्रज्ञ समुद्राच्या तळाशी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारताने ‘समुद्रयान’ माेहिम आखली असून स्वदेश बनावटीची ‘मत्स्य ६०००’ ही खास पाणबुडी समुद्रात खाेलवर पाठविण्यात येणार आहे. या यानाची पहिली चाचणी वर्ष २०२४च्या सुरूवातीला बंगालच्या उपसागरात चेन्नईजवळ हाेणार आहे. त्यानंतर दाेन वर्षांनी २०२६मध्ये माेहिम प्रत्यक्ष लाॅंच हाेणार आहे.चेन्नईच्या राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्था ‘एनआयओटी’ने मत्स्य-६००० पाणबुडी विकसित केली आहे. ही एक खाेल समुद्रातील माेहिम असून ‘ब्ल्यू इकाॅनाॅमी’ विकसित करण्याच्या दृष्टीकाेनातून विकसित हाेत आहे. 

समुद्राच्या पाेटात काय काय?खाेल समुद्रात वायू, पाॅलिमेटलिक मॅंगनीज नाेड्यूल, हायड्राे थर्मल सल्फाईड, निकेल व काेबाल्ट यासारखे बहुमूल्य खनिजांचा शाेध घेण्यासाठी यान पाठविण्यात येणार आहे. याशिवाय कमी तापमान असलेल्या मिथेनचाही शाेध घेण्यात येईल.

भारतासह १४ देशांनाच परवानगीसंयुक्त राष्ट्राने खाेल समुद्रात संशाेधनासाठी भारतासह केवळ १४ देशांना परवानगी दिली आहे. त्यात अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन या देशांनीच मानवसहित चाचण्यास सक्षम असलेली पाणबुडी विकसित केली आहे.

‘मत्स्य’चे वैशिष्ट्य काय?- २.१ मीटर व्यास असलेली गाेलाकार पाणबुडी.- ८० मिलीमीटर जाड टायटेनियम मिश्र धातूचा वापर.- ही पाणबुडी समुद्रात ६,००० मीटर खाेलवर जाण्यास सक्षम आहे.- समुद्रपातळीपेक्षा ६०० पट दाब सहन करू शकते.- १२-६ तास विनाथांबा काम करू शकते.- ९६ तास पुरेल एवढा प्राणवायू असेल.- ३ शास्त्रज्ञांना समुद्रात नेणार.

टॅग्स :Indiaभारत