शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 22:16 IST

"देशातील 25 कोटी लोकंना गरिबीतून बाहेर काढले; 140 कोटी भारतीय आमची ताकद"

PM Narendra Modi : "देशात प्रचंड बदल होतोय, आपण आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या मार्गावर आहोत. आर्थिक सुधारणांद्वारे सरकारने केवळ व्यवसाय करण्यास सुलभ वातावरण निर्माण केले नाही, तर सुमारे 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे", असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते शुक्रवारी(4 ऑक्टोबर) कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

140 कोटी भारतीय आमची ताकद पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "लवकरच भारतात 5 सेमीकंडक्टर प्लांट असतील. आपण सेमीकंडक्टर चिप्स भारतात बनवून संपूर्ण जगाला पुरवू. या मेड इन इंडिया चिप्सचा भारतासह संपूर्ण जगाला फायदा होईल. सर्व प्रकारच्या धोरणात्मक सुधारणा करून भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्ण लाभ देत आहोत. 40 हजारांहून अधिक नियमांमध्ये बदल करून आम्ही कंपनी कायदा व्यावसायिकांच्या हिताचा बनवला आहे. 140 कोटी भारतीय हीच आमची ताकद आहे, आम्ही भारताच्या भल्यासाठी अधिक संरचनात्मक सुधारणा आणण्यासाठी वचनबद्ध आहोत."

जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था..."भारताच्या आर्थिक प्रगतीसोबत सर्वांना बरोबर घेऊन जात आहोत. याचाच परिणाम म्हणजे, गेल्या 10 वर्षात जवळपास 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. आम्ही सुधारणांच्या मार्गावर पुढे जात राहू. आमचे सरकार सुधारणा आणि परिवर्तन करणारे आहे. आम्ही देशाला वेगाने पुढे नेत राहू. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज भारताचा जीडीपी जगातील पाचव्या क्रमांकावर आहे. लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल", असा दावा पीएम मोदींनी यावेळी केला.

2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचे ध्येयमोदी पुढे म्हणतात, "'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' या तत्त्वावर सातत्याने निर्णय घेऊन सरकार देशाला वेगाने पुढे नेत आहे. केंद्र सरकार सातत्याने सुधारणांचा पाठपुरावा करण्यास कटिबद्ध आहे. भारतामध्ये आर्थिक वाढीसोबतच समावेशालाही चालना दिली जात आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.आज भारत हे जगातील गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे. हे गेल्या 10 वर्षांत केलेल्या सुधारणांमुळे आहे. सरकार 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनण्यास मदत करण्यासाठी संरचनात्मक सुधारणा सुरू ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे."

आज जगाचा भारतावर विश्वास आहे"मजबूत पायावर आधारित शाश्वत उच्च विकासाच्या मार्गावर भारत अव्वल स्थानावर राहण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. आज संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 81 व्या क्रमांकावरून 39 व्या स्थानावर पोहोचला आहे. आम्ही संशोधनाला प्रोत्साहन देत आहोत. भारत हा दुचाकी आणि ट्रॅक्टरचा सर्वात मोठा उत्पादक बनला आहे. पूर्वी आपण मोबाईल फोन आयात करायचो, पण आज भारतात 33 कोटींहून अधिक मोबाईल फोन बनवले जात आहेत. आज जागतिक आणीबाणीच्या काळात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारा देश बनला आहे", असेही मोदी यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतBJPभाजपा