शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

पाच वर्षांत भारत होणार गरिबी व भ्रष्टाचारमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:25 AM

मोदी सरकारची ‘थिंक टँक’ म्हणून ओळखल्या जाणा-या नीति आयोगाचे आता स्वप्नांकित वाटेवरून मार्गक्रमण सुरू झाले आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली : मोदी सरकारची ‘थिंक टँक’ म्हणून ओळखल्या जाणा-या नीति आयोगाचे आता स्वप्नांकित वाटेवरून मार्गक्रमण सुरू झाले आहे. २0२२ पर्यंत देशातील गरिबी, अस्वच्छता तर पूर्णत: दूर होईलच, त्याचबरोबर, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद आणि सांप्रदायिकता अशा षड्रिपूंपासून भारत पूर्णत: मुक्त होऊन, पंतप्रधानांच्या कल्पनेतील एक नवा भारत (न्यू इंडिया) २0२२ पर्यंत साकार झालेला असेल, असे गुलाबी स्वप्न नीति आयोगाने रंगविले आहे.नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांंनी गेल्या महिन्यात येथे झालेल्या पहिल्या राज्यपाल परिषदेत ‘न्यू इंडिया २0२२’ नावाचे जे संकल्पपत्र (व्हिजन डाक्युमेंट) सादर केले, त्यात हे स्वप्नरंजन करण्यात आले आहे.नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेची सुरू झालेली घसरण नेमक्या किती काळात दूर होईल? याबाबत नीति आयोगाने ना कोणतेही भाकीत केले आहे ना त्याची फारशी दखल घेतली आहे. अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन प्रवासात या दोन्ही आर्थिक सुधारणा भारताला लाभदायकच ठरणार आहेत, असे नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी बहुदा गृहित धरले आहे.देशभर विविध क्षेत्रात वाढत चाललेली बेरोजगारी, प्रत्येक शहरात, तसेच ग्रामीण भारतात विचित्र पद्धतीने वाढत असलेली गुन्हेगारी कशी रोखली जाईल, याबाबत कोणताही निश्चित अंदाज या गुलाबी संकल्पपत्रात नाही.२0२२ पर्यंत भारत पूर्णत: कुपोषणमुक्त.२0१९ पर्यंत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे देशातले प्रत्येक गाव मुख्य रस्त्याला जोडले जाईल.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या किमान २0 पेक्षा अधिक उच्चशिक्षणसंस्था भारतात असतील.गरिबीमुक्त भारतात पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेतल्या प्रत्येक गावाला विविध सरकारी योजनांसाठी ‘आदर्श ग्राम’चा दर्जा मिळेल.