शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त होईल, स्मृती इराणींची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 21:08 IST

आम आदमी पक्षाचे नेते खासदार सुशील कुमार गुप्ता यांनी राज्यसभेत कुपोषणाबाबत प्रश्न विचारला होता.

नवी दिल्ली - महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत बोलताना, देशातील कुपोषणासंदर्भात चर्चा केली. तसेच, 2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त देश होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक ड्रीम प्रोजेक्टपैकी 'पोषण अभियान योजना' हा एक महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. विशेष म्हणजे 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचं उद्दिष्ट असल्याचंही इराणी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं. 

आम आदमी पक्षाचे नेते खासदार सुशील कुमार गुप्ता यांनी राज्यसभेत कुपोषणाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना स्मृती इराणी यांनी पोषण अभियान योजनेसंदर्भात माहिती दिली. जेव्हा आपण कुपोषणाबाबत वाच्यता करतो, तेव्हा सॅनिटेशन, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि इतरही काही फॅक्टर्ससंदर्भात चर्चा केली जाते. पोषण अभियान जलद गतीने कार्यरत होत आहे. त्यामुळे 2022 पर्यंत देशात एकही मुल कुपोषणग्रस्त राहणार नाही. देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हे अभियान कार्यरत आहे. पोषण अभियानाची सुरुवात केली, तेव्हा 25 कोटी नागरिक या अभियानासोबत जोडले गेले आहेत. त्यानंतर, 8 ते 22 मार्च या कालावधीत पोषण पखवाडा साजरा करण्यात आला. त्यावेळी 44 कोटी 88 लाख लोकांनी सहभागी होत या योजनेला एक आंदोलन बनवल्याचं पाहायला मिळालं. शाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या मिड डे मीलसंदर्भात स्मृती यांनी माहिती दिली. शाळेतील मध्यान्य भोजन अधिक चांगल देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य सृदृढ राहिल, असेही स्मृती इराणी यांनी सांगितले.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदी