शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

2022 पर्यंत भारत भ्रष्टाचार आणि दहशतवादमुक्त असेल - निती आयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 18:28 IST

सरकारची थिंक टँक समजल्या जाणा-या निती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे. निती आयोगने केलेल्या दाव्यानुसार, 2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल.

ठळक मुद्देनिती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे'2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल''भारताचा प्रगती स्तर आठ टक्के कायम राहिला तर 2047 पर्यंत जगातील पहिल्या तीन इकॉनॉमीमध्ये भारताचा समावेश '

नवी दिल्ली - सरकारची थिंक टँक समजल्या जाणा-या निती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे. निती आयोगने केलेल्या दाव्यानुसार, 2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल. निती आयोगचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी गेल्या महिन्यात कॉन्फरन्स ऑफ गव्हर्नर्समध्ये सादर केलेल्या न्यू इंडिया @2022 डॉक्युमेंटमध्ये ही माहिती दिली आहे. भारताचा प्रगती स्तर आठ टक्के कायम राहिला तर 2047 पर्यंत जगातील पहिल्या तीन इकॉनॉमीमध्ये भारताचा समावेश असेल असा अंदाजही राजीव कुमार यांनी लावला आहे. 

2022 मध्ये भारत कुपोषणमुक्त असेल असाही अंदाज राजीव कुमार यांनी आपल्या डॉक्युमेंटमधून केला आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 2019 पर्यंत भारतात सरकार प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गावाशी जोडले जाण्यात सक्षम होईल. याशिवाय 2022 पर्यंत भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 20 उच्च शिक्षण संस्था असतील असंही सांगण्यात आलं आहे. 

प्रधानमंत्री आदर्श गाव योजनेअंतर्गत सर्व गावांना 'माडेल विलेज'चा दर्जा देण्यात येईल असंही रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे. 2022 पर्यत भारत गरिबीचा प्रश्न सोडवण्यात यशस्वी होईल असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.  

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगTerrorismदहशतवादCorruptionभ्रष्टाचार