शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

T20 WC: सीमेवर पाकच्या कुरापती वाढल्या, भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी; भाजप मंत्र्याचाही पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 18:30 IST

T20 World Cup 2021, India vs Pakistan Match: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत.

T20 World Cup 2021, India vs Pakistan Match: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे सीमेवर अनेकदा चकमकी उडत आहेत. दहशतवाद्यांकडून जम्म-काश्मीरमधील सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये नुकतंच दहशतवाद्यांनी एका पाणीपुरी विक्रेत्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात पाणीपुरीवाल्याचा मृत्यू झाला होता. बांका येथील रहिवासी असलेल्या या पाणीपुरीवाल्याच्या वडिलांनी आता ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत-पाक सामना रद्द व्हायला हवा. पाकिस्तानसोबत कोणताही संबंध ठेवला जाऊ नये. सरकारनं याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच भारत सरकारकडून ५० लाख रुपयांची नुकसान भरपाईची देखील मागणी केली आहे. 

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह काय म्हणाले?केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर मोठं विधान केलं आहे. पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये काहीच सुधारणा होत नसेल. त्यांच्या कुरापती अशाच सुरू असतील तर भारत-पाक क्रिकेट सामना रद्द करण्याबाबतचा याचा विचार करायला हवा, असं गिरीराज सिंह म्हणाले आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादाचा मुखवटा संपूर्ण जगासमोर उघड झाला आहे आणि याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असंही ते म्हणाले. राजस्थानच्या जोधपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता सिंह यांनी दोन्ही देशांमध्ये सध्याचे ताणलेले संबंध लक्षात घेता सामना रद्द करण्याबाबतचा विचार केला गेला पाहिजे, असं म्हणाले. 

पंजाब सरकारच्या मंत्र्यानंही केली मागणीदहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे कुटुंबियच नव्हे, तर पंजाब सरकारमधील मंत्री परगट सिंग यांनीही भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत-पाक सामना रद्द केला गेला पाहिजे कारण सीमेवरील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ होणार नाही याचा काळजी घेत सामना रद्द करण्याची गरज आहे, असं कॅबिनेट मंत्री परगट सिंग म्हणाले. 

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात असून यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातल्यानंतर भारतीय सैन्यानंही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोठी शोध मोहिम हाती घेतली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जात आहे. या मोहिमेत गेल्या आठवड्याभरात ९ भारतीय जवनांना वीरमरण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानबाबत संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानBCCIबीसीसीआयTeam Indiaभारतीय क्रिकेट संघT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१