शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

T20 WC: सीमेवर पाकच्या कुरापती वाढल्या, भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी; भाजप मंत्र्याचाही पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 18:30 IST

T20 World Cup 2021, India vs Pakistan Match: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत.

T20 World Cup 2021, India vs Pakistan Match: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे सीमेवर अनेकदा चकमकी उडत आहेत. दहशतवाद्यांकडून जम्म-काश्मीरमधील सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये नुकतंच दहशतवाद्यांनी एका पाणीपुरी विक्रेत्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात पाणीपुरीवाल्याचा मृत्यू झाला होता. बांका येथील रहिवासी असलेल्या या पाणीपुरीवाल्याच्या वडिलांनी आता ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत-पाक सामना रद्द व्हायला हवा. पाकिस्तानसोबत कोणताही संबंध ठेवला जाऊ नये. सरकारनं याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच भारत सरकारकडून ५० लाख रुपयांची नुकसान भरपाईची देखील मागणी केली आहे. 

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह काय म्हणाले?केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर मोठं विधान केलं आहे. पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये काहीच सुधारणा होत नसेल. त्यांच्या कुरापती अशाच सुरू असतील तर भारत-पाक क्रिकेट सामना रद्द करण्याबाबतचा याचा विचार करायला हवा, असं गिरीराज सिंह म्हणाले आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादाचा मुखवटा संपूर्ण जगासमोर उघड झाला आहे आणि याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असंही ते म्हणाले. राजस्थानच्या जोधपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता सिंह यांनी दोन्ही देशांमध्ये सध्याचे ताणलेले संबंध लक्षात घेता सामना रद्द करण्याबाबतचा विचार केला गेला पाहिजे, असं म्हणाले. 

पंजाब सरकारच्या मंत्र्यानंही केली मागणीदहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे कुटुंबियच नव्हे, तर पंजाब सरकारमधील मंत्री परगट सिंग यांनीही भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत-पाक सामना रद्द केला गेला पाहिजे कारण सीमेवरील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ होणार नाही याचा काळजी घेत सामना रद्द करण्याची गरज आहे, असं कॅबिनेट मंत्री परगट सिंग म्हणाले. 

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात असून यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातल्यानंतर भारतीय सैन्यानंही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोठी शोध मोहिम हाती घेतली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जात आहे. या मोहिमेत गेल्या आठवड्याभरात ९ भारतीय जवनांना वीरमरण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानबाबत संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानBCCIबीसीसीआयTeam Indiaभारतीय क्रिकेट संघT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१