शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
2
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
3
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
4
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
5
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
6
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
7
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
8
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
9
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
10
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
11
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
12
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
13
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
14
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
15
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
16
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
17
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
18
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
19
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
20
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव

T20 WC: सीमेवर पाकच्या कुरापती वाढल्या, भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी; भाजप मंत्र्याचाही पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 18:30 IST

T20 World Cup 2021, India vs Pakistan Match: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत.

T20 World Cup 2021, India vs Pakistan Match: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे सीमेवर अनेकदा चकमकी उडत आहेत. दहशतवाद्यांकडून जम्म-काश्मीरमधील सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये नुकतंच दहशतवाद्यांनी एका पाणीपुरी विक्रेत्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात पाणीपुरीवाल्याचा मृत्यू झाला होता. बांका येथील रहिवासी असलेल्या या पाणीपुरीवाल्याच्या वडिलांनी आता ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत-पाक सामना रद्द व्हायला हवा. पाकिस्तानसोबत कोणताही संबंध ठेवला जाऊ नये. सरकारनं याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच भारत सरकारकडून ५० लाख रुपयांची नुकसान भरपाईची देखील मागणी केली आहे. 

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह काय म्हणाले?केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर मोठं विधान केलं आहे. पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये काहीच सुधारणा होत नसेल. त्यांच्या कुरापती अशाच सुरू असतील तर भारत-पाक क्रिकेट सामना रद्द करण्याबाबतचा याचा विचार करायला हवा, असं गिरीराज सिंह म्हणाले आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादाचा मुखवटा संपूर्ण जगासमोर उघड झाला आहे आणि याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असंही ते म्हणाले. राजस्थानच्या जोधपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता सिंह यांनी दोन्ही देशांमध्ये सध्याचे ताणलेले संबंध लक्षात घेता सामना रद्द करण्याबाबतचा विचार केला गेला पाहिजे, असं म्हणाले. 

पंजाब सरकारच्या मंत्र्यानंही केली मागणीदहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे कुटुंबियच नव्हे, तर पंजाब सरकारमधील मंत्री परगट सिंग यांनीही भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत-पाक सामना रद्द केला गेला पाहिजे कारण सीमेवरील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ होणार नाही याचा काळजी घेत सामना रद्द करण्याची गरज आहे, असं कॅबिनेट मंत्री परगट सिंग म्हणाले. 

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात असून यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातल्यानंतर भारतीय सैन्यानंही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोठी शोध मोहिम हाती घेतली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जात आहे. या मोहिमेत गेल्या आठवड्याभरात ९ भारतीय जवनांना वीरमरण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानबाबत संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानBCCIबीसीसीआयTeam Indiaभारतीय क्रिकेट संघT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१