शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

‘अविश्वास’वरून रंगले इंडिया Vs एनडीए युद्ध; राहुल गांधी बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांवर गुगली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 06:24 IST

विराेधक-सत्ताधाऱ्यांत धडाकेबाज चर्चा, काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी मांडला अविश्वास प्रस्ताव 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक संघर्षप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेत मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील वादळी चर्चेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. मणिपूरमधील स्थितीबाबत पंतप्रधान मोदी गप्प आहे. अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून त्यांचे मौनव्रत आम्ही तोडू इच्छितो, अशी टीका काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी केली. ज्यांनी जनकल्याणाचे कार्य केले अशा गरिबाच्या पुत्राविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे अशी टीका भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केली. गरिबाचा पुत्र हा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात होता. 

लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या विरोधात गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. त्यावेळी विरोधक व भाजप खासदारांमध्ये खडाजंगी झाली. अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर काँग्रेस नेते राहुल गांधी मुख्य वक्ते म्हणून बोलणार आहेत, असे कळविले असताना आयत्यावेळी त्यांचे नाव मागे का घेण्यात आले, असा सवाल केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला. 

गौरव गोगोई म्हणाले की, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या चेंबरमध्ये पंतप्रधानांनी केलेली एक टिप्पणी सभागृहासमोर आली पाहिजे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका करताना सांगितले की, सभागृहातील सदस्य पंतप्रधानांबद्दल निराधार दावे करू शकत नाहीत. यावर गोगोई म्हणाले की, पंतप्रधानांचे मौन राहण्याचे कारण म्हणजे गृह विभाग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांकडून झालेले दुर्लक्ष होय. आंदोलकांकडे एक-४७ पासून अनेक हत्यार असताना राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ शकत नाही का? मणिपूरमध्ये आलेली ही शस्त्रास्त्रे उद्या दुसऱ्या राज्यांमध्ये जातील. त्यामुळे देशाच्या सुरक्षेवर, अखंडतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील. 

‘मनमोहनसिंग, अटलबिहारी वाजपेयी यांचा आदर्श ठेवा’आसाममधील कोकराझारमध्ये २०१२ मध्ये हिंसाचार झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंह तिथे गेले होते. २००२ च्या गुजरात दंगलीवेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीदेखील तिथे गेले होते, याचा उल्लेख गाेगाेई यांनी केला.

गोगोईंनी विचारले तीन प्रश्नमणिपूरमधील निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भीषण आहे. तेथील प्रत्येक घटक न्याय- हक्काची मागणी करत आहे. मणिपूरमधील संकटाची धग देशापर्यंत पोहोचली आहे. त्याबाबत देशभरातून आवाज उठवला जात असतानाही पंतप्रधान मात्र गप्प आहेत. देशाचे एक राज्य असलेल्या मणिपूरमध्ये पंतप्रधानांना का जावे वाटले नाही? या मुद्द्यावर बोलायला त्यांना ८० दिवस का लागले? कदाचित व्हिडीओ व्हायरल झाला नसता, तर पंतप्रधान आजही गप्प राहिले असते. एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुजरात, उत्तराखंड, त्रिपुरातील मुख्यमंत्री बदलले; पण मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर विशेष आशीर्वाद का?

राहुल गांधी तरी कुठे माफी मागतात?  - निशिकांत दुबेभाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत विरोधकांवर खरपूस टीका केली. ते म्हणाले की, ज्यांनी जनकल्याणाचे कार्य केले अशा गरिबाच्या पुत्राविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला? मणिपूरच्या संदर्भात तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या मुद्द्याचा आधार घेताय, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. केवळ स्थगिती दिली आहे. तुम्ही म्हणता पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत, पंतप्रधान माफी मागत नाहीत, मग तुम्ही (राहुल गांधी) कुठे माफी मागतात? सावरकरांच्या मुद्द्यावर तुम्ही माफी मागता का, तुम्ही स्वत:ची तुलना सावरकरांशी करतात, ती कधीही होऊ शकत नाही.

सलग तीन दिवस होणार चर्चाn लोकसभेचे कामकाज मंगळवारी तहकूब झाल्यानंतर अविश्वास ठरावावरील चर्चा उद्या, बुधवारीही सुरू राहणार आहे. n या प्रस्तावावर लोकसभेमध्ये ८ ते १० ऑगस्ट या कालावधीत चर्चा होईल व शेवटच्या दिवशी या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यानंतर या प्रस्तावावर मतदान घेतले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकारणाचे तीव्र पडसादकेंद्रातील मोदी सरकारविरोधात लोकसभेत मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणाचे तीव्र पडसाद उमटले.

भाजपने नऊ सरकारे पाडली नऊ वर्षांच्या कार्यकाळात केंद्रातील मोदी सरकारने काय केले? तर अरुणाचल, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, पुदुचेरी आणि महाराष्ट्र या नऊ राज्यांतील सरकारे पाडली.      - सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनRahul Gandhiराहुल गांधी