शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

इंडिया वि. भारत, कोणते नाव हवे? सर्व्हे आला, ५० टक्के लोकांनी हे मत नोंदविले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 20:56 IST

G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेनंतर हा देशाच्या नावाचा वाद सुरु झाला होता. G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या गाला डिनरच्या निमंत्रण पत्रात त्यांना 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधण्यात आले होते.

इंडिया विरुद्ध भारत नावबदलाचा वाद गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु झाला होता. आता यावर देशाचा मूड काय आहे, याचा सर्व्हे आला आहे. सी वोटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेत बहुतांश लोकांना इंडिया हे नाव तसेच हवे आहे. म्हणजेच त्यांचा इंडिया हे नाव काढून टाकण्यास विरोध आहे. 

घटनेतून इंडिया हा शब्द काढावा का? या प्रश्नावर 35.7 टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले. त्याचवेळी ५०.७ टक्के लोकांनी संविधानातून 'इंडिया' हा शब्द काढू नये, असे म्हटले आहे. तर 13.6 टक्के लोकांनी याबाबत काहीही सांगू शकत नसल्याचे सांगितले.

देशाचे नाव काय असावे असे विचारले असता? 11 टक्के लोकांनी 'इंडिया'च्या बाजूने मत टाकले. 50 टक्के लोकांनी देशाचे नाव 'भारत' असायला हवे, असे म्हटले आहे. तर 38.6 टक्के लोकांनी राज्यघटनेतील सध्याच्या व्यवस्थेनुसार दोन्ही असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 

I.N.D.I.A आघाडीमुळे भारत हा शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न झाला का? असाही प्रश्न विचारण्यात आला. 34.2 टक्के लोकांनी 'हो' असे उत्तर दिले. 41.7 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. 24.1 टक्के लोकांनी काहीच उत्तर दिले नाही. 

G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेनंतर हा देशाच्या नावाचा वाद सुरु झाला होता. G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या गाला डिनरच्या निमंत्रण पत्रात त्यांना 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापुढेही 'भारत' हा शब्द दिसत होता. यावरून मोदी इंडिया हे नाव बदलतात की काय अशी चर्चा सुरु झाली होती. े

टॅग्स :Indiaभारत