शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

विरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने असा शिकवला धडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 13:35 IST

गेल्या काही काळापासून उघडपणे भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने अद्दल घडवली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून उघडपणे भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने अद्दल घडवली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील हंगामी सदस्यत्वासाठी झालेल्या निवडणुकीत भारताने मालदीवऐवजी इंडोनेशियाला मत दिले. तसेच हिंदी महासागरातील आपल्या शेजारी देशाला अधिक मते मिळणार नाहीत, याची खबरदारी घेतल्याचे समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील हंगामी सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत भारताने आपल्यालाच मतदान केल्याचा दावा मालदीवकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात  भारताने इंडोनेशियाला मदत केल्याचे राजकीय सूत्रांनी म्हटले आहे. भारताने केलेल्या मदतीमुळे स्थायी समितीच्या हंगामी सदस्यत्वाच्या निवडणुकीत आशिया-पॅसिफिक विभागातून इंडोनेशियाने मोठ्या फरकाने विजय मिळवला.  8 जूनला झालेल्या या निवडणुकीत इंडोनेशियाच्या बाजूने 144 देशांनी मतदान केले. तर मालदिवला केवळ 46 देशांनी पाठिंबा दिला. भारताने इंडोनेशियाला मतदान करण्याचे संकेत दिल्यानंतर अनेक देशांनी मालदीवला मतदान न करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे 60 देशांचा लेखी पाठिंबा असून 30 हून अधिक देशांनी तोंडी समर्थन दिल्याचा दावा मालदिवने केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांना फारच कमी मते मिळाली. भारत आणि मालदीवमधील राजकीय संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण बनले आहेत. त्यातच मालदीव सरकारकडून विविध मुद्द्यांवर भारताला डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे  भारताने उचललेले हे पाऊल म्हणजे भारतीय हितसंबंधांविरुद्ध भूमिका घेणाऱ्या मालदिवविरोधातील पहिली दंडात्मक कारवाई मानली जात आहे. राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या कारकीर्दीत हिंदी महासागरामध्ये मालदीव हा भारताच्या संरक्षण हितसंबंधांच्या विरोधात काम करत आहे. तसेच भारताने दिलेले दोन हेलिकॉप्टरही जूव महिन्याच्या अखेरीपर्यंत परत घेऊन जाण्याचे निर्देश मालदीवने दिले होते. तसेच भारतीयांना देण्यात येणाऱ्या काम करण्याच्या परवान्यांना स्थगिती देण्याचे आदेशही आपल्या अधिकाऱ्यांना दिले होते. गेल्याच आठवड्यात भारताने मालदीवमधील राजकीय परिस्थितीबाबतचे आपले मौन सोडताना कोणतीही सुनावणी न करता राजकीय कैद्यांना शिक्षा सुनावल्याने यामीन सरकारवर टीका केली होती.   

टॅग्स :IndiaभारतMaldivesमालदीवunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ