शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

विरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने असा शिकवला धडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 13:35 IST

गेल्या काही काळापासून उघडपणे भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने अद्दल घडवली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून उघडपणे भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने अद्दल घडवली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील हंगामी सदस्यत्वासाठी झालेल्या निवडणुकीत भारताने मालदीवऐवजी इंडोनेशियाला मत दिले. तसेच हिंदी महासागरातील आपल्या शेजारी देशाला अधिक मते मिळणार नाहीत, याची खबरदारी घेतल्याचे समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील हंगामी सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत भारताने आपल्यालाच मतदान केल्याचा दावा मालदीवकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात  भारताने इंडोनेशियाला मदत केल्याचे राजकीय सूत्रांनी म्हटले आहे. भारताने केलेल्या मदतीमुळे स्थायी समितीच्या हंगामी सदस्यत्वाच्या निवडणुकीत आशिया-पॅसिफिक विभागातून इंडोनेशियाने मोठ्या फरकाने विजय मिळवला.  8 जूनला झालेल्या या निवडणुकीत इंडोनेशियाच्या बाजूने 144 देशांनी मतदान केले. तर मालदिवला केवळ 46 देशांनी पाठिंबा दिला. भारताने इंडोनेशियाला मतदान करण्याचे संकेत दिल्यानंतर अनेक देशांनी मालदीवला मतदान न करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे 60 देशांचा लेखी पाठिंबा असून 30 हून अधिक देशांनी तोंडी समर्थन दिल्याचा दावा मालदिवने केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांना फारच कमी मते मिळाली. भारत आणि मालदीवमधील राजकीय संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण बनले आहेत. त्यातच मालदीव सरकारकडून विविध मुद्द्यांवर भारताला डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे  भारताने उचललेले हे पाऊल म्हणजे भारतीय हितसंबंधांविरुद्ध भूमिका घेणाऱ्या मालदिवविरोधातील पहिली दंडात्मक कारवाई मानली जात आहे. राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या कारकीर्दीत हिंदी महासागरामध्ये मालदीव हा भारताच्या संरक्षण हितसंबंधांच्या विरोधात काम करत आहे. तसेच भारताने दिलेले दोन हेलिकॉप्टरही जूव महिन्याच्या अखेरीपर्यंत परत घेऊन जाण्याचे निर्देश मालदीवने दिले होते. तसेच भारतीयांना देण्यात येणाऱ्या काम करण्याच्या परवान्यांना स्थगिती देण्याचे आदेशही आपल्या अधिकाऱ्यांना दिले होते. गेल्याच आठवड्यात भारताने मालदीवमधील राजकीय परिस्थितीबाबतचे आपले मौन सोडताना कोणतीही सुनावणी न करता राजकीय कैद्यांना शिक्षा सुनावल्याने यामीन सरकारवर टीका केली होती.   

टॅग्स :IndiaभारतMaldivesमालदीवunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ