शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने असा शिकवला धडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 13:35 IST

गेल्या काही काळापासून उघडपणे भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने अद्दल घडवली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून उघडपणे भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने अद्दल घडवली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील हंगामी सदस्यत्वासाठी झालेल्या निवडणुकीत भारताने मालदीवऐवजी इंडोनेशियाला मत दिले. तसेच हिंदी महासागरातील आपल्या शेजारी देशाला अधिक मते मिळणार नाहीत, याची खबरदारी घेतल्याचे समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील हंगामी सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत भारताने आपल्यालाच मतदान केल्याचा दावा मालदीवकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात  भारताने इंडोनेशियाला मदत केल्याचे राजकीय सूत्रांनी म्हटले आहे. भारताने केलेल्या मदतीमुळे स्थायी समितीच्या हंगामी सदस्यत्वाच्या निवडणुकीत आशिया-पॅसिफिक विभागातून इंडोनेशियाने मोठ्या फरकाने विजय मिळवला.  8 जूनला झालेल्या या निवडणुकीत इंडोनेशियाच्या बाजूने 144 देशांनी मतदान केले. तर मालदिवला केवळ 46 देशांनी पाठिंबा दिला. भारताने इंडोनेशियाला मतदान करण्याचे संकेत दिल्यानंतर अनेक देशांनी मालदीवला मतदान न करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे 60 देशांचा लेखी पाठिंबा असून 30 हून अधिक देशांनी तोंडी समर्थन दिल्याचा दावा मालदिवने केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांना फारच कमी मते मिळाली. भारत आणि मालदीवमधील राजकीय संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण बनले आहेत. त्यातच मालदीव सरकारकडून विविध मुद्द्यांवर भारताला डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे  भारताने उचललेले हे पाऊल म्हणजे भारतीय हितसंबंधांविरुद्ध भूमिका घेणाऱ्या मालदिवविरोधातील पहिली दंडात्मक कारवाई मानली जात आहे. राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या कारकीर्दीत हिंदी महासागरामध्ये मालदीव हा भारताच्या संरक्षण हितसंबंधांच्या विरोधात काम करत आहे. तसेच भारताने दिलेले दोन हेलिकॉप्टरही जूव महिन्याच्या अखेरीपर्यंत परत घेऊन जाण्याचे निर्देश मालदीवने दिले होते. तसेच भारतीयांना देण्यात येणाऱ्या काम करण्याच्या परवान्यांना स्थगिती देण्याचे आदेशही आपल्या अधिकाऱ्यांना दिले होते. गेल्याच आठवड्यात भारताने मालदीवमधील राजकीय परिस्थितीबाबतचे आपले मौन सोडताना कोणतीही सुनावणी न करता राजकीय कैद्यांना शिक्षा सुनावल्याने यामीन सरकारवर टीका केली होती.   

टॅग्स :IndiaभारतMaldivesमालदीवunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ