शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

भारत १ लाख लोकांना तैवानला पाठवणार; मोदी सरकारच्या या निर्णयानं चीनला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 20:03 IST

चीनला कोणत्याही देशाने अधिकृतपणे तैवानशी कोणताही आर्थिक करार करावा असे वाटत नाही. चीन तैवानवर आपला दावा सांगत आहे.

नवी दिल्ली - तैवान भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी दिवाळी भेट देत आहे. यामुळे चीनला मिर्ची झोंबणार आहे. तैवान भारतातील एक लाखाहून अधिक लोकांना नोकऱ्या देणार आहे. हा करार झाल्यास भारत आणि तैवानमधील आर्थिक संबंध आणखी घट्ट होऊ शकतात. दुसरीकडे, तैवानचा शेजारी देश चीनला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. तैवान १,००,००० हून अधिक भारतीयांना कारखाने, शेतात आणि रुग्णालयांमध्ये काम करण्यासाठी नियुक्त करू शकते. डिसेंबरच्या सुरुवातीला दोन्ही बाजूंनी नोकरीच्या करारावर स्वाक्षरी केली जाऊ शकते असं अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

तैवानला मनुष्यबळाची आवश्यकता

तैवानचे लोक सतत वृद्ध होत आहेत. त्यासाठी त्यांना अधिकाधिक लोकांची गरज आहे. दुसरीकडे, भारताची अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या तुलनेत वेगवान असली तरी श्रमिक बाजारात दरवर्षी लाखो नोकऱ्या निर्माण करणे पुरेसे नाही. २०२५ पर्यंत तैवान एक "सुपर एज्ड" समाज होईल, ज्यात वृद्ध लोक लोकसंख्येच्या पाचपटीपेक्षा अधिक असतील असा अंदाज आहे. भारत-तैवान जॉब डीलमुळे चीनचं टेंशन वाढणार आहे. चीनला कोणत्याही देशाने अधिकृतपणे तैवानशी कोणताही आर्थिक करार करावा असे वाटत नाही. चीन तैवानवर आपला दावा सांगत आहे.

चर्चा अंतिम टप्प्यात

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारत-तैवान जॉब डील आता शेवटच्या टप्प्यावर आहे. ब्लूमबर्गने संपर्क साधला असता तैवानच्या कामगार मंत्रालयाने भारताच्या करारावर विशेष भाष्य केले नाही, परंतु ते म्हणाले की, जे कामगार देऊ शकतील अशा देशांच्या सहकार्याचे स्वागत करतो. तैवानला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय कामगारांचे आरोग्य प्रमाणित करण्यासाठी अद्याप एक यंत्रणा काम करत आहे अशी तज्ज्ञांनी माहिती दिली.

या देशांमध्येही नोकरीसाठी करार

तैवानमध्ये जिथे बेरोजगारीचा दर २००० नंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आला आहे, सरकारला त्याची ७९० डॉलर अब्ज अर्थव्यवस्था चालू ठेवण्यासाठी कामगारांची आवश्यकता आहे. हा करार अधिक चांगला करण्यासाठी तैवान भारतीय कामगारांना पगार आणि विमा पॉलिसी स्थानिकांच्या बरोबरीने देत आहे. भारत सरकार सध्या वृद्धत्वाचा सामना करत असलेल्या विकसित देशांसोबत नोकरीच्या करारासाठी जोर देत आहे. यावर्षी भारताने चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. तज्ञांच्या मते, भारत सरकारने आतापर्यंत जपान, फ्रान्स आणि यूकेसह १३ देशांशी करार केले आहेत. नेदरलँड, ग्रीस, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड यांच्याशीही अशीच व्यवस्था करण्याबाबत चर्चा केली जात आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन