शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर! LAC वर असेल भारताचा विशेष तळ; सीमेवर जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 18:31 IST

INDIA-China Border Issue: लडाख सीमेवर वाढत्या चिनी कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

INDIA-China Border Issue: जून २०२० पासून भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवरून तणाव असल्याचे पाहायला मिळत आहे. चीनकडून सातत्याने लडाख येथे कुरापती सुरू असून, भारताकडूनही चीनला चोख उत्तर दिले जात आहे. यासंदर्भात भारत आणि चीनदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, त्यातून ठोस असे काही निष्पन्न झाले नाही. सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताने आता एक महत्त्वाचे पाऊल उचचले असून, LAC वरील चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

सीमा सुरक्षित असतात, तेव्हा तो देश अधिक सुरक्षित असतो, अशा आशयाचे विधान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच केले होते. यानंतर आता LAC वरून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. भारत-चीन सीमेवर आता बॉर्डर इंटेलिजेंस पोस्ट तैनात करण्यात येणार आहे. BIP तैनात करण्याची तयारी केली जात आहे. या पोस्टमुळे चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. 

चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पाऊल

सीमेवर चीनच्या वाढत्या कारवाया आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केलेल्या सीमा उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक बीआयपीवर चार-पाच इंटेलिजन्स ब्युरो अधिकारी तैनात केले जातील. आयटीबीपीचे कर्मचारी त्यांचे संरक्षण करतील. बीआयपीवर तैनात केलेले सैनिक सीमापार हालचालींवर लक्ष ठेवतील. उच्च अधिकारी आणि सरकारला माहिती देतील.

दरम्यान, संपूर्ण भारत-चीन सीमेवर ITBP च्या सुमारे १८० चौक्या आहेत. अलीकडेच आणखी ४५ चौक्यांना मान्यता देण्यात आली होती. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकही गाव उरले नाही जिथे वाहने पोहोचू शकत नाहीत. ही सीमावर्ती गावे पूर्वी खूप मागास ठेवण्यात आली होती. तुम्हाला खात्री देतो की पुढील सहा महिन्यांत अरुणाचल प्रदेशातील सर्व सीमावर्ती गावांमध्ये 5G मोबाइल कनेक्टिव्हिटी असेल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndian Armyभारतीय जवान