शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर! LAC वर असेल भारताचा विशेष तळ; सीमेवर जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 18:31 IST

INDIA-China Border Issue: लडाख सीमेवर वाढत्या चिनी कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

INDIA-China Border Issue: जून २०२० पासून भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवरून तणाव असल्याचे पाहायला मिळत आहे. चीनकडून सातत्याने लडाख येथे कुरापती सुरू असून, भारताकडूनही चीनला चोख उत्तर दिले जात आहे. यासंदर्भात भारत आणि चीनदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, त्यातून ठोस असे काही निष्पन्न झाले नाही. सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताने आता एक महत्त्वाचे पाऊल उचचले असून, LAC वरील चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

सीमा सुरक्षित असतात, तेव्हा तो देश अधिक सुरक्षित असतो, अशा आशयाचे विधान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच केले होते. यानंतर आता LAC वरून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. भारत-चीन सीमेवर आता बॉर्डर इंटेलिजेंस पोस्ट तैनात करण्यात येणार आहे. BIP तैनात करण्याची तयारी केली जात आहे. या पोस्टमुळे चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. 

चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पाऊल

सीमेवर चीनच्या वाढत्या कारवाया आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केलेल्या सीमा उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक बीआयपीवर चार-पाच इंटेलिजन्स ब्युरो अधिकारी तैनात केले जातील. आयटीबीपीचे कर्मचारी त्यांचे संरक्षण करतील. बीआयपीवर तैनात केलेले सैनिक सीमापार हालचालींवर लक्ष ठेवतील. उच्च अधिकारी आणि सरकारला माहिती देतील.

दरम्यान, संपूर्ण भारत-चीन सीमेवर ITBP च्या सुमारे १८० चौक्या आहेत. अलीकडेच आणखी ४५ चौक्यांना मान्यता देण्यात आली होती. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकही गाव उरले नाही जिथे वाहने पोहोचू शकत नाहीत. ही सीमावर्ती गावे पूर्वी खूप मागास ठेवण्यात आली होती. तुम्हाला खात्री देतो की पुढील सहा महिन्यांत अरुणाचल प्रदेशातील सर्व सीमावर्ती गावांमध्ये 5G मोबाइल कनेक्टिव्हिटी असेल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndian Armyभारतीय जवान