शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Population: भारत १,४२,८६,००,०००, लोकसंख्येत चीनला टाकले मागे; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 07:51 IST

Population: कित्येक दशकांपासून लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर असलेल्या चीनला मागे टाकून भारत आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे.

नवी दिल्ली : कित्येक दशकांपासून लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर असलेल्या चीनला मागे टाकून भारत आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली, तर  चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या दर्शकानुसार ही बाब स्पष्ट झाली. १९५० पासून जागतिक स्तरावर लोकसंख्येची आकडेवारी गोळा केली जात आहे. पहिल्यांदाच भारताने सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या संयुक्त राष्ट्रांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.

संयुक्त राष्ट्र जागतिक लोकसंख्या पुस्तिका २०२२ नुसार, भारताची लोकसंख्या २०५० पर्यंत १६६.८ कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, तर चीनची लोकसंख्या १३१.७ कोटींपर्यंत घसरू शकते. अहवालानुसार, जागतिक लोकसंख्या १९५० नंतर सर्वांत कमी वेगाने वाढत आहे, २०२० मध्ये ती एक टक्क्यांहून कमी वेगाने वाढली. गेल्या वर्षी भारताची लोकसंख्या १४१.२ कोटी होती, तर चीनची लोकसंख्या १४२.६ कोटी होती. १५ नोव्हेंबर रोजी जागतिक लोकसंख्या आठ अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)

यूपी-बिहार तरुण; केरळ, पंजाब ‘वृद्ध’तज्ञांच्या मते, भारताची लोकसंख्या राज्यानुसार भिन्न आहे. केरळ आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्ध लोकसंख्या आहे, तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे.

लोकसंख्येची वयोगटांनुसार विभागणीसंयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (यूएनएफपीए)च्या नवीन अहवालानुसार, भारतातील ०-१४ वयोगटातील     २५% १० ते १९ वयोगटातील     १८%१० ते २४ वयोगटातील     २६%१५ ते ६४ वयोगटातील     ६८%लोकसंख्येपैकी सात टक्के लोक ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

तीन दशकांनंतर लोकसंख्या घटण्याची शक्यतापुढील तीन दशकांपर्यंत देशाची लोकसंख्या वाढू शकते आणि त्यानंतर ती घटायला सुरुवात होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे.

२५.४कोटी तरुणांची संख्यायूएनएफपीएच्या भारताचे प्रतिनिधी आणि भूतानच्या ‘कंट्री डायरेक्ट’ आंद्रिया वोजनर म्हणाल्या, ‘भारताच्या १.४ अब्ज लोकांकडे १.४ अब्ज संधी म्हणून पाहिले पाहिजे. देशाची २५.४ कोटी लोकसंख्या ही तरुणांची आहे (१५ ते २४ वयोगटातील). 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय