शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

जोरदार...! चीन 1, अमेरिका 2, भारत 3...! या यादीत झाला मोठा बदल, भारतानं जर्मनीला मागे टाकलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:53 IST

१९४० नंतर पहिल्यांदाच 'हा' आकडा ४०% पार गेला आहे. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यूच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे...

भारताने २०२४ मध्ये पवन ऊर्जा आणि सौर उर्जेपासून वीज निर्मिती करण्याच्या बाबतीत जर्मनीलाही मागे टाकत, एक मोठी झेप घेतली आहे. आता भारत या बाबतीत जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे. एका अहवालानुसार, भारताने जागतिक पातळीवर पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेपासून १५% वीजेची निर्मिती केली आहे. भारतात कमी कार्बन स्रोतांपासून (जसे की अक्षय ऊर्जा आणि अणुऊर्जा) 40.9% विजेची निर्मिती झाली आहे. १९४० नंतर पहिल्यांदाच हा आकडा ४०% पार गेला आहे. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यूच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

आता पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. या बाबतीत भारताने २०२४ मध्ये जर्मनीलाही मागे टाकले आहे. पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या जगातील एकूण विजेपैकी १५% वीज एकट्या भारताने तयार केली.

भारताची जोरदार कामगिरी - भारतात स्वच्छ स्रोतांपासून निर्माण होणाऱ्या विजेपैकी ८% जलविद्युत आणि १०% पवन आणि सौरऊर्जेपासून तयार झाली. २०२४ मध्ये जगभरात ८५८ टेरावॅट एवढ्या स्वच्छ ऊर्जेची भर पडली. हे प्रमाण २०२२ च्या तुलनेत ४९% अधिक आहे. भारतात २०२४ मध्ये निर्माण झालेल्या एकूण वीजेपैकी ७% वीज सौर ऊर्जेपासून निर्माण झाली. २०२१ च्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. याच बरोबर, भारत आता चीन आणि अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौरऊर्जा बाजार बनला आहे.

यासंदर्भात बोलताना एम्बरचे व्यवस्थापकीय संचालक फिल मॅकडोनाल्ड म्हणाले, "बॅटरी स्टोरेजसह सौरऊर्जा ही जागतिक ऊर्जा बदलाचा केंद्रबिंदू बनली आहे." या अहवालात ८८ देशांचा समावेश आहे. हे देश जगातील ९३% वीज मागणी पूर्ण करतात.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिकाGermanyजर्मनी