शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

भारताने केले 'प्रलय' क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण, 150-500 KM अंतरापर्यंत मारा करण्यास सक्षम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 14:33 IST

आज ओडिशाच्या किनारपट्टीवर डीआरडीओने तयार केलेल्या बॅलिस्टिक मिसाइल 'प्रलय'चे यशस्वी परीक्षण झाले.

नवी दिल्ली: भारतीय लष्कराची ताकत आता आणखी वाढणार आहे. कारण, आज(बुधवार) भारताने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या 'प्रलय' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र 150 ते 500 किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ही चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवर करण्यात आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी 10.30 वाजता प्रक्षेपित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने मोहिमेतील सर्व उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ट्रॅकिंग उपकरणांच्या बॅटरीने किनारपट्टीवर प्रक्षेपणाचे निरीक्षण केले. प्रलय हे 500-1,000 किलोग्रॅम पेलोड क्षमतेचे क्षेपणास्त्र आहे. त्यामुळे रणांगणात शत्रूचा नाश करण्यासाठी याचा खूप उपयोग होईल.

चिनी क्षेपणास्त्रांचा सामना करण्यास सक्षम

सूत्रांचे म्हणणे आहे की, या क्षेपणास्त्राचा उल्लेख डीआरडीओने 2015 साली केला होता. वार्षिक अहवालात सांगितले होते की, हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र एक सर्वनाश आहे, जे चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीसह कन्सटरमधूनही डागता येते. या क्षेपणास्त्राची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ते इतर कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपेक्षा कितीतरी जास्त प्राणघातक आहे. त्याच्या लक्ष्यावर अचूक मारा करण्याची तसेच ते नष्ट करण्याची क्षमता यात आहे.

अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्ज

प्रलय क्षेपणास्त्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. या काळातील ही सर्वात मोठी मागणी आहे. अलीकडे चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांनी अनेक प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत. पण हे देश भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमालाही विरोध करतात. अशा परिस्थितीत भारताने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम वाढवणे गरजेचे आहे. जेणेकरून शत्रूच्या कोणत्याही प्रकारच्या धोक्याला तोंड देण्यासाठी स्वत:ला सज्ज ठेवता येईल.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केले

या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि त्याच्याशी संबंधित टीमचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट केले की, 'पहिल्या विकास उड्डाण चाचणीसाठी DRDO आणि संबंधित टीम्सचे अभिनंदन. बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी मी त्यांचे कौतुक करतो. आज एक महत्त्वाचा टप्पा आगाठला गेला आहे. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागOdishaओदिशा