शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

सायबर क्राइममध्ये भारत जगात ‘नंबर वन’, महाराष्ट्रातील स्थितीही चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 07:40 IST

देशात ६८ टक्के यूझर्स ठरले विविध गुन्ह्यांचे बळी

महेश घाेराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नोटाबंदी तसेच कोविडनंतर देशात ऑनलाइन सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मोबाइल इंटरनेटचा वापर चैनीबरोबरच सोयीचाही झाला. मात्र दुसरीकडे सायबर क्राइमच्या घटनांमध्ये भरमसाठ वाढ झाली. चिंतेची बाब म्हणजे सायब्रर क्राइम आणि त्याला बळी पडलेल्यांमध्ये जगात भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात ६८% यूझर्सनी डिसेंबर २०२२ पर्यंत कोणत्या ना कोणत्या सायबर गुन्ह्याचा अनुभव घेतला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ दरम्यानच्या एका सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. अमेरिका अशा घटनांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे ४९% लोकांना सायबर क्राइमचा वाईट अनुभव आहे.

महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक

- सायबर विश्वातून होणारा पाठलाग अर्थात सायबर स्टाॅकिंगमध्ये महाराष्ट्र २०२१ मध्ये देशात आघाडीवर होता. देशभरात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रातून समोर आली होती. - अजूनही महाराष्ट्रात आक्षेपार्ह डाटा व्हायलर, ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, लॉटरी घोटाळे, लैंगिक छळ, बँकिंगशी संबंधित गुन्हे आदीचे प्रमाण चिंताजनक आहे. - वाढते कॅशलेश व्यवहार, कोविडनंतर ऑनलाइन सेवांमध्ये झालेली वाढ याबरोबरच सायबर क्राइमचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले.

देशनिहाय यूझर्सचे प्रमाण

  • ६८% - भारत
  • ४९% - अमेरिका
  • ४०% - ऑस्ट्रेलिया 
  • ३८% - न्यूझीलंड
  • ३३% - इंग्लंड
  • ३३% - फ्रान्स
  • ३०% - जर्मनी 
  • २१% - जपान

(स्त्रोत : स्टॅटिस्टा रिपोर्ट, डिसेंबर २०२२ पर्यंतची स्थिती)

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndiaभारतAmericaअमेरिकाMaharashtraमहाराष्ट्र