शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

सायबर क्राइममध्ये भारत जगात ‘नंबर वन’, महाराष्ट्रातील स्थितीही चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 07:40 IST

देशात ६८ टक्के यूझर्स ठरले विविध गुन्ह्यांचे बळी

महेश घाेराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नोटाबंदी तसेच कोविडनंतर देशात ऑनलाइन सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मोबाइल इंटरनेटचा वापर चैनीबरोबरच सोयीचाही झाला. मात्र दुसरीकडे सायबर क्राइमच्या घटनांमध्ये भरमसाठ वाढ झाली. चिंतेची बाब म्हणजे सायब्रर क्राइम आणि त्याला बळी पडलेल्यांमध्ये जगात भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात ६८% यूझर्सनी डिसेंबर २०२२ पर्यंत कोणत्या ना कोणत्या सायबर गुन्ह्याचा अनुभव घेतला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ दरम्यानच्या एका सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. अमेरिका अशा घटनांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे ४९% लोकांना सायबर क्राइमचा वाईट अनुभव आहे.

महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक

- सायबर विश्वातून होणारा पाठलाग अर्थात सायबर स्टाॅकिंगमध्ये महाराष्ट्र २०२१ मध्ये देशात आघाडीवर होता. देशभरात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रातून समोर आली होती. - अजूनही महाराष्ट्रात आक्षेपार्ह डाटा व्हायलर, ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, लॉटरी घोटाळे, लैंगिक छळ, बँकिंगशी संबंधित गुन्हे आदीचे प्रमाण चिंताजनक आहे. - वाढते कॅशलेश व्यवहार, कोविडनंतर ऑनलाइन सेवांमध्ये झालेली वाढ याबरोबरच सायबर क्राइमचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले.

देशनिहाय यूझर्सचे प्रमाण

  • ६८% - भारत
  • ४९% - अमेरिका
  • ४०% - ऑस्ट्रेलिया 
  • ३८% - न्यूझीलंड
  • ३३% - इंग्लंड
  • ३३% - फ्रान्स
  • ३०% - जर्मनी 
  • २१% - जपान

(स्त्रोत : स्टॅटिस्टा रिपोर्ट, डिसेंबर २०२२ पर्यंतची स्थिती)

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndiaभारतAmericaअमेरिकाMaharashtraमहाराष्ट्र