शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बिहारसाठी ‘इंडिया’ने ६ महिने आधीच थोपटले दंड, तेजस्वी यादव व राहुल गांधी-खरगेंची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:04 IST

Tejashwi Yadav Mallikarjun Kharge India Alliance: सत्ताबदलासाठी सर्व प्रयत्न करताना जनहित डोळ्यासमोर ठेवून राजकीय धोरणाची निश्चिती करण्यावर या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली / पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीतील घटक पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंगळवारी दिल्लीत राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते व राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. 

बिहारमध्ये आघाडीच्या विजयासाठी आवश्यक राजकीय गणितांवर यावेळी चर्चा झाली. सत्ताबदलासाठी सर्व प्रयत्न करताना जनहित डोळ्यासमोर ठेवून राजकीय धोरणाची निश्चिती करण्यावर या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री कोण? तेजस्वी म्हणाले, नंतर पाहू

यावेळी प्रचारात इंडिया आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न पत्रकारांनी तेजस्वी यांना विचारला. यावर कोणतेही भाष्य न करता दि. १७ एप्रिलला पाटण्यात होत असलेल्या बैठकीनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले. 

मुख्यमंत्री सैनींच्या वक्तव्याने खळबळ; मग सावरासारव

हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी बिहारमध्ये भाजप नेते व उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी विजय खेचून आणतील, असा दावा केल्याने राजकीय खळबळ उडाली होती.

जदयू नेते नितीशकुमार यांना थेट आव्हान ठरणारे हे वक्तव्य असल्याने विरोधकांनीही हा मुद्दा तापविला होता. शेवटी जदयूने नितीशकुमार यांच्याकडेच नेतृत्व राहील, हे निक्षून सांगितले आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला.

नेतृत्व नितीशकुमार यांच्याकडेच : जदयू 

बिहारमध्ये भाजपप्रणीत एनडीए एकत्रित लढणार असून, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नितीशकुमारच असतील, असे जनता दलाचे (युनायडेट) राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी ठासून सांगितले. सत्ताधारी आघाडीत यावरून कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :BiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूक 2024