शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भारताने तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक वातावरणाचा लाभ घ्यावा, चीनच्या उलट्या बोंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 00:36 IST

China : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) ९ एप्रिलच्या चर्चेबाबत एक निवेदन जारी केले आहे.

बिजींग : पूर्व लडाखच्या उर्वरित भागांतून सैनिकांच्या वापसीबाबत भारत-चीन दरम्यानच्या चर्चेत यश मिळाल्यानंतर चीनने म्हटले आहे की, भारताने सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी विद्यमान सकारात्मक वातावरणाचा लाभ घेतला पाहिजे.दोन्ही देशांत ११व्या फेरीची चर्चा १३ तास चालल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय लष्कराने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देशांनी पूर्व लडाखमध्ये हॉट स्प्रिंग, गोगरा व देपसांगमध्ये तणाव असणाऱ्या उर्वरित भागांतून सैनिकांच्या वापसीबाबत तपशीलवार चर्चा केली. शांतता राखणे, नवीन तणाव न वाढविणे व उर्वरित मुद्द्यांवर जलद गतीने तोडगा काढण्यावर सहमती झाली आहे.दरम्यान, याप्रक्रियेत असणाऱ्या व्यक्तींनी दिल्लीत सांगितले होते की, दोन्ही देशांत लष्करी चर्चा झाली असली तरी त्यात ठोस प्रगती झालेली नाही. कारण चीनचे शिष्टमंडळ पूर्वविचार करूनच चर्चेत सहभागी झाले होते. त्या देशाने संघर्षरत उर्वरित भागांमध्ये सैनिक मागे घेण्याच्या प्रक्रियेवर पुढचे पाऊल उचलण्याच्या दिशेने कोणतीही लवचिकता दाखविली नाही.चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) ९ एप्रिलच्या चर्चेबाबत एक निवेदन जारी केले आहे. फेब्रुवारीमध्ये पेंगाँग सरोवराच्या बहुतांश वादग्रस्त भागांत सैनिकांच्या वापसीकडे इशारा करीत म्हटले आहे की, भारताने सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दिशेने पुढे आले पाहिजे.वास्तविक नियंत्रण रेषेवर भारताच्या बाजूच्या चुशूल सीमा केंद्रावर झालेल्या चर्चेबाबत पीएलएने जारी केलेल्या निवेदनाचा हवाला देऊन चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने (सीजीटीएन) म्हटले आहे की, मागील चर्चेतील सहमतीवर दोन्ही देशांनी आता पुढचे पाऊल टाकण्याची गरज आहे. 

सीमेवर शांतता स्थापित करण्यासाठी पुढे यावेपीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, मागील चर्चांमध्ये झालेल्या सहमतीचे पालन करून सीमा भागातील तणाव कमी करण्यासाठी विद्यमान सकारात्मक वातावरणाचा भारत लाभ घेईल. त्याचबरोबर सीमेवर शांतता स्थापित करण्याच्या दिशेने पुढे येईल, अशी आशा आहे. कारण चीनही त्याच दिशेने पुढे सरकत आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतladakhलडाख