शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे; मणिशंकर अय्यर यांच्या व्हिडीओने वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 06:01 IST

भाजपचे टीकास्त्र, काँग्रेस वक्तव्याशी असहमत

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांची वादग्रस्त वक्यव्ये गाजत असताना मणिशंकर अय्यर यांनी भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहे हे आपण विसरता कामा नये, कोणी माथेफिरू सत्तेवर आला तर तो आपल्याविरुद्ध वापरू शकतो, अशी प्रतिक्रिया दिलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, भाजपने त्यावर टीका केली आहे. अय्यर यांच्या वक्तव्याशी पक्ष असहमत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.  एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा खूप महत्त्वाची आहेअय्यर म्हणाले, पाकिस्तानमध्ये दहशतवाद आहे, या कारणाखाली केंद्र सरकार पाकिस्तानशी चर्चा करणार नाही असे म्हणते, हे मला समजत नाही. दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा खूप महत्त्वाची आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा भारत अहंकारातून आपल्याला जगात हिणवत आहे, असे पाकिस्तानला वाटेल. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील एखादा सत्ताधारी माथेफिरू हा बॉम्ब भारताविरुद्धवापरू शकतो. 

प्रचार मोहीम फसल्याने जुने व्हिडीओ काढत आहेतपाकिस्तानबाबतचा व्हायरल झालेला व्हिडीओ जुना आहे आणि भाजपचा लोकसभेचा प्रचार फसल्यामुळे ते जुने व्हिडीओ काढत आहेत. व्हिडीओत मी घातलेल्या स्वेटरवरून हे स्पष्ट आहे की माझी टिपणी अनेक महिन्यांपूर्वी हिवाळ्यातली होती. भाजपच्या या खेळात मी पडणार नाही.- मणिशंकर अय्यर, काँग्रेस नेते

जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्नजनतेचे लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी भाजपने अय्यर यांचा जुना व्हिडीओ व्हायरल केला. व्हिडीओत अय्यर कोणत्याही अधिकारांतर्गत पक्षाची भूमिका मांडत नव्हते. काही महिन्यांपूर्वी अय्यर यांनी केलेल्या वक्तव्याशी काँग्रेस पूर्णपणे असहमत आहे. - पवन खेडा, काँग्रेस               प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष

ही विचारसरणी काँग्रेसचीहे तेच मणिशंकर अय्यर आहेत जे नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी पाकिस्तानात गेले होते. २६/११ पुलवामा हल्ल्यांबाबत अनेक काँग्रेस नेते पाकला क्लीन चिट देत आहेत. त्यांच्यासाठी दहशतवाद्यांना पाठवणारा आदरणीय आहे, तर भारतीय लष्कर हे रस्त्यावरील गुंड आहेत. त्यामुळे आता काँग्रेसचे नेतेही पाकिस्तानबद्दल आदर दाखवत आहेत. ही विचारसरणी केवळ मणिशंकर अय्यर यांची नाही, तर संपूर्ण काँग्रेसची आहे. सध्याच्या निवडणुकांमध्ये व्होट बँकेसाठी हा एक प्रयोग आहे.- शेहजाद पूनावाला, प्रवक्ते, भाजप

काँग्रेस पाकविरुद्ध मवाळभारताने पाकला घाबरावे आणि त्याचा आदर करावा, अशी अय्यर यांची इच्छा असल्याचे दिसते. परंतु नवा भारत कोणालाही घाबरत नाही. अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे हेतू, धोरणे आणि वैचारिकता उघड झाली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पाकिस्तान आणि त्यांच्या भूमीवर वाढणाऱ्या दहशतवादापुढे शरणागती पत्करली आहे. - राजीव चंद्रशेखर, केंद्रीय मंत्री

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाPakistanपाकिस्तान