शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

'दहशतवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानची मदत करण्यास भारत तयार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 11:17 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करू' असे आवाहन पाकिस्तानला केले आहे.

ठळक मुद्दे'दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करू'दहशतवाद नष्ट करण्यासाठी भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे.भारताने दहशतवाद्यांना  नष्ट करण्यासाठी पावलं उचलली आहेत.

चंदौली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करू' असे आवाहन पाकिस्तानला केले आहे. 'दहशतवाद नष्ट करण्यासाठी भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे. दहशतवाद्यांविरोधात निर्णायक युद्ध व्हायला हवे. पाकिस्तानमधील दहशतवादाचा समूळ नाश करायला हवा यासाठी आमच्या सरकारने तयारी केली आहे' असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

जगभरातले अनेक देश दहशतवादाशी लढत आहेत. भारताने दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी पावलं उचलली आहेत. या कामात भारताला जगभरातील अनेक देशांकडून समर्थन मिळत आहे. या कामात जगभरातील अनेक देश भारताच्या पाठिशी उभे आहेत. जर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात पावलं उचलली, तर भारत पाकिस्तानाला सहकार्य करेल असंही त्यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमधील चंदौली येथे शनिवारी (2 मार्च) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याआधी देखील काही महिन्यांपूर्वी दहशतवादाला एकट्याने पायबंद घालता येत नसेल, तर त्यासाठी पाकिस्तानने भारताची मदत घ्यावी, असे म्हटले होते. अफगाणिस्तानमधील तालिबानींना संपविण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेची मदत घेतली होती. सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा मुद्दा गंभीर आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानने भारताशी चर्चा केली पाहिजे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे राजनाथ सिंह यांनी ठामपणे सांगितले होते.

समझौता एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार! 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतपाकिस्तानदरम्यान धावणारी रद्द करण्यात आलेली समझौता एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार आहे. 

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेनंतर समझौता एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील रेल्वे विभागाने समझौता एक्सप्रेसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे दर रविवारी आणि बुधवारी दिल्लीतून पाकिस्तानला रवाना होणारी समझौता एक्सप्रेस आज रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी अटारीला जाणार आहे. त्यानंतर लाहोरला जाणार आहे. तसेच, समझौता एक्स्प्रेस दर सोमवारी आणि गुरुवारी पाकिस्तानमधून भारतात रवाना होणार आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद