शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'दहशतवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानची मदत करण्यास भारत तयार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 11:17 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करू' असे आवाहन पाकिस्तानला केले आहे.

ठळक मुद्दे'दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करू'दहशतवाद नष्ट करण्यासाठी भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे.भारताने दहशतवाद्यांना  नष्ट करण्यासाठी पावलं उचलली आहेत.

चंदौली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करू' असे आवाहन पाकिस्तानला केले आहे. 'दहशतवाद नष्ट करण्यासाठी भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे. दहशतवाद्यांविरोधात निर्णायक युद्ध व्हायला हवे. पाकिस्तानमधील दहशतवादाचा समूळ नाश करायला हवा यासाठी आमच्या सरकारने तयारी केली आहे' असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

जगभरातले अनेक देश दहशतवादाशी लढत आहेत. भारताने दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी पावलं उचलली आहेत. या कामात भारताला जगभरातील अनेक देशांकडून समर्थन मिळत आहे. या कामात जगभरातील अनेक देश भारताच्या पाठिशी उभे आहेत. जर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात पावलं उचलली, तर भारत पाकिस्तानाला सहकार्य करेल असंही त्यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमधील चंदौली येथे शनिवारी (2 मार्च) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याआधी देखील काही महिन्यांपूर्वी दहशतवादाला एकट्याने पायबंद घालता येत नसेल, तर त्यासाठी पाकिस्तानने भारताची मदत घ्यावी, असे म्हटले होते. अफगाणिस्तानमधील तालिबानींना संपविण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेची मदत घेतली होती. सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा मुद्दा गंभीर आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानने भारताशी चर्चा केली पाहिजे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे राजनाथ सिंह यांनी ठामपणे सांगितले होते.

समझौता एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार! 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतपाकिस्तानदरम्यान धावणारी रद्द करण्यात आलेली समझौता एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार आहे. 

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेनंतर समझौता एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील रेल्वे विभागाने समझौता एक्सप्रेसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे दर रविवारी आणि बुधवारी दिल्लीतून पाकिस्तानला रवाना होणारी समझौता एक्सप्रेस आज रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी अटारीला जाणार आहे. त्यानंतर लाहोरला जाणार आहे. तसेच, समझौता एक्स्प्रेस दर सोमवारी आणि गुरुवारी पाकिस्तानमधून भारतात रवाना होणार आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद