शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

२०३६ पर्यंत भारताची लोकसंख्या किती असणार? सरकारी अहवालात धक्कादायक आकडेवारीचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 20:57 IST

भारताची लोकसंख्या सध्या १४४.१७ कोटींच्या पुढे गेली आहे आणि आता सरकारने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Indian Population in 2036 :भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला केव्हाच मागे टाकलं आहे. पण आता सरकारी आकडेवारीनुसार २०३६ पर्यंत देशाच्या लोकसंख्येबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अवघ्या काही वर्षात भारताची लोकसंख्या ही दहा कोटींनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारताची लोकसंख्या २०२६ मध्ये १५२.२ कोटीपर्यंत पोहोचू शकते. सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने सोमवारी याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

पुढील १२ वर्षात म्हणजेच २०३६ पर्यंत देशाची लोकसंख्या १५० कोटींचा आकडा पार करेल असा सरकारी आकडेवारीचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारताने चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला होता. त्यावेळी चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी होती आणि भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटींवर पोहोचली होती. १९५० नंतर भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ होती.

मात्र, आता समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार १२ वर्षांनंतर भारताची लोकसंख्या १५२.२ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या ‘भारतातील महिला आणि पुरुष २०२३’ या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार लिंग गुणोत्तर २०३६ पर्यंत १००० पुरुषांमागे ९५२ महिलांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. २०११ च्या जनगणनेत हा आकडा ९४३ इतका होता.

अहवालानुसार, लोकसंख्येत महिलांच्या टक्केवारीतही थोडीशी सुधारणा दिसून येणार आहे. २०३६ मध्ये महिलांची टक्केवारी ४८.८ टक्के पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. २०११ मध्ये ती ४८.५ टक्के होती. प्रजनन दरात घट झाल्यामुळे, २०११ च्या तुलनेत २०३६ मध्ये १५ वर्षांखालील लोकांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत, ६० वर्षे आणि त्यावरील लोकसंख्येचे प्रमाण वेगाने वाढेल.

दरम्यान, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने एप्रिल २०२४ मध्ये एका अहवालात दावा केला होता की, गेल्या ७७ वर्षांत भारताची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. भारताची लोकसंख्या ही १४४.१७ कोटींवर पोहोचली आहे. या अहवालानुसार, देशात २००६ ते २०२३ दरम्यान २३ बालविवाह झाले आहेत. तसेच, प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून ० ते १४ वर्षे वयोगटातील लोक भारताच्या एकूण लोकसंख्येच्या २४ टक्के आहेत. १५ ते ६४ वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ६४ टक्के आहे.

दरम्यान, १ जानेवारी २०२४ रोजी जगाची लोकसंख्या 8 अब्जांच्या पुढे गेली आहे. १ जानेवारी २०२३ रोजी हा आकडा ७.९४ अब्ज होता. अमेरिकेच्या सेन्सस ब्युरोच्या एका अहवालानुसार २०२३ मध्ये जगाच्या लोकसंख्येमध्ये सुमारे ७५ दशलक्षने वाढ झाली आहे. जगात दर सेकंदाला ४.३ लोक जन्माला येतात, तर दर सेकंदाला २ लोकांचा मृत्यू होतो.

टॅग्स :IndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार