शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

२०३६ पर्यंत भारताची लोकसंख्या किती असणार? सरकारी अहवालात धक्कादायक आकडेवारीचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 20:57 IST

भारताची लोकसंख्या सध्या १४४.१७ कोटींच्या पुढे गेली आहे आणि आता सरकारने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Indian Population in 2036 :भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला केव्हाच मागे टाकलं आहे. पण आता सरकारी आकडेवारीनुसार २०३६ पर्यंत देशाच्या लोकसंख्येबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अवघ्या काही वर्षात भारताची लोकसंख्या ही दहा कोटींनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारताची लोकसंख्या २०२६ मध्ये १५२.२ कोटीपर्यंत पोहोचू शकते. सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने सोमवारी याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

पुढील १२ वर्षात म्हणजेच २०३६ पर्यंत देशाची लोकसंख्या १५० कोटींचा आकडा पार करेल असा सरकारी आकडेवारीचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारताने चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला होता. त्यावेळी चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी होती आणि भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटींवर पोहोचली होती. १९५० नंतर भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ होती.

मात्र, आता समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार १२ वर्षांनंतर भारताची लोकसंख्या १५२.२ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या ‘भारतातील महिला आणि पुरुष २०२३’ या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार लिंग गुणोत्तर २०३६ पर्यंत १००० पुरुषांमागे ९५२ महिलांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. २०११ च्या जनगणनेत हा आकडा ९४३ इतका होता.

अहवालानुसार, लोकसंख्येत महिलांच्या टक्केवारीतही थोडीशी सुधारणा दिसून येणार आहे. २०३६ मध्ये महिलांची टक्केवारी ४८.८ टक्के पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. २०११ मध्ये ती ४८.५ टक्के होती. प्रजनन दरात घट झाल्यामुळे, २०११ च्या तुलनेत २०३६ मध्ये १५ वर्षांखालील लोकांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत, ६० वर्षे आणि त्यावरील लोकसंख्येचे प्रमाण वेगाने वाढेल.

दरम्यान, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने एप्रिल २०२४ मध्ये एका अहवालात दावा केला होता की, गेल्या ७७ वर्षांत भारताची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. भारताची लोकसंख्या ही १४४.१७ कोटींवर पोहोचली आहे. या अहवालानुसार, देशात २००६ ते २०२३ दरम्यान २३ बालविवाह झाले आहेत. तसेच, प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून ० ते १४ वर्षे वयोगटातील लोक भारताच्या एकूण लोकसंख्येच्या २४ टक्के आहेत. १५ ते ६४ वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ६४ टक्के आहे.

दरम्यान, १ जानेवारी २०२४ रोजी जगाची लोकसंख्या 8 अब्जांच्या पुढे गेली आहे. १ जानेवारी २०२३ रोजी हा आकडा ७.९४ अब्ज होता. अमेरिकेच्या सेन्सस ब्युरोच्या एका अहवालानुसार २०२३ मध्ये जगाच्या लोकसंख्येमध्ये सुमारे ७५ दशलक्षने वाढ झाली आहे. जगात दर सेकंदाला ४.३ लोक जन्माला येतात, तर दर सेकंदाला २ लोकांचा मृत्यू होतो.

टॅग्स :IndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार