शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:47 IST

India-Pakistan Tension : 'सीमेच्या दोन्ही बाजूंनी निष्पाप लोकांचे जीव जात आहेत.'

India-Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने काल भारतातील अनेक शहरांवर ड्रोनने हल्ला केला. पण, भारतीय सैन्यानेही पाकिस्तानचे हल्ले परतून लावले. दरम्यान, पीडीपी प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. 

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, 'भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सीमेच्या दोन्ही बाजूंनी निष्पाप लोकांचे जीव घेत आहे. या कठीण काळात संयम आवश्यक आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांनी आणि लष्करी कमांडरनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एकत्र येऊन शांततापूर्ण तोडगा काढणे, तसेच जीवित आणि मालमत्तेचे आणखी नुकसान टाळणे महत्त्वाचे आहे.'

'तुम्हा सर्वांना भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीची माहिती आहेच. सीमेवरील लोक, महिला आणि मुले बेघर होत आहेत. दोन्ही बाजूंनी असे नागरिक मारले जात आहेत, ज्यांनी कधीही या कारवाईचे समर्थन केले नाही. पुलवामा असो किंवा पहलगाम, दोन्ही घटनांनी आपल्याला धोक्याच्या उंबरठ्यावर आणले आहे. यावर उपाय काढणे गरजेचे आहे.' हे बोलत असताना मेहबूबा मुफ्ती भावुक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाMehbooba Muftiमेहबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीर