शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 16:20 IST

India pakistan tensions rise: पाकिस्तानने भारतातील काही लष्करी तळावरच मिसाईल आणि ड्रोन्स हल्ले केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या दोन राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानातील ९ ठिकाणं उद्ध्वस्त केली. भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या जबरदस्त प्रहाराने मात्र पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. २२ एप्रिलपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या मिसाईल्स भारतीय लष्कराने हाणून पाडल्या. त्यानंतर आता पंजाब आणि राजस्थानमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला असून, पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारताच्या दहशतवाद्यांवरील कारवाईने पाकिस्तानच बिथरला असून, सीमेपलिकडून अंदाधूंद गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानी लष्कराकडून सीमेलगत असलेल्या भारतीय गावांवर उखळी तोफा आणि तोफेगोळे डागले जात आहेत. त्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पंजाब आणि राजस्थान सीमेवर अलर्ट

पंजाबची ५३२ किमी सीमा पाकिस्तानला लागून आहेत, तर राजस्थानची तब्बल १०७० सीमा आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात आहे. 

वाचा >>पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंजाबमधील पोलीस विभागाने सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर वाढता तणाव लक्षात घेऊन सरकारने सीमावर्ती भागात असलेल्या सहा जिल्ह्यातील म्हणजे फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, अमृतसर, गुरूदासपूर आणि तरनतारन या जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या जिल्ह्यांतील शाळा पुढील आदेश देईपर्यंत बंद राहणार आहेत. 

राजस्थानातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

सूत्रांनी सांगितले की, पंजाबरोबरच राजस्थान सरकारनेही सीमावर्ती भागातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. 

खबरदारीचा उपाय म्हणून राजस्थानातील श्रीगंगानगर, बिकानेर, जैसलमेर, बाडमेर या जिल्ह्यांमधील सर्व शासकीय आणि खासगी शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. या चार जिल्ह्यातील प्रशासनाला सर्व आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक