शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

India Pakistan: पाकिस्तानात कसं कोसळलं भारताचं 'सुपरसोनिक मिसाईल'? केंद्रानं दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 20:55 IST

भारत सरकारने म्हटले आहे की, “मिसाईल पाकिस्तानातील एका भागात कोसळल्याचे समजते. ही घटना अत्यंत खेदजनक आहे. मात्र, या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही, हीही दिलासादायक बाब आहे."

भारतानेपाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियां चन्नू शहरात 9 मार्च रोजी पडलेल्या मिसाईलच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. एका निवेदनात केंद्राने म्हटले आहे की, "9 मार्च 2022 रोजी, नियमित देखभालीदरम्यान, काही तांत्रिक बिघाडामुळे हे मिसाईल अचानक फायर झाले. भारत सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत."

भारत सरकारने म्हटले आहे की, “मिसाईल पाकिस्तानातील एका भागात कोसळल्याचे समजते. ही घटना अत्यंत खेदजनक आहे. मात्र, या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही, हीही दिलासादायक बाब आहे. तत्पूर्वी गुरुवारी, भारताकडून एक मिसाईल आपल्या हद्दीत आले, असा दावा पाकिस्तानी सशस्त्र दलांनी केला होता.

यासंदर्भात, पाकिस्तानी लष्कराने म्हटले होते की, त्यांनी भारतीय हवाई क्षेत्रातून पाकच्या हद्दीत येणाऱ्या मिसाईलचा शोध घेतला. ते पंजाब प्रांतात पडले आहे. तसेच, 9 मार्चला संध्याकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी वेगवान मिसाईल भारतीय हद्दीतून पाकिस्तानमध्ये घुसले आणि पंजाब प्रांतात कोसळले, असे मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते.

मेजर जनरल इफ्तिखार यांनी म्हटले आहे की, संबंधित मिसाईल बुधवारी रात्री पंजाबच्या खानेवाल जिल्ह्यात मियां चन्नू परिसरात कोसळली. ती जमिनीवरून सोडली गेली होती. याची माहिती मिळताच पाकिस्तानी हवाई दलाने शोध मोहीम सुरू केली होती. या मिसाईलमुळे मोठी दुर्घटनाही होऊ शकली असती, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान