शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

India Pakistan: पाकिस्तानात कसं कोसळलं भारताचं 'सुपरसोनिक मिसाईल'? केंद्रानं दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 20:55 IST

भारत सरकारने म्हटले आहे की, “मिसाईल पाकिस्तानातील एका भागात कोसळल्याचे समजते. ही घटना अत्यंत खेदजनक आहे. मात्र, या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही, हीही दिलासादायक बाब आहे."

भारतानेपाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियां चन्नू शहरात 9 मार्च रोजी पडलेल्या मिसाईलच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. एका निवेदनात केंद्राने म्हटले आहे की, "9 मार्च 2022 रोजी, नियमित देखभालीदरम्यान, काही तांत्रिक बिघाडामुळे हे मिसाईल अचानक फायर झाले. भारत सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत."

भारत सरकारने म्हटले आहे की, “मिसाईल पाकिस्तानातील एका भागात कोसळल्याचे समजते. ही घटना अत्यंत खेदजनक आहे. मात्र, या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही, हीही दिलासादायक बाब आहे. तत्पूर्वी गुरुवारी, भारताकडून एक मिसाईल आपल्या हद्दीत आले, असा दावा पाकिस्तानी सशस्त्र दलांनी केला होता.

यासंदर्भात, पाकिस्तानी लष्कराने म्हटले होते की, त्यांनी भारतीय हवाई क्षेत्रातून पाकच्या हद्दीत येणाऱ्या मिसाईलचा शोध घेतला. ते पंजाब प्रांतात पडले आहे. तसेच, 9 मार्चला संध्याकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी वेगवान मिसाईल भारतीय हद्दीतून पाकिस्तानमध्ये घुसले आणि पंजाब प्रांतात कोसळले, असे मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते.

मेजर जनरल इफ्तिखार यांनी म्हटले आहे की, संबंधित मिसाईल बुधवारी रात्री पंजाबच्या खानेवाल जिल्ह्यात मियां चन्नू परिसरात कोसळली. ती जमिनीवरून सोडली गेली होती. याची माहिती मिळताच पाकिस्तानी हवाई दलाने शोध मोहीम सुरू केली होती. या मिसाईलमुळे मोठी दुर्घटनाही होऊ शकली असती, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान