शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:30 IST

India Pakistan Conflict: पहलगाममधील दहशतवादी हल्ला त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला दिलेलं प्रत्युत्तर तसेच पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत होत असलेले हल्ले यामुळे देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे पुरेसे साठे आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ला त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला दिलेलं प्रत्युत्तर तसेच पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत होत असलेले हल्ले यामुळे देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे पुरेसे साठे आहेत का, याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून देशात अन्नधानाच्याचा पुरेसा साठा असून, अन्नधान्याबाबत चिंता न करण्याचे आवाहन केले आहे.

देशातील सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. तसेच आमच्याकडे धान, गहू, डाळी, फळे आणि भाजीपाला पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. देशभरातील शेतकऱ्यांकडून पिकांची आणि धान्याची खरेदी सुरळीतपणे सुरू आहे, तसेच अन्नधान्यापासून बागायतीपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादन हे अंदाजापेक्षा अधिक आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्रालयाने शनिवारी देशभरातील नागरिकांना उद्देशून हे पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, प्रत्येक शेतापर्यंत आवश्यक माहिती, साधनसामुग्री पाठवण्याच्या दिशेने सतत कार्य केले जात आहे, तसेच समन्वय राखला जात आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि प्रशासन तिघेही एकजूट आहेत. तसेच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमची तयारी पूर्ण झालेली आहे, असेही शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. 

तत्पूरवी केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही देशामध्ये जीवनावश्यक वस्तूंची कुठलीही टंचाई नसून, अशा वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की, आमच्याकडे सद्यस्थितीमध्ये सामान्य आवश्यकतेपेक्षा अधिक स्टॉक उपलब्ध आहे. तांदूळ, गहू, चणे, तूर, मसूर, मुग यासारख्या डाळीही पुरेशा प्रमाणात आहेत. कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे. त्यामुळे घाबरू नका, तसेच अन्नधान्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाCentral Governmentकेंद्र सरकारfoodअन्न