शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:30 IST

India Pakistan Conflict: पहलगाममधील दहशतवादी हल्ला त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला दिलेलं प्रत्युत्तर तसेच पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत होत असलेले हल्ले यामुळे देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे पुरेसे साठे आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ला त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला दिलेलं प्रत्युत्तर तसेच पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत होत असलेले हल्ले यामुळे देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे पुरेसे साठे आहेत का, याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून देशात अन्नधानाच्याचा पुरेसा साठा असून, अन्नधान्याबाबत चिंता न करण्याचे आवाहन केले आहे.

देशातील सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. तसेच आमच्याकडे धान, गहू, डाळी, फळे आणि भाजीपाला पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. देशभरातील शेतकऱ्यांकडून पिकांची आणि धान्याची खरेदी सुरळीतपणे सुरू आहे, तसेच अन्नधान्यापासून बागायतीपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादन हे अंदाजापेक्षा अधिक आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्रालयाने शनिवारी देशभरातील नागरिकांना उद्देशून हे पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, प्रत्येक शेतापर्यंत आवश्यक माहिती, साधनसामुग्री पाठवण्याच्या दिशेने सतत कार्य केले जात आहे, तसेच समन्वय राखला जात आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि प्रशासन तिघेही एकजूट आहेत. तसेच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमची तयारी पूर्ण झालेली आहे, असेही शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. 

तत्पूरवी केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही देशामध्ये जीवनावश्यक वस्तूंची कुठलीही टंचाई नसून, अशा वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की, आमच्याकडे सद्यस्थितीमध्ये सामान्य आवश्यकतेपेक्षा अधिक स्टॉक उपलब्ध आहे. तांदूळ, गहू, चणे, तूर, मसूर, मुग यासारख्या डाळीही पुरेशा प्रमाणात आहेत. कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे. त्यामुळे घाबरू नका, तसेच अन्नधान्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाCentral Governmentकेंद्र सरकारfoodअन्न