शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:29 IST

India Pakistan Conflict: भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानने भारतातील ३६ ठिकाणी ३०० ते  ४०० ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. मात्र यातील बहुतांश ड्रोन नष्ट करण्यात यश आल्याची माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली आहे. तसेच हे सर्व ड्रोन तुर्कीमध्ये तयार झालेले होते, असेही त्यांनी सांगितले.

पहलागामधील हल्ला आणि भारतानेऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला दिलेलं प्रत्युत्तर यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाकिस्तानकडून होणाऱ्या आगळीकीला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानने भारतातील ३६ ठिकाणी ३०० ते  ४०० ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. मात्र यातील बहुतांश ड्रोन नष्ट करण्यात यश आल्याची माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली आहे. तसेच हे सर्व ड्रोन तुर्कीमध्ये तयार झालेले होते, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यांबाबत माहिती देताना सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारतामधील ३६ ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक तपासामध्ये या हल्ल्यासाठी तुर्कीमध्ये तयार झालेल्या ड्रोनचा वापर केला गेला असल्याचे समोर आले आहे. भारतीय हवाई दलाने याला तत्काळ प्रत्युत्तर देत ड्रोनच्या माध्यमातून जोरदार प्रतिहल्ला केला. यामध्ये पाकिस्तानची सर्व्हिलान्स रडार प्रणाली पूर्णपणे नष्ट झाली, भारताने केलेल्या या कारवाईमध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच पाकिस्तानच्या लष्करी अभियानासाठी हा एक मोठा धक्का आहे, असेही त्यांनी सांगितले.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली नव्हती. उलट तिचा ढालीसारखा वापर केला. त्यावेळी कराची आणि लाहोरसारख्या शहरांवरून प्रवासी विमाने जात होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीव धोक्यात आले  होते. मात्र सर्वसामान्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ नये यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी ही संपूर्ण कारवाई संयमीपणे हाताळली. आता या संयमी भूमिकेचं आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही कौतुक होत आहे.

त्याबरोबरच पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरही मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. घुसखोरीचेही प्रयत्न झाले, तंगधार, उरी आणि उधमपूरमध्य मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात काही प्रमाणात नुकसान झालं आहे. यादरम्यान, भारताच्या हवाई दलानेही बऱ्यापैकी संयम बाळगला, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान