शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
2
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
3
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
4
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
5
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
6
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
7
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
8
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
9
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
10
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
11
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
12
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
13
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
14
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
15
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
16
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
17
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
18
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
19
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
20
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा

तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:29 IST

India Pakistan Conflict: भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानने भारतातील ३६ ठिकाणी ३०० ते  ४०० ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. मात्र यातील बहुतांश ड्रोन नष्ट करण्यात यश आल्याची माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली आहे. तसेच हे सर्व ड्रोन तुर्कीमध्ये तयार झालेले होते, असेही त्यांनी सांगितले.

पहलागामधील हल्ला आणि भारतानेऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला दिलेलं प्रत्युत्तर यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाकिस्तानकडून होणाऱ्या आगळीकीला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानने भारतातील ३६ ठिकाणी ३०० ते  ४०० ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. मात्र यातील बहुतांश ड्रोन नष्ट करण्यात यश आल्याची माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली आहे. तसेच हे सर्व ड्रोन तुर्कीमध्ये तयार झालेले होते, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यांबाबत माहिती देताना सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारतामधील ३६ ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक तपासामध्ये या हल्ल्यासाठी तुर्कीमध्ये तयार झालेल्या ड्रोनचा वापर केला गेला असल्याचे समोर आले आहे. भारतीय हवाई दलाने याला तत्काळ प्रत्युत्तर देत ड्रोनच्या माध्यमातून जोरदार प्रतिहल्ला केला. यामध्ये पाकिस्तानची सर्व्हिलान्स रडार प्रणाली पूर्णपणे नष्ट झाली, भारताने केलेल्या या कारवाईमध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच पाकिस्तानच्या लष्करी अभियानासाठी हा एक मोठा धक्का आहे, असेही त्यांनी सांगितले.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली नव्हती. उलट तिचा ढालीसारखा वापर केला. त्यावेळी कराची आणि लाहोरसारख्या शहरांवरून प्रवासी विमाने जात होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीव धोक्यात आले  होते. मात्र सर्वसामान्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ नये यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी ही संपूर्ण कारवाई संयमीपणे हाताळली. आता या संयमी भूमिकेचं आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही कौतुक होत आहे.

त्याबरोबरच पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरही मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. घुसखोरीचेही प्रयत्न झाले, तंगधार, उरी आणि उधमपूरमध्य मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात काही प्रमाणात नुकसान झालं आहे. यादरम्यान, भारताच्या हवाई दलानेही बऱ्यापैकी संयम बाळगला, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान