शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:29 IST

India Pakistan Conflict: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला संघर्ष युद्धविरामानंतर थांबला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षादरम्यानची एक एक कहाणी समोर येत आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला संघर्ष युद्धविरामानंतर थांबला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षादरम्यानची एक एक कहाणी समोर येत आहे. भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरअंतर्गत सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. तर त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने नागरी वस्त्या आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्याने भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यादरम्यान, भारतीय नौदलही अरबी समुद्रामध्ये मोठ्या ताफ्यासह कराचीला लक्ष्य करण्यासाठी सज्ज होते, अशी माहिती आता समोर आली आहे. 

भारतीय सैन्यदलांनी दहशतवाद्यांना लक्ष्य करत राबवेल्या या मोहिमेदरम्यान, भारतीय नौदलाने कराचीजवळील अरबी समुद्रात ३६ युद्धनौकांची तैनाती केली होती. त्यात विमानवाहू नौका विक्रांतसह ७ फ्रिगेट, ७ पाणबुड्या आणि विनाशिकांचा समावेश होता. या तैनातीमधून भारतीय नौदलाने आपल्या आरमारी शक्तीचं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. तसेच पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं होतं.

एप्रिल महिन्यात २२ तारखेला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात  कठोर कारवाई करण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार भारताच्या सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर या मोहिमेंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भीषण हल्ला केला होता. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र भारताच्या तिन्ही सेनादलांनी एकत्रित कारवाई करत पाकिस्तानला जेरीस आणले होते.

पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे आणि कुठल्याही हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देईल याची जाणीव पाकिस्तानला करून देणे हा ऑपरेशन सिंदूरचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेसाठी भारताने कराचीजवळ अरबी समुद्रामध्ये युद्धनौकांची जबरदस्त तैनाती केली होती. या तैनातीमुळे अखेरीस पाकिस्तानला माघार घ्यावी लागली होती.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरindian navyभारतीय नौदलIndiaभारतPakistanपाकिस्तान