शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'भारत-पाकिस्तान एकत्र आले तर जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 11:12 IST

दोन्ही देश एकत्र आल्यास सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ती जगातील मोठी ताकद असेल.

मुंबई: भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकत्र आले तर ती जगातील मोठी ताकद असेल, असे मत दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी मांडले. भारद्वाज यांनी कराचीमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (पीआयएफएफ) हजेरी लावली होती. त्यानंतर 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या नातेसंबंधावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मला पाकिस्तान हा देश खूप आवडतो. प्रत्येकवेळी या देशाने मला प्रेमच दिले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध सुधारायचे असतील तर सांस्कृतिक आदानप्रदान महत्त्वाचे आहे. अधिकाअधिक सांस्कृतिक उपक्रमांद्वारे दोन्ही देशांतील दरी भरू काढता येईल. परंतु, दुर्दैवाने हे दोन्ही देश कायम एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले असतात. मुळात, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक बाबतींमध्ये साम्य आहे. त्यामुळे हे दोन्ही देश एकत्र आल्यास सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ती जगातील मोठी ताकद असेल, असे भारद्वाज यांनी म्हटले. साधारणत: दोन देशांमधील संबंध सुधारायचे असल्यास संस्कृती आणि राजकारण हे दोन घटक महत्त्वाचे असतात. मात्र, भारत व पाकिस्तानच्याबाबतीत राजकीय पर्याय सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे सांस्कृतिक आदानप्रदान हा एकमेव दुवा उरला आहे. परंतु, सध्याच्या बिघडलेल्या राजकीय वातावरणामुळे दोन्ही देशांतील सांस्कृतिक संबंधांचेही नुकसान होत आहे. त्यासाठी दोन्ही बाजुंकडून सहिष्णुता आणि स्वीकारर्हतेचे धोरण स्वीकारण्याची गरज आहे. मात्र, हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी दोन्ही बाजूंनी तसे प्रयत्नही झाले पाहिजेत, असे विशाल भारद्वाज यांनी सांगितले.  

टॅग्स :Vishal Bhardwajविशाल भारद्वाजIndiaभारतPakistanपाकिस्तान