शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

'भारत-पाकिस्तान एकत्र आले तर जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 11:12 IST

दोन्ही देश एकत्र आल्यास सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ती जगातील मोठी ताकद असेल.

मुंबई: भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकत्र आले तर ती जगातील मोठी ताकद असेल, असे मत दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी मांडले. भारद्वाज यांनी कराचीमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (पीआयएफएफ) हजेरी लावली होती. त्यानंतर 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या नातेसंबंधावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मला पाकिस्तान हा देश खूप आवडतो. प्रत्येकवेळी या देशाने मला प्रेमच दिले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध सुधारायचे असतील तर सांस्कृतिक आदानप्रदान महत्त्वाचे आहे. अधिकाअधिक सांस्कृतिक उपक्रमांद्वारे दोन्ही देशांतील दरी भरू काढता येईल. परंतु, दुर्दैवाने हे दोन्ही देश कायम एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले असतात. मुळात, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक बाबतींमध्ये साम्य आहे. त्यामुळे हे दोन्ही देश एकत्र आल्यास सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ती जगातील मोठी ताकद असेल, असे भारद्वाज यांनी म्हटले. साधारणत: दोन देशांमधील संबंध सुधारायचे असल्यास संस्कृती आणि राजकारण हे दोन घटक महत्त्वाचे असतात. मात्र, भारत व पाकिस्तानच्याबाबतीत राजकीय पर्याय सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे सांस्कृतिक आदानप्रदान हा एकमेव दुवा उरला आहे. परंतु, सध्याच्या बिघडलेल्या राजकीय वातावरणामुळे दोन्ही देशांतील सांस्कृतिक संबंधांचेही नुकसान होत आहे. त्यासाठी दोन्ही बाजुंकडून सहिष्णुता आणि स्वीकारर्हतेचे धोरण स्वीकारण्याची गरज आहे. मात्र, हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी दोन्ही बाजूंनी तसे प्रयत्नही झाले पाहिजेत, असे विशाल भारद्वाज यांनी सांगितले.  

टॅग्स :Vishal Bhardwajविशाल भारद्वाजIndiaभारतPakistanपाकिस्तान