शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

I.N.D.I.A मधून NDA त येताच JDUचे काँग्रेसवर गंभीर आरोप, केला सनसनाटी दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 13:46 IST

Bihar Political Update: लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये दाखल झाला आहे. नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधात उभ्या राहत असलेल्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये दाखल झाला आहे. नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधात उभ्या राहत असलेल्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तसेच बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला परत एकदा विरोधात बसावे लागणार आहे. दरम्यान, इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये दाखल झाल्यानंतर जेडीयूचे दिग्गज नेते के.सी. त्यागी यांनी काँग्रेसबाबत सनसनाटी दावा केला आहे. काँग्रेसला इंडिया आघाडीचं नेतृत्व बळकवायचं होतं.  ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पुढे करून काँग्रेसनं चाल खेळली होती. मात्र खर्गे यांनी नंतर नकार दिला होता. तसेच आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार बनणार नसल्याचे सांगितले होते. 

के.सी. त्यागी म्हणाले की, नितीश कुमार यांनी सर्वांना सोबत घेऊन इंडिया आघाडीची बांधणी केली होती. देशभरात फिरून सर्वांना एकत्र आणले होते. इंडिया आघाडी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा न करताच लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे ठरवण्यात आले होते. मात्र काँग्रेसच्या मनात खोट होती. त्यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व हडपण्यासाठी खर्गेंचं नाव पुढे केलं होतं, असा दावा के. सी. त्यागी यांनी केला. इंडिया आघाडीत एकमत होत नसल्याने नितीश कुमार नाराज होते. काँग्रेसची भूमिका त्यांना खटकली होती.

जेडीयूचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी म्हणाले की, काँग्रेस प्रादेशिक पक्षांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जींचा पक्ष असो, समाजवादी पक्ष असो, जेडीयू असो, वा शरद पवार यांचा पक्ष असो, हे सर्व पक्ष काँग्रेसशी लढूनच तयार झाले आहेत. काँग्रेस पक्ष सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या एवढ्याही जागा मिळवता आल्या नव्हत्या. काँग्रेससमोर सध्या अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे. त्यामुळेच ते प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनू इच्छित होते. मात्र हे होऊ शकलं नाही, त्यामुळे ते नाराज झाले आणि अखेरीस आपला जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपासोबत एनडीएमध्ये गेले, असा आरोप नितीश कुमार यांच्यावर होत आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी