शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

I.N.D.I.A मधून NDA त येताच JDUचे काँग्रेसवर गंभीर आरोप, केला सनसनाटी दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 13:46 IST

Bihar Political Update: लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये दाखल झाला आहे. नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधात उभ्या राहत असलेल्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये दाखल झाला आहे. नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधात उभ्या राहत असलेल्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तसेच बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला परत एकदा विरोधात बसावे लागणार आहे. दरम्यान, इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये दाखल झाल्यानंतर जेडीयूचे दिग्गज नेते के.सी. त्यागी यांनी काँग्रेसबाबत सनसनाटी दावा केला आहे. काँग्रेसला इंडिया आघाडीचं नेतृत्व बळकवायचं होतं.  ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पुढे करून काँग्रेसनं चाल खेळली होती. मात्र खर्गे यांनी नंतर नकार दिला होता. तसेच आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार बनणार नसल्याचे सांगितले होते. 

के.सी. त्यागी म्हणाले की, नितीश कुमार यांनी सर्वांना सोबत घेऊन इंडिया आघाडीची बांधणी केली होती. देशभरात फिरून सर्वांना एकत्र आणले होते. इंडिया आघाडी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा न करताच लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे ठरवण्यात आले होते. मात्र काँग्रेसच्या मनात खोट होती. त्यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व हडपण्यासाठी खर्गेंचं नाव पुढे केलं होतं, असा दावा के. सी. त्यागी यांनी केला. इंडिया आघाडीत एकमत होत नसल्याने नितीश कुमार नाराज होते. काँग्रेसची भूमिका त्यांना खटकली होती.

जेडीयूचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी म्हणाले की, काँग्रेस प्रादेशिक पक्षांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जींचा पक्ष असो, समाजवादी पक्ष असो, जेडीयू असो, वा शरद पवार यांचा पक्ष असो, हे सर्व पक्ष काँग्रेसशी लढूनच तयार झाले आहेत. काँग्रेस पक्ष सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या एवढ्याही जागा मिळवता आल्या नव्हत्या. काँग्रेससमोर सध्या अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे. त्यामुळेच ते प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनू इच्छित होते. मात्र हे होऊ शकलं नाही, त्यामुळे ते नाराज झाले आणि अखेरीस आपला जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपासोबत एनडीएमध्ये गेले, असा आरोप नितीश कुमार यांच्यावर होत आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी