शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

जागतिक बाजारपेठेत भारत पुन्हा ताकद दाखवणार; फक्त एका निर्णयानं पाकिस्तानला घाम फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 19:10 IST

निर्बंधामुळे आशिया-उत्तर अमेरिकेत लोकांनी भीतीपोटी अधिक तांदूळ खरेदी करणे सुरू केले. आशियाई बेंचमार्कमध्ये तांदळाची किंमत २००८ नंतर सर्वाधिक झाली होती.

नवी दिल्ली - भारताने तांदूळ निर्यातीवर लावलेले बंदी हटवली आहे. कृषी उत्पादन निर्यात दुप्पट करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. भारताने या महिन्यापासून तांदूळ निर्यातीवर लावलेले सर्व निर्बंध हटवण्याने इतर देशांवर दबाव वाढला आहे. थायलँडमध्ये सफेद तांदळाची किंमत ४०५ डॉलर प्रतिटन आहे. जानेवारी २०२४ मध्ये हे दर ६६९ डॉलर इतके होते. भारत सध्या कृषी आणि खाद्य निर्यात वाढवण्यावर भर देत आहे त्यावेळी हा निर्णय सरकारने घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे. अर्थव्यवस्थेला गती मिळेल. भारतातील १४० कोटी लोकसंख्येत ४२ टक्क्याहून अधिक लोक शेतीवर निर्भर आहेत. भारताच्या या पाऊलामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदूळ किंमतीत घट पाहायला मिळेल. त्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान होणार आहे. २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात करण्याचं टार्गेट भारताचं आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिल्यानुसार, २०२३-२४ मध्ये ४८.१५ अब्ज डॉलर निर्यात दुप्पट झाली आहे. मागील वर्षी भारताने जवळपास ५० अब्ज डॉलर निर्यात केले होते. परंतु देशातील वाणिज्य मंत्रालय आणखी मोठं यश मिळवू इच्छिते असं त्यांनी सांगितले.

तसेच सरकारने साखरेच्या निर्यातीवरील काही निर्बंध हटवले आहेत. आम्हाला येत्या काळात भारत १०० अब्ज डॉलरचा आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे असा विश्वास वाणिज्य मंत्री गोयल यांनी व्यक्त केला. भारताने २०२२ साली तांदूळ निर्यातीवर कठोर निर्बंध आणले होते. रशिया-युक्रेन युद्धानंतर किंमती वाढल्याने देशात तांदूळ कमी पडण्याची भीती होती. निर्बंधामुळे आशिया-उत्तर अमेरिकेत लोकांनी भीतीपोटी अधिक तांदूळ खरेदी करणे सुरू केले. आशियाई बेंचमार्कमध्ये तांदळाची किंमत २००८ नंतर सर्वाधिक झाली होती.

भारताने सप्टेंबर महिन्यापासून निर्यातीवरील निर्बंध कमी करण्याचं काम सुरू केले होते. भारताने २०२३ साली १.४ कोटी टन तांदूळ निर्यात केला होता. सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या काळात भारत २.१५ कोटी टन तांदूळ निर्यात होऊ शकते. हा एक रेकॉर्ड आहे. जर भारताने ५.४ - ५.५ कोटी टनाच्या जागतिक बाजारपेठेत २ कोटीहून अधिक टन तांदूळ निर्यात केले तर बाजारपेठेत लाट येईल. भारत तांदूळ बाजारात आल्याने पाकिस्तानचे नुकसान होणार आहे. भारताने निर्यात बंदी केल्यानंतर पाकिस्तानने इंडोनेशिया-पूर्व अफ्रिका देशात त्यांचं स्थान बनवले होते. भारताने सप्टेंबरमध्ये निर्बंध कमी केल्यानंतर पाकिस्तान गैर बासमती तांदूळ किंमत रातोरात ८५० डॉलरहून ६५० डॉलर प्रतिटन झाले होते.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान