शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

जागतिक बाजारपेठेत भारत पुन्हा ताकद दाखवणार; फक्त एका निर्णयानं पाकिस्तानला घाम फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 19:10 IST

निर्बंधामुळे आशिया-उत्तर अमेरिकेत लोकांनी भीतीपोटी अधिक तांदूळ खरेदी करणे सुरू केले. आशियाई बेंचमार्कमध्ये तांदळाची किंमत २००८ नंतर सर्वाधिक झाली होती.

नवी दिल्ली - भारताने तांदूळ निर्यातीवर लावलेले बंदी हटवली आहे. कृषी उत्पादन निर्यात दुप्पट करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. भारताने या महिन्यापासून तांदूळ निर्यातीवर लावलेले सर्व निर्बंध हटवण्याने इतर देशांवर दबाव वाढला आहे. थायलँडमध्ये सफेद तांदळाची किंमत ४०५ डॉलर प्रतिटन आहे. जानेवारी २०२४ मध्ये हे दर ६६९ डॉलर इतके होते. भारत सध्या कृषी आणि खाद्य निर्यात वाढवण्यावर भर देत आहे त्यावेळी हा निर्णय सरकारने घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे. अर्थव्यवस्थेला गती मिळेल. भारतातील १४० कोटी लोकसंख्येत ४२ टक्क्याहून अधिक लोक शेतीवर निर्भर आहेत. भारताच्या या पाऊलामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदूळ किंमतीत घट पाहायला मिळेल. त्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान होणार आहे. २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात करण्याचं टार्गेट भारताचं आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिल्यानुसार, २०२३-२४ मध्ये ४८.१५ अब्ज डॉलर निर्यात दुप्पट झाली आहे. मागील वर्षी भारताने जवळपास ५० अब्ज डॉलर निर्यात केले होते. परंतु देशातील वाणिज्य मंत्रालय आणखी मोठं यश मिळवू इच्छिते असं त्यांनी सांगितले.

तसेच सरकारने साखरेच्या निर्यातीवरील काही निर्बंध हटवले आहेत. आम्हाला येत्या काळात भारत १०० अब्ज डॉलरचा आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे असा विश्वास वाणिज्य मंत्री गोयल यांनी व्यक्त केला. भारताने २०२२ साली तांदूळ निर्यातीवर कठोर निर्बंध आणले होते. रशिया-युक्रेन युद्धानंतर किंमती वाढल्याने देशात तांदूळ कमी पडण्याची भीती होती. निर्बंधामुळे आशिया-उत्तर अमेरिकेत लोकांनी भीतीपोटी अधिक तांदूळ खरेदी करणे सुरू केले. आशियाई बेंचमार्कमध्ये तांदळाची किंमत २००८ नंतर सर्वाधिक झाली होती.

भारताने सप्टेंबर महिन्यापासून निर्यातीवरील निर्बंध कमी करण्याचं काम सुरू केले होते. भारताने २०२३ साली १.४ कोटी टन तांदूळ निर्यात केला होता. सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या काळात भारत २.१५ कोटी टन तांदूळ निर्यात होऊ शकते. हा एक रेकॉर्ड आहे. जर भारताने ५.४ - ५.५ कोटी टनाच्या जागतिक बाजारपेठेत २ कोटीहून अधिक टन तांदूळ निर्यात केले तर बाजारपेठेत लाट येईल. भारत तांदूळ बाजारात आल्याने पाकिस्तानचे नुकसान होणार आहे. भारताने निर्यात बंदी केल्यानंतर पाकिस्तानने इंडोनेशिया-पूर्व अफ्रिका देशात त्यांचं स्थान बनवले होते. भारताने सप्टेंबरमध्ये निर्बंध कमी केल्यानंतर पाकिस्तान गैर बासमती तांदूळ किंमत रातोरात ८५० डॉलरहून ६५० डॉलर प्रतिटन झाले होते.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान