शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

जागतिक बाजारपेठेत भारत पुन्हा ताकद दाखवणार; फक्त एका निर्णयानं पाकिस्तानला घाम फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 19:10 IST

निर्बंधामुळे आशिया-उत्तर अमेरिकेत लोकांनी भीतीपोटी अधिक तांदूळ खरेदी करणे सुरू केले. आशियाई बेंचमार्कमध्ये तांदळाची किंमत २००८ नंतर सर्वाधिक झाली होती.

नवी दिल्ली - भारताने तांदूळ निर्यातीवर लावलेले बंदी हटवली आहे. कृषी उत्पादन निर्यात दुप्पट करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. भारताने या महिन्यापासून तांदूळ निर्यातीवर लावलेले सर्व निर्बंध हटवण्याने इतर देशांवर दबाव वाढला आहे. थायलँडमध्ये सफेद तांदळाची किंमत ४०५ डॉलर प्रतिटन आहे. जानेवारी २०२४ मध्ये हे दर ६६९ डॉलर इतके होते. भारत सध्या कृषी आणि खाद्य निर्यात वाढवण्यावर भर देत आहे त्यावेळी हा निर्णय सरकारने घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे. अर्थव्यवस्थेला गती मिळेल. भारतातील १४० कोटी लोकसंख्येत ४२ टक्क्याहून अधिक लोक शेतीवर निर्भर आहेत. भारताच्या या पाऊलामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदूळ किंमतीत घट पाहायला मिळेल. त्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान होणार आहे. २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात करण्याचं टार्गेट भारताचं आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिल्यानुसार, २०२३-२४ मध्ये ४८.१५ अब्ज डॉलर निर्यात दुप्पट झाली आहे. मागील वर्षी भारताने जवळपास ५० अब्ज डॉलर निर्यात केले होते. परंतु देशातील वाणिज्य मंत्रालय आणखी मोठं यश मिळवू इच्छिते असं त्यांनी सांगितले.

तसेच सरकारने साखरेच्या निर्यातीवरील काही निर्बंध हटवले आहेत. आम्हाला येत्या काळात भारत १०० अब्ज डॉलरचा आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे असा विश्वास वाणिज्य मंत्री गोयल यांनी व्यक्त केला. भारताने २०२२ साली तांदूळ निर्यातीवर कठोर निर्बंध आणले होते. रशिया-युक्रेन युद्धानंतर किंमती वाढल्याने देशात तांदूळ कमी पडण्याची भीती होती. निर्बंधामुळे आशिया-उत्तर अमेरिकेत लोकांनी भीतीपोटी अधिक तांदूळ खरेदी करणे सुरू केले. आशियाई बेंचमार्कमध्ये तांदळाची किंमत २००८ नंतर सर्वाधिक झाली होती.

भारताने सप्टेंबर महिन्यापासून निर्यातीवरील निर्बंध कमी करण्याचं काम सुरू केले होते. भारताने २०२३ साली १.४ कोटी टन तांदूळ निर्यात केला होता. सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या काळात भारत २.१५ कोटी टन तांदूळ निर्यात होऊ शकते. हा एक रेकॉर्ड आहे. जर भारताने ५.४ - ५.५ कोटी टनाच्या जागतिक बाजारपेठेत २ कोटीहून अधिक टन तांदूळ निर्यात केले तर बाजारपेठेत लाट येईल. भारत तांदूळ बाजारात आल्याने पाकिस्तानचे नुकसान होणार आहे. भारताने निर्यात बंदी केल्यानंतर पाकिस्तानने इंडोनेशिया-पूर्व अफ्रिका देशात त्यांचं स्थान बनवले होते. भारताने सप्टेंबरमध्ये निर्बंध कमी केल्यानंतर पाकिस्तान गैर बासमती तांदूळ किंमत रातोरात ८५० डॉलरहून ६५० डॉलर प्रतिटन झाले होते.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान