शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक बाजारपेठेत भारत पुन्हा ताकद दाखवणार; फक्त एका निर्णयानं पाकिस्तानला घाम फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 19:10 IST

निर्बंधामुळे आशिया-उत्तर अमेरिकेत लोकांनी भीतीपोटी अधिक तांदूळ खरेदी करणे सुरू केले. आशियाई बेंचमार्कमध्ये तांदळाची किंमत २००८ नंतर सर्वाधिक झाली होती.

नवी दिल्ली - भारताने तांदूळ निर्यातीवर लावलेले बंदी हटवली आहे. कृषी उत्पादन निर्यात दुप्पट करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. भारताने या महिन्यापासून तांदूळ निर्यातीवर लावलेले सर्व निर्बंध हटवण्याने इतर देशांवर दबाव वाढला आहे. थायलँडमध्ये सफेद तांदळाची किंमत ४०५ डॉलर प्रतिटन आहे. जानेवारी २०२४ मध्ये हे दर ६६९ डॉलर इतके होते. भारत सध्या कृषी आणि खाद्य निर्यात वाढवण्यावर भर देत आहे त्यावेळी हा निर्णय सरकारने घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे. अर्थव्यवस्थेला गती मिळेल. भारतातील १४० कोटी लोकसंख्येत ४२ टक्क्याहून अधिक लोक शेतीवर निर्भर आहेत. भारताच्या या पाऊलामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदूळ किंमतीत घट पाहायला मिळेल. त्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान होणार आहे. २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात करण्याचं टार्गेट भारताचं आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिल्यानुसार, २०२३-२४ मध्ये ४८.१५ अब्ज डॉलर निर्यात दुप्पट झाली आहे. मागील वर्षी भारताने जवळपास ५० अब्ज डॉलर निर्यात केले होते. परंतु देशातील वाणिज्य मंत्रालय आणखी मोठं यश मिळवू इच्छिते असं त्यांनी सांगितले.

तसेच सरकारने साखरेच्या निर्यातीवरील काही निर्बंध हटवले आहेत. आम्हाला येत्या काळात भारत १०० अब्ज डॉलरचा आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे असा विश्वास वाणिज्य मंत्री गोयल यांनी व्यक्त केला. भारताने २०२२ साली तांदूळ निर्यातीवर कठोर निर्बंध आणले होते. रशिया-युक्रेन युद्धानंतर किंमती वाढल्याने देशात तांदूळ कमी पडण्याची भीती होती. निर्बंधामुळे आशिया-उत्तर अमेरिकेत लोकांनी भीतीपोटी अधिक तांदूळ खरेदी करणे सुरू केले. आशियाई बेंचमार्कमध्ये तांदळाची किंमत २००८ नंतर सर्वाधिक झाली होती.

भारताने सप्टेंबर महिन्यापासून निर्यातीवरील निर्बंध कमी करण्याचं काम सुरू केले होते. भारताने २०२३ साली १.४ कोटी टन तांदूळ निर्यात केला होता. सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या काळात भारत २.१५ कोटी टन तांदूळ निर्यात होऊ शकते. हा एक रेकॉर्ड आहे. जर भारताने ५.४ - ५.५ कोटी टनाच्या जागतिक बाजारपेठेत २ कोटीहून अधिक टन तांदूळ निर्यात केले तर बाजारपेठेत लाट येईल. भारत तांदूळ बाजारात आल्याने पाकिस्तानचे नुकसान होणार आहे. भारताने निर्यात बंदी केल्यानंतर पाकिस्तानने इंडोनेशिया-पूर्व अफ्रिका देशात त्यांचं स्थान बनवले होते. भारताने सप्टेंबरमध्ये निर्बंध कमी केल्यानंतर पाकिस्तान गैर बासमती तांदूळ किंमत रातोरात ८५० डॉलरहून ६५० डॉलर प्रतिटन झाले होते.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान