शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

NRC: घुसखोरी करणाऱ्यांना देशात राहता येणार नाही; गडकरींनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 10:14 IST

'मोदी सरकार धर्म, जाती आणि पंथावरुन कोणासोबतही भेदभाव करत नाही'

नवी दिल्ली: कोणताही देश अवैध घुसखोरी सहन करणार नाही. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (NRC) भारतातील नागरिकांविरोधात नाही. त्यामुळे लोकांनी शांत राहावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं. विरोधकांकडून देशवासीयांना भडकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. कोणत्याही परदेशी व्यक्तीनं येऊन वास्तव्य करायला भारत म्हणजे धर्मशाळा नाही, असं देखील गडकरी म्हणाले. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सध्या देशभरात आंदोलनं सुरू आहेत. त्यावर गडकरींनी भाष्य केलं. कोणताही देश अवैध घुसखोरी सहन करणार नाही. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकार धर्म, जाती आणि पंथावरुन कोणासोबतही भेदभाव करत नाही. मात्र काही पक्ष अल्पसंख्यांकांची दिशाभूल करुन त्यांना घाबरवण्याचं काम करत आहेत, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. भारतातील जनतेला सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन लोकांची दिशाभूल करणारे पक्ष देशाच्या एकता आणि अखंडतेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका गडकरींनी केली. यावेळी गडकरींनी हिंदुत्वाबद्दलदेखील त्यांचे विचार मांडले. हिंदुत्व म्हणजे पूजा-पद्धती नसून जीवन जगण्याची पद्धत आहे. हिंदू हा शब्द संकुचित नाही, असं गडकरी म्हणाले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNitin Gadkariनितीन गडकरी