शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया, एनडीएची पहिली टेस्ट; संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 07:26 IST

संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

संजय शर्मा

नवी दिल्ली : : विरोधी पक्षांची महाआघाडी ‘इंडिया’ व सरकारचे ‘एनडीए’ यांची पहिली परीक्षा संसदेत सादर होणाऱ्या दिल्ली सरकारच्या अध्यादेशाच्या विधेयकावर होणार आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत असून, ते वादळी ठरण्याची शक्यता आहे. सरकारने बुधवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व विरोधी पक्षांची भूमिका स्पष्ट झाले आहे. विरोधक मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावरून केंद्र सरकारला घेरणार आहेत. यासाठी मणिपूरच्या मुद्यावर संसदेत थेट पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी केली आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, सरकारच्या अजेंड्यामध्ये ३१ विषय आहेत. यात सर्वप्रथम दिल्लीतील अध्यदेशाशी संबंधित विधेयक आहे.

राज्यसभेत खरी परीक्षा

nया विधेयकावर ‘इंडिया’ची परीक्षा राज्यसभेत होणार आहे. कारण तेथे सरकारकडे बहुमत नाही. लोकसभेत सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे तेथे कोणतीही अडचण येणार नाही; परंतु राज्यसभेत भाजप व एनडीए मिळून ही संख्या १११ होते. n२३७ सदस्यांच्या राज्यसभेत विधेयक पारित करण्यासाठी सरकारला ११९ संख्येची गरज भासणार आहे. ही संख्या विद्यमान सदस्य संख्येपेक्षा ८ ने जास्त आहे. या आठ खासदारांसाठी सरकारला बिजू जनता दल व वायएसआर काँग्रेसची मदत घ्यावी लागू शकते. nदोन्ही पक्षांचे राज्यसभेत प्रत्येकी ९ सदस्य आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसनेही या विधेयकाच्या विरोधात मत देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांची एकजूट कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या हेतूवर शंका

सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर पडताच संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, सरकार मणिपूरसह सर्व मुद्यांवर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे. लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती जसे निर्देश देतील, त्यानुसार सरकार चर्चा घडवून आणणार आहे.सरकारच्या या आश्वासनानंतरही विरोधी पक्षांना सरकारच्या संसद चालवू देण्याच्या हेतूवर शंका आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी माध्यमांसमोर सरकारला आवाहन करताना म्हटले आहे की, विरोधकांना आपले मुद्दे मांडता यावेत, यासाठी सरकारने संसद चालू द्यावी.याच्या उत्तरात प्रल्हाद जोशी म्हणाले की, संसदेत गदारोळ कोण करतो, कोण संसदेचे कामकाज बाधित करतो, हे सर्व जनता जाणते. सरकार तर संसद चालवू इच्छिते.  

महत्त्वाची विधेयके कोणती?

या अधिवेशनात जे प्रमुख विधेयके मांडली जाणार आहेत, त्यात दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक २०२३, पोस्टल सेवा विधेयक, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक २०२३, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि बँक विधेयक २०२३, जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक २०२३, जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक २०२३, प्रेस आणि मॅगझिन नोंदणी विधेयक २०२३ आदींचा समावेश आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाManipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेस