शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

इंडिया, एनडीएची पहिली टेस्ट; संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 07:26 IST

संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

संजय शर्मा

नवी दिल्ली : : विरोधी पक्षांची महाआघाडी ‘इंडिया’ व सरकारचे ‘एनडीए’ यांची पहिली परीक्षा संसदेत सादर होणाऱ्या दिल्ली सरकारच्या अध्यादेशाच्या विधेयकावर होणार आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत असून, ते वादळी ठरण्याची शक्यता आहे. सरकारने बुधवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व विरोधी पक्षांची भूमिका स्पष्ट झाले आहे. विरोधक मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावरून केंद्र सरकारला घेरणार आहेत. यासाठी मणिपूरच्या मुद्यावर संसदेत थेट पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी केली आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, सरकारच्या अजेंड्यामध्ये ३१ विषय आहेत. यात सर्वप्रथम दिल्लीतील अध्यदेशाशी संबंधित विधेयक आहे.

राज्यसभेत खरी परीक्षा

nया विधेयकावर ‘इंडिया’ची परीक्षा राज्यसभेत होणार आहे. कारण तेथे सरकारकडे बहुमत नाही. लोकसभेत सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे तेथे कोणतीही अडचण येणार नाही; परंतु राज्यसभेत भाजप व एनडीए मिळून ही संख्या १११ होते. n२३७ सदस्यांच्या राज्यसभेत विधेयक पारित करण्यासाठी सरकारला ११९ संख्येची गरज भासणार आहे. ही संख्या विद्यमान सदस्य संख्येपेक्षा ८ ने जास्त आहे. या आठ खासदारांसाठी सरकारला बिजू जनता दल व वायएसआर काँग्रेसची मदत घ्यावी लागू शकते. nदोन्ही पक्षांचे राज्यसभेत प्रत्येकी ९ सदस्य आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसनेही या विधेयकाच्या विरोधात मत देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांची एकजूट कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या हेतूवर शंका

सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर पडताच संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, सरकार मणिपूरसह सर्व मुद्यांवर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे. लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती जसे निर्देश देतील, त्यानुसार सरकार चर्चा घडवून आणणार आहे.सरकारच्या या आश्वासनानंतरही विरोधी पक्षांना सरकारच्या संसद चालवू देण्याच्या हेतूवर शंका आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी माध्यमांसमोर सरकारला आवाहन करताना म्हटले आहे की, विरोधकांना आपले मुद्दे मांडता यावेत, यासाठी सरकारने संसद चालू द्यावी.याच्या उत्तरात प्रल्हाद जोशी म्हणाले की, संसदेत गदारोळ कोण करतो, कोण संसदेचे कामकाज बाधित करतो, हे सर्व जनता जाणते. सरकार तर संसद चालवू इच्छिते.  

महत्त्वाची विधेयके कोणती?

या अधिवेशनात जे प्रमुख विधेयके मांडली जाणार आहेत, त्यात दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक २०२३, पोस्टल सेवा विधेयक, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक २०२३, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि बँक विधेयक २०२३, जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक २०२३, जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक २०२३, प्रेस आणि मॅगझिन नोंदणी विधेयक २०२३ आदींचा समावेश आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाManipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेस