शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंडिया, एनडीएची पहिली टेस्ट; संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 07:26 IST

संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

संजय शर्मा

नवी दिल्ली : : विरोधी पक्षांची महाआघाडी ‘इंडिया’ व सरकारचे ‘एनडीए’ यांची पहिली परीक्षा संसदेत सादर होणाऱ्या दिल्ली सरकारच्या अध्यादेशाच्या विधेयकावर होणार आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत असून, ते वादळी ठरण्याची शक्यता आहे. सरकारने बुधवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व विरोधी पक्षांची भूमिका स्पष्ट झाले आहे. विरोधक मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावरून केंद्र सरकारला घेरणार आहेत. यासाठी मणिपूरच्या मुद्यावर संसदेत थेट पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी केली आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, सरकारच्या अजेंड्यामध्ये ३१ विषय आहेत. यात सर्वप्रथम दिल्लीतील अध्यदेशाशी संबंधित विधेयक आहे.

राज्यसभेत खरी परीक्षा

nया विधेयकावर ‘इंडिया’ची परीक्षा राज्यसभेत होणार आहे. कारण तेथे सरकारकडे बहुमत नाही. लोकसभेत सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे तेथे कोणतीही अडचण येणार नाही; परंतु राज्यसभेत भाजप व एनडीए मिळून ही संख्या १११ होते. n२३७ सदस्यांच्या राज्यसभेत विधेयक पारित करण्यासाठी सरकारला ११९ संख्येची गरज भासणार आहे. ही संख्या विद्यमान सदस्य संख्येपेक्षा ८ ने जास्त आहे. या आठ खासदारांसाठी सरकारला बिजू जनता दल व वायएसआर काँग्रेसची मदत घ्यावी लागू शकते. nदोन्ही पक्षांचे राज्यसभेत प्रत्येकी ९ सदस्य आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसनेही या विधेयकाच्या विरोधात मत देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांची एकजूट कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या हेतूवर शंका

सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर पडताच संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, सरकार मणिपूरसह सर्व मुद्यांवर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे. लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती जसे निर्देश देतील, त्यानुसार सरकार चर्चा घडवून आणणार आहे.सरकारच्या या आश्वासनानंतरही विरोधी पक्षांना सरकारच्या संसद चालवू देण्याच्या हेतूवर शंका आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी माध्यमांसमोर सरकारला आवाहन करताना म्हटले आहे की, विरोधकांना आपले मुद्दे मांडता यावेत, यासाठी सरकारने संसद चालू द्यावी.याच्या उत्तरात प्रल्हाद जोशी म्हणाले की, संसदेत गदारोळ कोण करतो, कोण संसदेचे कामकाज बाधित करतो, हे सर्व जनता जाणते. सरकार तर संसद चालवू इच्छिते.  

महत्त्वाची विधेयके कोणती?

या अधिवेशनात जे प्रमुख विधेयके मांडली जाणार आहेत, त्यात दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक २०२३, पोस्टल सेवा विधेयक, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक २०२३, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि बँक विधेयक २०२३, जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक २०२३, जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक २०२३, प्रेस आणि मॅगझिन नोंदणी विधेयक २०२३ आदींचा समावेश आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाManipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेस