शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

भारत-थायलंड महामार्गाचे 70% काम पूर्ण, मोदी सरकार 'या' पॉलिसीमुळे चीनला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 18:08 IST

India Myanmar Thailand Highway: भारतातून थेट थायलंडला जाणाऱ्या महामार्गाये काम प्रगतीपथावर आहे. मोदी सरकारने 2014 मध्ये याचे काम सुरू केले होते.

India Myanmar Thailand Highway: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारत ते चीन या एकमेव स्टिलवेल रोडच्या धर्तीवर आशियाई महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पश्चिम बंगालच्या कोलकत्यातून सुरू झालेला महामार्ग, मणिपूरद्वारे म्यानमार आणि तिथून थेट थायलंडला जाईल. हा मोदी सरकारच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा सर्वात मोठा प्रकल्प असून, याचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मीडियाशी बातचीतमध्ये सांगितले की, ते कामाची स्थिती पाहण्यासाठी गेले होते. ताजी परिस्थिती अशी आहे की, या प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. गडकरी म्हणाले की, या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे, परंतु मणिपूरमधील बिघडलेल्या वातावरणामुळे काही समस्या येत आहेत, त्या लवकरच दूर केल्या जातील.

कधी पूर्ण होईल?हा महामार्ग 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यानंतर भारतातूनथायलंडला जाणे सोपे होईल. लोक फ्लाइटऐवजी कारने थायलंडला जाऊ शकतील. भारत-म्यानमार आणि थायलंड महामार्ग हे तिन्ही देश मिळून बांधत आहेत. याची एकूण लांबी सुमारे 1400 किलोमीटर आहे. तत्कालीन वाजपेयी सरकारने हा प्रकल्प प्रस्तावित केला होता, मात्र तो केवळ कागदावरच राहिला. त्यानंतर 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू झाले.

असा असेल मार्ग

तीन देशांना जोडणारा हा महामार्ग कोलकात्यापासून सुरू होऊन सिलीगुडीपर्यंत जातो आणि त्यानंतर बंगालच्या श्रीरामपूर सीमेवरून कूचबिहारमार्गे आसाममध्ये प्रवेश करतो. आसाममधून दिमापूर आणि नागालँडचा प्रवास केल्यानंतर, हा मार्ग मणिपूरमधील इंफाळजवळील मोरेह नावाच्या ठिकाणाहून परदेशात म्हणजेच म्यानमारमध्ये प्रवेश करेल. म्यानमारमधील बागो आणि यांगून मार्गे प्रवासी थायलंडमध्ये प्रवेश करतील.

चीनला मोठा धक्का बसणारहा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर भारताच्या ईशान्य भागातील अर्थव्यवस्था सुधारेल, असा विश्वास आहे. यासोबतच चीनला मोठा धक्का बसणार आहे. चीनचा व्यापार आशियाई देशांमध्ये पसरला आहे, पण जेव्हा भारताचा या देशांशी संपर्क वाढेल, तेव्हा या देशांचे चीनवरील अवलंबित्व कमी होईल आणि अनेक देश भारताकडे वळतील.

टॅग्स :IndiaभारतThailandथायलंडMyanmarम्यानमारNitin Gadkariनितीन गडकरीCentral Governmentकेंद्र सरकार