शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारत-थायलंड महामार्गाचे 70% काम पूर्ण, मोदी सरकार 'या' पॉलिसीमुळे चीनला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 18:08 IST

India Myanmar Thailand Highway: भारतातून थेट थायलंडला जाणाऱ्या महामार्गाये काम प्रगतीपथावर आहे. मोदी सरकारने 2014 मध्ये याचे काम सुरू केले होते.

India Myanmar Thailand Highway: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारत ते चीन या एकमेव स्टिलवेल रोडच्या धर्तीवर आशियाई महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पश्चिम बंगालच्या कोलकत्यातून सुरू झालेला महामार्ग, मणिपूरद्वारे म्यानमार आणि तिथून थेट थायलंडला जाईल. हा मोदी सरकारच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा सर्वात मोठा प्रकल्प असून, याचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मीडियाशी बातचीतमध्ये सांगितले की, ते कामाची स्थिती पाहण्यासाठी गेले होते. ताजी परिस्थिती अशी आहे की, या प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. गडकरी म्हणाले की, या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे, परंतु मणिपूरमधील बिघडलेल्या वातावरणामुळे काही समस्या येत आहेत, त्या लवकरच दूर केल्या जातील.

कधी पूर्ण होईल?हा महामार्ग 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यानंतर भारतातूनथायलंडला जाणे सोपे होईल. लोक फ्लाइटऐवजी कारने थायलंडला जाऊ शकतील. भारत-म्यानमार आणि थायलंड महामार्ग हे तिन्ही देश मिळून बांधत आहेत. याची एकूण लांबी सुमारे 1400 किलोमीटर आहे. तत्कालीन वाजपेयी सरकारने हा प्रकल्प प्रस्तावित केला होता, मात्र तो केवळ कागदावरच राहिला. त्यानंतर 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू झाले.

असा असेल मार्ग

तीन देशांना जोडणारा हा महामार्ग कोलकात्यापासून सुरू होऊन सिलीगुडीपर्यंत जातो आणि त्यानंतर बंगालच्या श्रीरामपूर सीमेवरून कूचबिहारमार्गे आसाममध्ये प्रवेश करतो. आसाममधून दिमापूर आणि नागालँडचा प्रवास केल्यानंतर, हा मार्ग मणिपूरमधील इंफाळजवळील मोरेह नावाच्या ठिकाणाहून परदेशात म्हणजेच म्यानमारमध्ये प्रवेश करेल. म्यानमारमधील बागो आणि यांगून मार्गे प्रवासी थायलंडमध्ये प्रवेश करतील.

चीनला मोठा धक्का बसणारहा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर भारताच्या ईशान्य भागातील अर्थव्यवस्था सुधारेल, असा विश्वास आहे. यासोबतच चीनला मोठा धक्का बसणार आहे. चीनचा व्यापार आशियाई देशांमध्ये पसरला आहे, पण जेव्हा भारताचा या देशांशी संपर्क वाढेल, तेव्हा या देशांचे चीनवरील अवलंबित्व कमी होईल आणि अनेक देश भारताकडे वळतील.

टॅग्स :IndiaभारतThailandथायलंडMyanmarम्यानमारNitin Gadkariनितीन गडकरीCentral Governmentकेंद्र सरकार