शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

भारत हा महिलांसाठी सर्वात धोकादायक देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 05:45 IST

महिलांसाठी भारत हा सर्वात धोकादायक देश असल्याचा निष्कर्ष थॉमस रॉयटर्स फाऊंडेशनने पाहणीतून काढला आहे. भारतानंतर दुसऱ्या व तिसºया स्थानी अनुक्रमे अफगाणिस्तान व सीरिया हे देश आहेत.

लंडन : महिलांसाठी भारत हा सर्वात धोकादायक देश असल्याचा निष्कर्ष थॉमस रॉयटर्स फाऊंडेशनने पाहणीतून काढला आहे. भारतानंतर दुसऱ्या व तिसºया स्थानी अनुक्रमे अफगाणिस्तान व सीरिया हे देश आहेत.पाहणीचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला. महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांच्या यादीत सोमालिया चौथ्या क्रमांकावर आहे. तिथे १९९१ सालापासून यादवी सुरू असूनही तेथील महिलांना भारताहून कमी जाच सहन करावा लागला आहे असे अहवालात म्हटले आहे. येमेन आठव्या क्रमांकावर आहे.आरोग्याची काळजी, आर्थिक स्रोतांचा लाभ व पक्षपात, लैंगिक हिंसाचार, बिगरलैंगिक हिंसाचार, मानवी तस्करी, परंपरा या मुद्द्यांबाबत जगभरातील ५४८ अभ्यासकांना पाहणीदरम्यान प्रश्न विचारण्यात आले. त्यात भारतातील ४३ अभ्यासकांचा समावेश होता. या सर्वांच्या उत्तरांतून महिलांसाठी भारत हा सर्वात धोकादायक देश असल्याचा निष्कर्ष निघाला.भारतात घरातल्याच व्यक्तीनेवा अनोळखी इसमाने महिलेवर बलात्कार होतात, तिचा लैंगिकछळ होतो. पीडितेला न्यायमिळण्यात अडचणी येतात, असेदिसून आले.दिल्लीतील २०१२ सालच्या निर्भया सामुहिक बलात्कारानंतर महिलांच्या सुरक्षिततबाबत अनेकांनी आवाज उठविला. त्यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी भारतात नवे कायदे करण्यातआले. मात्र परिस्थिती सुधारलेली नाही, असे थॉमस रॉयटर्सफाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोनिक्यू व्हिला यांनीम्हटले आहे. (वृत्तसंस्था)थॉमस रॉयटर्स फाऊंडेशनने २०११ साली अशीच पाहणी केली होती. त्यावेळी महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या व पाक पाचव्या क्रमांकावर होता. यंदा पाकिस्तान सहाव्या स्थानी आहे.मोदी व्हिडीओमध्ये मशगुल: राहुल गांधीनवी दिल्ली : सीरिया, अफगाणिस्तान, सौदी अरेबियापेक्षा भारतामध्ये महिलांवर होणाºया बलात्कारांचे प्रमाण अधिक आहे. ज्याप्रमाणे रोम जळत होते त्यावेळी नीरो फिडल वाजवत बसला होता, अगदी देश इतक्या वाईट परिस्थितीतून जात असताना नरेंद्र मोदी मात्र आपल्या उद्यानामध्ये करत असलेल्या योगासनांचे व्हिडिओ बनविण्यात मश्गुल आहेत, अशी उपहासगर्भ टीका काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. थॉमस रॉयटर्स फाऊंडेशनच्या अहवालानंतर राहुल गांधी यांनी हे टिष्ट्वट केले.