शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

मोदी सरकारनं मालदीवचा मग्रूरपणा ठिकाणावर आणला, मुइज्जूंसोबत 'मोठा खेला' केला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 19:56 IST

...खरे तर, भारतीय पर्यटकांनी पाठ विरवल्याचा सामनाही मालदिवला करावा लागत आहे. यामुळे त्याची आर्थिक स्थिती बिघडू शकते.

मोहम्मद मुइज्जू गेल्या वर्षी मालदीवचे राष्ट्रपती झाल्यापासूनच नवी दिल्ली आणि मालदिवचे संबंध बिघडले आहेत. आता मोदी सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मालदीवला मोठा धक्का दिला आहे. भारताने मालदीवच्या बजेटमध्ये मोठी कपात केली आहे. तर दुसरा बाजूला शेजारील भूतानसाठी बजेटमध्ये सर्वाधिक तरतूद केली आहे. भारताच्या या निर्णयामुळे, चीनशी जवळीक साधणाऱ्या मुइज्जूची मग्रुरी ठिकाणावर आली आहे. खरे तर, भारतीय पर्यटकांनी पाठ विरवल्याचा सामनाही मालदिवला करावा लागत आहे. यामुळे त्याची आर्थिक स्थिती बिघडू शकते.

भारताने केंद्रीय अर्थसंकल्पात शेजारील देशांना दिल्या जाणाऱ्या विकास निधीत, भूटानसाठी 2,068 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर मालदीवला केवळ 400 कोटी रुपयेच दिले आहेत. गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पातही मालदीवला 400 कोटी रुपयेच देण्यात आले होते. मात्र आर्थिक वर्ष संपल्यानंतर, सुधारित अर्थसंकल्पात ही रक्कम वाढून 770 कोटी झाली होती. 

अर्थात भारताने गेल्या वर्षात मालदिवमध्ये विकास कामांसाठी 770 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, आता 2024-25 च्याअर्थसंकल्पात ही रक्कम 400 कोटीच ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोहम्मद मुइज्जू यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर मालदीवमध्ये राहणाऱ्या भारतीय सैनिकांना परत पाठवले होते. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच ताणले गेले होते. महत्वाचे म्हणजे, मुइज्जू हे चीनचे समर्थकही मानले जातात.

तसेच इतर देशांचा विचार करता भारताने आपल्या अर्थसंकल्पात, बांगलादेशसाठी 120 कोटी रुपयांची, मॉरिशससाठी 370 कोटी रुपयांची, म्यानमारसाठी 250 कोटी रुपयांची, श्रीलंकेसाठी 245 कोटी रुपयांची, अफगाणिस्तानसाठी 200 कोटी रुपयांची, आफ्रिकी देशांसाठी 200 कोटी रुपयांची तर, लॅटिन अमेरिकन देशांसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBudgetअर्थसंकल्प 2024MaldivesमालदीवBhutanभूतान