शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

भारताने पाकिस्तानला बजावली नोटीस; दहशतवाद, पर्यावरण बदलांमुळे सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 11:53 IST

परिस्थितीतील मूलभूत व अनपेक्षित बदलांमुळे ही प्रक्रिया गरजेची आहे, असे भारताने म्हटले आहे.

नवी दिल्ली : सीमेपलीकडून होणारा दहशतवाद तसेच लोकसंख्येत तसेच पर्यावरणात झालेले बदल लक्षात घेता, सिंधू जलकराराचा फेरआढावा घेणे आवश्यक आहे, असे भारतानेपाकिस्तानला कळविले आहे. परिस्थितीतील मूलभूत व अनपेक्षित बदलांमुळे ही प्रक्रिया गरजेची आहे, असे भारताने म्हटले आहे.

PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र

या संदर्भात सरकारी सूत्रांनी बुधवारी सांगितले की, या प्रकरणी सिंधू जलकराराच्या कलम १२ (३) अंतर्गत भारताने पाकिस्तानला ३० ऑगस्ट रोजी नोटीस बजावली आहे. १९ सप्टेंबर १९६० रोजी भारत व पाकिस्तानने नऊ वर्षांच्या चर्चेनंतर १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू जलकरारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या करारावर जागतिक बँकेचीही स्वाक्षरी आहे. दोन्ही देशांमध्ये सीमा ओलांडून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचे कशा पद्धतीने वाटप करावे, याबाबत या कराराद्वारे विशिष्ट पद्धती ठरविण्यात आली होती.

फेरआढावा का?

लोकसंख्या, पर्यावरणाच्या समस्या यांत झालेले बदल व स्वच्छ ऊर्जेच्या विकासाला चालना देण्याची गरज या गोष्टींमुळे तसेच किशनगंगा आणि रतले जलविद्युत प्रकल्पांबाबत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरही सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्यायला हवा, असे भारताने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये चर्चा आवश्यक : भारत

भारताने सिंधू जलकराराबाबतचा वाद सोडविण्यासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन प्रक्रियेचा आधार घेतला नाही. सिंधू जलकराराचा फेरआढावा घेण्याकरिता दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये चर्चा व्हावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत